Friday, 21 January 2022

 दादासाहेब फाळके चित्रनगरीत

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा

- अमित देशमुख

            मुंबई, दि. 20 ​: गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत तयार करण्यात यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

            आज दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            श्री. देशमुख म्हणाले, चित्रनगरीत चित्रपट निर्मात्यांसाठी चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या प्रक्रियेकरिता (Pre-Production and Post-Production) एका ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टुडिओ निर्माण करणे आवश्यक आहे. हे सर्व एकाच ठिकाणी कसे करता येऊ शकेल याबाबत दोन कंपन्यांनी यावेळी सादरीकरण केले. या कंपनीने सादर केलेल्या सादरीकरणानंतर यातील बाबींचा विचार करुन चित्रनगरीत सुसज्ज आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओ उभारण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात यावा.

0000







 सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सागरी जैवविविधतेच्या संरक्षणात स्थानिक मच्छिमारांचा मोठा सहभाग !

जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी कासव यासारख्या २६० संरक्षित प्रजाती पुन्हा समुद्रात

            मुंबई, दि. 20 : सागरी जैवविविधतेचे रक्षण करताना ऑलिव्ह रिडले कासव, बहिरीमासा, लांजा मासा, ग्रीन कासव अशा एकूण २६० संरक्षित सागरी प्रजाती ज्या मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्या होत्या त्यांना मच्छिमारांनी सुखरूपपणे समुद्रात सोडले आहे. असे करताना त्यांच्या झालेल्या जाळ्यांच्या नुकसानीपोटी कांदळवन प्रतिष्ठानने त्यांना ४० लाख ७८ हजार ५० रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे.

            सागरी जैवविवितधेच्या रक्षणासाठी कांदळवन कक्ष करीत असलेले काम कौतुकास्पद असून अशाप्रकारे राज्यातील जैवविविधतेच्या जपणूकीसाठी गांभीर्याने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, यासाठी आवश्यक असलेली व्यापक जनजागृती केली जावी, स्थानिकांना यासाठी विश्वासात घेऊन काम करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

कांदळवन संरक्षणासाठी राज्य शासनाची महत्वाकांक्षी पाऊले- आदित्य ठाकरे

            राज्यातील कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी शासनाने अतिशय महत्वाकांक्षी पाऊले टाकली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. ते म्हणाले, यात कांदळवन उपजीविका निर्माण, कांदळवन वनीकरण, कांदळवन निसर्ग पर्यटन, कांदळवनावरील अतिक्रमणे हटवणे आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे. राज्यात कांदळवनाचे ३२ हजार हेक्टर आच्छादन आहे. या समृद्ध कांदळवनाचे संरक्षण करताना कांदळवनांना राखीव वनाचा दर्जा देण्याचे काम सुरु असून, भारतीय वन अधिनियमातील कलम ४ नुसार २५१४.११ तर कलम २० अंतर्गत ९७८५.३६ हेक्टर इतके कांदळवन राखीव वने म्हणून घोषित करण्यात आले आहे. एमएमआर क्षेत्रात कांदळवनांच्या संरक्षणासाठी संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून भारतीय वन सर्व्हेक्षण अहवाल २०२१ नुसार राज्यातील कांदळवन क्षेत्रात ४ चौ.किलोमीटरची वाढ झाली आहे. विविध शासकीय व खासगी विभागाकडील कांदळवने हस्तांतरीत करून घेण्याची प्रक्रिया अजूनही काही ठिकाणी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सागरी प्रजातींच्या संरक्षणासाठीची उपाययोजना

            सागरी जैवविविधतेच्या संवर्धनात स्थानिक मच्छिमारांचा नेहमीच महत्वाचा सहभाग राहिला असून शाश्वत मासेमारी करतांना दुर्मिळ आणि संरक्षित प्रजातींचे रक्षण होईल याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. यासाठी वन व मत्स्यव्यवसाय विभाग यांनी संयुक्तरित्या नुकसानभरपाईची योजना डिसेंबर २०१८ पासून राबविण्यास सुरुवात केली. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३८ ऑलिव्ह रिडले कासव, ६७ ग्रीन सी कासव, ५ हॉक्सबिल कासव, २ लेदरबॅक समुद्री कासव, ३७ बहिरी मासा (व्हेल शार्क), ६ लांजा (जाअंट गिटारफिश) एक गादा ( हंप ब्याक डॉल्फिन) ४ बुलीया (फिनलेस पोर्पोईस) अशा २६० दुर्मिळ प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे.

