Tuesday, 25 July 2023

महाराष्ट्र शासनाच्या नऊ वर्षे मुदतीचे2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाच्या नऊ वर्षे मुदतीचे2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस


            मुंबई, दि. २४ : नऊ वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.३२ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.


            अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २५ जुलै 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टिमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २६ जुलै 2023 रोजी करण्यात येईल.          


            यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.


            कर्जरोख्याचा कालावधी नऊ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ३१ मे २०२३ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३१ मे २०३१ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर ७.३२ टक्के दरशेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ३० नोव्हेंबर आणि ३१ मे रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.


            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागा

ने दिली आहे.


विविध विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर

 विविध विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर


            मुंबई, दि. 24 : महसूल व वन, शालेय शिक्षण व क्रीडा, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास विभागाच्या सन २०२३-२०२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत आज मंजूर करण्यात आल्या.


            या पुरवणी मागण्यांवरील झालेल्या चर्चेत सदस्यांनी सूचना केल्या. या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येवून त्याविषयी सदस्यांना कळविण्यात येणार असल्याचे यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि मंत्री उदय सामंत यांनी शालेय शिक्षण व नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यांना सभागृहाने मंजुरी दिली


सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्यारंगभूमी उपसमितीची औरंगाबादला बैठक

 सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्यारंगभूमी उपसमितीची औरंगाबादला बैठक


            मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचे पुनर्विलोकन सुरू असून त्यासाठी एक समिती आणि विषयवार दहा उपसमित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यातील रंगभूमी उपसमिती दि.27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहराच्या दौऱ्यावर येत असून रंगकर्मींनी या उपसमितीसमोर सांस्कृतिक धोरणासंदर्भातील आपली निवेदने व सूचना सादर कराव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


            राज्याच्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची बैठक गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे होणार आहे. रेल्वे स्थानकाच्या विरुद्ध बाजूला राजनगरमधील हॉटेल द स्काय कोर्टच्या मारी गोल्ड हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.


            या बैठकीमध्ये काळाच्या ओघात बदलणारे सांस्कृतिक बाबींचे स्वरूप, नाट्य क्षेत्रातील बदल नाट्यकर्मींच्या अडचणी, त्यांच्या सूचना इत्यादी विचारात घेतल्या जातील.


000

शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विचार करावा

 शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विचार करावा


- राज्यपालांची आरोग्य विभागाला सूचना


            मुंबई, दि. २४ : रुग्ण दगावला आणि शव नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नसली, तर ग्रामीण भागात रुग्णाच्या नातलगांना नाईलाजाने शव उचलून न्यावे लागते. त्यामुळे राज्याने मृत व्यक्तींना नेण्यासाठी शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. 


            राज्यपाल श्री. बैस यांनी राजभवन येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत उपस्थित होते.


            घटनेच्या पाचव्या अनुसूचीनुसार राज्यातील अनुसूचित भागांच्या विकासाकडे लक्ष देण्याची जबाबदारी आपणाकडे आहे असे नमूद करून आरोग्य योजनांचा लाभ अनुसूचित भागांमध्ये किती प्रभावीपणे होत आहे याची माहिती देण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. ‘सिकलसेल’ आजाराकडे लक्ष देण्यासाठी राज्याचा स्वतंत्र उपविभाग असावा, असे राज्यपालांनी सांगितले. लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड व इतर आरोग्य विमा कार्ड वितरणात गती आणावी, अशीही सूचना राज्यपालांनी केली. 


            ग्रामीण आणि दुर्गम भागात विशेषज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. विशेषज्ञ डॉक्टर्स ग्रामीण भागात काम करण्यास तयार होत नाहीत, याचा विचार करून त्यांना अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत आपण प्रस्तावित केले असल्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.


            सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर व आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी यावेळी राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा, आरोग्य सेवेतील मनुष्यबळाची सद्य:स्थिती व रिक्त पदे, विभागाचे यशस्वी उपक्रम, आरोग्य विषयक महत्वाचे निर्णय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान, महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय सेवा प्रकल्प आदी बाबींची राज्यपालांना माहिती दिली.   


