Tuesday, 10 January 2023

भावकी ‼️ चा खांदा

 .                *‼️   भावकी   ‼️

*_संकलन : मिलिंद पंडित, कल्याण_*


"आमची भावकी चांगली आहे" म्हणणारे फार दुर्मिळ आहेत. "आमच्या सारखी भावकी कोणाचीच नाही" असे म्हणणारेही खूप आहेत.


खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत? हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे. अनेक पिढ्या, घरे, घराणी यात भूईसपाट झाल्याचा इतिहास आहे.


शहाजीराजे, शिवराय, शंभूराय यांनाही याच्या झळा लागलेल्या आहेत. पुण्यातील पेशव्यांनी तर यात कळस गाठला आहे. ती इतिहासाची पाने तर रक्तरंजीत आहेत. थोडक्यात, यातून कोणाचीच सुटका होत नाही, कारण तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला दुबळा समजून त्रासच दिला जातो. कारण, भावकीतील व्यक्तीला नमवीण्यात एक वेगळाच अहंकार, गर्व दडलेला असतो, त्याचा मद व्यक्त करण्यात एक असूरी आनंद असतो. 


आज दिवाणी खटले, फौजदारी गुन्हे, शेतजमिनीचे वाद यात भावकीच्या भांडणाचा क्रमांक नेहमीच पहीला आहे.


उत्पन्नाचा किती भाग आज समाज यावर खर्च करतोय. अल्प असलेल्या आयुष्यात किती वेळ सत्कारणी लागतोय आणि पुढच्या पिढीला आपण काय देतोय? हे प्रश्न जरी स्वतःला आपण दररोज विचारले तरी आपल्यात बदल होऊ शकतो आणि हेच आपल्या हातात आहे.


भावकीला बदलवणे शिवरायांना जमले नाही. पेशव्यांनाही जमले नाही. आपल्यालाही ते जमणार नाही. बदल स्वतःत केला पाहीजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका.

 

भावकीशी बोलताना शक्यतो प्रतीहल्ला टाळा. त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया टाळा. त्यांनी खोडी काढली तर प्रतिशोध टाळा. सर्वात महत्वाचे भावकीची निंदा करणे सोडून द्या आणि दुसरा कोणी आपल्या भावकीची निंदा करत असेल तर ऐकून घेऊ नका आणि सहनही करू नका.


त्यांनी साद घातली तर प्रतिसाद द्यायला विसरू नका. भावकीच्या यशाचे मन आणि तोंडभरून खरे कौतुक करायची सवय लावून घ्या. अडचणीच्या काळात मदतीचा हात स्वतः होऊन पुढे करा कारण भावकी मेली तरी भावकीच्या पुढे मदतीसाठी हात पसरत नाही. तो हात आपण समोर केला तर त्याच्या सारखे दुसरे समाधान नाही हे सर्व खूप अवघड आहे. 


पण आजच्या काळात भावकी खूप गरजेचे आहे कारण आपण सर्वजण खूप अडचणीत आणि संकटात आहोत. या क्रियेने एकवेळ भावकीची साथ नाही मिळाली तरी चालेल, पण भावकीचा त्रास वाचला तरी हे थोडे नाही. कारण आयुष्यातील निम्मी शक्ती, संपत्ती आणि बहूमुल्य वेळ आपला यातच वाया चालला आहे.


सुधारायचे असेल तर ही शक्ती, संपत्ती आणि वेळ सत्कारणी लावता आला पाहीजे. भावकीतील वाद संपवणे हे सर्वात मोठे काम आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत.


म्हणूनच आमच्या पूर्वजांनी, संस्कृतीने अंतिम यात्रेत चार पैकी तिन खांदेकरी भावकीचे असावेत ही अट घातली आहे.


कितीही भांडा, प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होणार आहे.