मागील १५ दिवसातील दिलेली नुकसान भरपाई

            मागील पंधरा दिवसात अशा ३८ प्रकरणात ५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम कांदळवन कक्षाकडून देण्यात आली आहे. ज्यामध्ये २६ ऑलीव्ह रिडले कासव, ६ बहिरी मासे, २ लांजा मासे, १ ग्रीन सी कासव, १ हॉक्सबिल कासव व १ बुलीया यांना मच्छिमारांनी सुखरूप समुद्रात सोडले आहे. या आर्थिक वर्षात अशाप्रकारे ८६ प्रकरणात मच्छिमारांना ११ लाख ५२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई कांदळवन कक्षामार्फत देण्यात आली आहे.

0000


 

 मान. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या नाना पटोले यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा

आ. अतुल भातखळकर यांनी केली समतानगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल"

मुंबईदि. 18 जानेवारी (प्रतिनिधी)

            मान. पंतप्रधान यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या नाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी समतानगर पोलीस स्टेशनला केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुतळा जाळल्या नंतर आ. भातखळकर यांना अटक करण्यात आलीत्यावेळी ते समता नगर पोलीस ठाण्यातून बोलत होते.

            तसेच पंजाब राज्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीत घडलेल्या घटनेचा व नाना पटोले यांनी “मी मोदींना मारू शकतो” या केलेल्या विधानाचा काही संबंध आहे कायाची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने केलीच पाहिजे अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केली.

            नाना पटोले यांनी सोमवार दि.१७ जानेवारीला देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालातरी महाभकास आघाडी सरकारने याविरोधात नाना पटोले वर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्या नंतर मात्र त्यांना अर्धा तासाच्या आत अटक करण्यात आली. त्यामुळे या राज्यात सत्ताधारीनी काहीही केलं तरी त्यांना वेगळ्या न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय अशा प्रकारची हुकूमशाही या राज्यात सुरू आहे अशी टीका आ.भातखळकर यांनी ठाकरे सरकार वर केली. कांदिवली मध्ये नाना पटोले यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी पोलिसांनी आ. भातखळकर यांना अटक केली असता विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार ठाकरे सरकार करत असल्याची ही टीका त्यांनी यावेळी केली.