००००


Governor Bais reviews progress of Public Health schemes in Maharashtra


      Maharashtra Governor Ramesh Bais reviewed the progress of implementation of various projects and programmes of the Public Health Department in Maharashtra at Raj Bhavan Mumbai on Mon (24 July). Minister of Public Health and Family Welfare Dr Tanaji Sawant was present.


      Additional Chief Secretary Public Health Milind Mhaiskar and Commissioner Health Services Dheeraj Kumar gave an elaborate presentation on Health Infrastructure and Indicators in Maharashtra, Achievements of Health Department, Major decisions taken by the Department, Special Initiatives to reduce child and maternal mortality in Melghat, National Health Mission, Ayushman Bharat, Rashtriya Bal Swasthya Programme, Pradhan Mantri TB Mukta Bharat Abhiyan, Maharashtra Emergency Medical Services project, etc.


*****



 

बनावट बांधकाम परवानगी प्रकरणी स्थापनएसआयटी’ चे काम तीन महिन्यांत पूर्ण करणार

 बनावट बांधकाम परवानगी प्रकरणी स्थापनएसआयटी’ चे काम तीन महिन्यांत पूर्ण करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. २४ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 66 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे महानगरपालिकेच्या वतीने विकासक व वास्तूविशारद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत सांगितले. या प्रकरणी पोलीस विभागामार्फत विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली असून गृह विभागामार्फत पुढील तपास सुरू आहे. येत्या तीन महिन्यात एसआयटीचे काम पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            सदस्य निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (महारेरा) स्थापना झाल्यानंतर अवैध बांधकामांवर आळा बसला असून नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. नुकतीच ‘रेरा’च्या देशभरातील रेग्यूलेटरची बैठक झाली असून त्यात प्राधिकरणासमोरील अडचणी आणि कार्यपद्धतीमधील बदलांबाबत चर्चा झाली आहे. याअनुषंगाने ज्या सूचना येतील त्यापैकी राज्य शासनाच्या अखत्यारीतील सुधारणा शासन करेल, तसेच ज्या सूचना केंद्राकडे पाठवायच्या असतील त्या केंद्र सरकारकडे पाठविल्या जातील. प्राधिकरणावरील रिक्त पदांवरील नियुक्त्यांबाबत बोलताना त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


            कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रकरणी मानपाडा येथील दाखल गुन्ह्यांमध्ये 25 आरोपींना, तर रामनगर येथे 42 आरोपींना अटक करण्यात आली असून 25 जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री.सावे यांनी दिली. संबंधित दुय्यम निबंधकावर कारवाई सुरू असल्याचे सांगून यापुढे ऑनलाईन परवानगीशिवाय नोंदणी होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर, अभिजित वंजारी, जयंत पाटील, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेशप्रकरणीएसआयटी’चा अहवाल महिनाभरात मागविणार

 त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेशप्रकरणीएसआयटी’चा अहवाल महिनाभरात मागविणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. २४ : त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथील संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी शिवमंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षकांनी मनाई केल्यामुळे वाद निर्माण झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमण्यात आली असून त्याचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, श्रद्धा अथवा परंपरा यामुळे समाज एकत्र येणार असेल, तर त्यास कुणाची हरकत असणार नाही. तथापि, खोडसाळपणा अथवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन झाल्यास त्यावर कारवाई होईल. त्र्यंबकेश्वर प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने त्याची दखल घेणे भाग आहे. याप्रकरणी ज्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे त्याबाबतची कार्यवाही सुरू असून याबाबतचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य कपिल पाटील, नरेंद्र दराडे, अब्दुल्ला खान दुर्राणी, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.


00000

हे एकाच वेळी सुखद आणि दुःखद बाजू आहेत.




 A shark is chasing a small boat, carrying a turtle in its mouth, which, it seems, is trying to save, not eat! The video shows how the animal is trying to drag the turtle onto the boat. And when the crew members realize what the shark really wants to do to get on the boat and save the turtle's life, they help. It turned out the turtle was suffocating from a plastic rope attached to its neck. And the shark wanted to help And managed to help! 👌🏻 It's very beautiful and sad at the same time.. beautiful as the animal understands the pain and tries to help .. on the other hand humans are just self centred.. thinking that they own the world.. human's are polluting everything around them causing the other living organisms die and deteriorating the entire ecosystem..😰

Featured post

Lakshvedhi