🙏🙏🙏


 ************************************

अजब तुझे


 

सुप्रभा


 

जिंदगी गुलजार हैं

 








एक तरी वाडी अनुभवावी... - कोकणातील शांत, निवांत वाडीमधील नेचर कॅम्प

 एक तरी वाडी अनुभवावी...

- कोकणातील शांत, निवांत वाडीमधील नेचर कॅम्प 


धकाधकीपासून दूर असलेलं निसर्गरम्य गाव..

तिथं ना कसली धावपळ, ना कोणते टेन्शन..

नैसर्गिक गरम पाण्यात मनसोक्त डुंबायचं..

माशांसाठी गळ टाकून काठावर बसायचं..

तिथल्याच बांबूपासून विविध वस्तू बनवायच्या..

स्थानिकांनी बनवलेलं चविष्ट जेवण चाखायचं..

आणि

संपन्न निसर्ग अनुभवायचा, तो समजून घ्यायचा..!


शुक्रवार - शनिवार - रविवार;

दि. २७ ते २९ जानेवारी २०२३


ठिकाण =

राजवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

(केवळ १६ जागा)


नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/EcoCamp/Konkan


निसर्ग दर्शन:

* विश्वाचा अफाट पसारा दाखवणारे आकाशदर्शन

* संपन्न निसर्ग, जैवविविधता समजून देणारा ट्रेल

* उष्ण पाण्याचे झरे, जुन्या जलव्यवस्था यांचा अनुभव

* कातळशिल्प, प्राचीन मंदिरांच्या वारशाची झलक

* कोकणातल्या शांत वाडीत राहण्याचा सुखद अनुभव


अधिक माहितीसाठी : 

९५४५३५०८६२/ ९९२२०६३६२१

bhavatal@gmail.com


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्यावतीने 11 आणि 12 जानेवारीला शिबीराचे आयोजन.

 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्यावतीने

11 आणि 12 जानेवारीला शिबीराचे आयोजन.

            मुंबई, दि.9: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्यावतीने दि. 11 आणि 12 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे दोन दिवसीय विभागीय खंडपीठाच्या शिबीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीर बैठकीत आयोगाकडे आलेल्या विविध विषयांवरील तक्रारींची सुनावणी होणार आहे. उदघाटन सत्रात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मार्गदर्शन करणार आहेत.


            मानवाधिकारांचे अधिक चांगले संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तक्रारकर्त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण व्हावे, या उद्देशाने अशा शिबीर बैठका आणि खुली सुनावणी आयोगाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. 11 आणि 12 रोजी तक्रारींची सुनावणी होणार असल्याची माहिती गृह विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.   



मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आढावा

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आढावा

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती द्यावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. ९: वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            मंत्रालयात झालेल्या या बैठकीस म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पायाभूत सुविधा प्रकल्प वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.


            यावेळी श्री. डिग्गीकर यांनी प्रकल्पांच्या कामांबाबत सादरीकरण केले. वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथे एकूण १५९ बीडीडी चाळी आहेत. वरळी येथील १२१ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात ३४ चाळी आणि २५२० गाळ्यांचा पुनर्विकास होत आहे, तर नायगाव येथील ४२ पैकी पहिल्या टप्प्यात २३ चाळी आणि १८२४ गाळ्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. ना.म. जोशी मार्ग येथील ३२ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात १६ चाळी आणि १२८० गाळ्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे.


            बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात रहिवाशांना विविध सोयी मिळणार असून त्यामध्ये व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, सिनिअर सिटीजन प्लाझा या सुविधांचा अंतर्भाव असणार आहे.


            यावेळी पात्र निवासी झोपडीधारकांना सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २६९ चौरस फूटाऐवजी ३०० चौरस फूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. चाळ परिसरातील पात्र निवासी झोपडीधारकांना संक्रमण शिबिराऐवजी मागणी केल्यास दरमहा भाडे देण्याच्या पर्यायास यावेळी मंजुरी देण्यात आली.


००००

Featured post

Lakshvedhi