            आ. भातखळकर यांनी समता नगर पोलिस ठाण्यात नाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी असे तक्रार पत्र देखील दिले आहे. तसेच जर नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुद्धा आमदार भातखळकर यांनी यावेळी संगितले.

 ```

अमेरिकेला English मध्ये America

म्हणतात.

जपानला पण English मध्ये Japan

म्हणतात.

भूतानलाही English मध्ये Bhutan

म्हणतात.

श्रीलंकेलाही English मध्ये

Sri Lanka च म्हणतात.

बांग्लादेशला पण English मध्ये

Bangladesh म्हणतात.

नेपाळला English मध्ये Nepal च

म्हणतात.

इतकेच काय

आपल्या जवळच्या पाकिस्तानला

English

मध्ये Pakistan च म्हणतात.  

पण मग भारतालाच English मध्ये

India का म्हणतात?

तर

Oxford Dictionary नुसार

India हा शब्द

कसा आला याची ९९%

लोकांना माहिती सुद्धा नाही...

I - Independent

N- Nation

D- Declared

I - In

A- August

म्हणून इंडिया (India)

हे नाव

Dr.B.R Ambedkar यांनी दिले आहे

ह्या पोस्टला कृपया इतके शेयर

करा की, जास्तीत जास्त

भारतीयांना हे कळेल...```

 🇮🇳🇮🇳🇮🇳

Tuesday, 18 January 2022

 उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत

- शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

·       गळतीचे प्रमाण कमी करण्यावर भर

 

            मुंबईदि. 18 :अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अल्पसंख्याक विकास समितीच्या काही सदस्यांनी सूचना केल्यानुसार जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत अशा संस्थांमधील शाळांची १२ वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. जेथे तातडीने मान्यता देणे शक्य आहेअशा शाळांमधील वर्गवाढीस मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजासंदर्भात शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधीशैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आदींसमवेत चर्चा करून याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रा.गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

            बैठकीस शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकीराज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंगउपसचिव समीर सावंतशिक्षण संचालक महेश पालकरबालभारतीचे संचालक के.बी.पाटीलविवेक गोसावी आदी उपस्थित होते.

            मराठी प्रमाणेच उर्दू भा‍षिक शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून द्वैभाषिक पुस्तके लागू करण्याची सूचनाही करण्यात आली होतीत्यानुसार पहिल्या इयत्तेत उर्दू आणि इंग्रजी अशी द्वैभाषिक पुस्तके प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावीतअसे निर्देश प्रा.गायकवाड यांनी दिले. अल्पसंख्याक संस्थांमधील मान्यताप्राप्त रिक्त पदांवर शिक्षक भरतीशिक्षकांचे समायोजन याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००००


 

वृत्त क्र. 171

राज्याच्या कलापरंपरेचा जागतिक स्तरावर गौरव

- मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

·       दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

 

            मुंबईदि. 18 : राज्याला विविध कलांची मोठी परंपरा लाभलेली आहे. चित्रकलाशिल्पकला आणि छायाचित्रकला अशा सर्व कलांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. या कलापरंपरेचा देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये गौरव झालेला आहेअसे गौरवोद्गार मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

            फोर्ट भागातील जहांगिर कलादालनात दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचा सदस्यांनी टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी भाषामंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार नृपेन माधवाणीफोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सुनील व्यासराजेंद्र वाघमारेसहसचिव शशांक नरसाळेपुरस्कार विजेतेछायाचित्रकार आणि कला रसिक उपस्थित होते.

            कलाकरांना  कलाकृतीचे प्रदर्शन करण्यासाठी जहांगिर कलादालनाने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या कलादालनात कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी निवड झालेल्या कलाकरांचे अभिनंदन करुन मराठी भाषा मंत्री श्री.देसाई म्हणाले,  प्रदर्शनातील छायाचित्र ही स्तब्ध करणारी आहेत. ही छायाचित्रे टिपण्याऱ्या छायाचित्रकारांचा दृष्टिकोन नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्कृष्ट कला एकाच ठिकाणी पहायला मिळते याचाही आनंद आहे. कलेची परंपरा आणि साधना पुढेही सुरु ठेवावीअसेही श्री.देसाई यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगिर कलादालनात झाले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शक्य नसले तरी छायाचित्रकार म्हणून ही छायाचित्रे पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असताअसे श्री.देसाई यांनी सांगितले.

            यावेळी श्री. देसाई यांनी छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी करतांना छायाचित्रांच्या वैशिष्ट्यांची माहितीही घेतली.

            या छायाचित्र प्रदर्शन कार्यक्रमात श्री. देसाई यांच्या हस्ते दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाच्या 2019 ते 2021 या वर्षातील विजेते मिलिंद जोशीअमोद कुमारराजेंद्र वाघमारेमहेश आम्ब्रेशेखर मानगावंकरआशिष परब यांना छायाचित्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच भास्कर आठवले यांना लॅंडस्केप ट्रॅाफी तर गणेश उत्सवातील छायाचित्रांसाठी प्रोत्साहन बक्षीस श्रीमती सायली यांना देण्यात आला.

            फोर्ट येथील जहांगिर कलादालनात सुरू असलेले छायाचित्र प्रदर्शन दि. 24 जानेवारी 2022 पर्यंत सर्व कलारसिकांसाठी खुले आहे.

०००


 


Featured post

Lakshvedhi