Thursday, 21 October 2021

Suprabhat

 *’रिश्ते’ और ‘रास्ते’ के बीच,*

*एक अजीब रिश्ता होता है।*

*कभी 'रिश्तों' से 'रास्ते' मिल जाते है,*

*और कभी*

*'रास्तों' में 'रिश्ते' बन जाते हैं!*

*इसीलिए चलते रहिये और रिश्ते निभाते रहिये*

*खुशियाँ तो चन्दन की तरह होती हैं, दूसरे के माथे पे लगाओ तो अपनी उंगलियाँ भी महक जाती हैं..✒*

     🌹 GOOD  MORNING  🌹

Wednesday, 20 October 2021

Signature Machine be alert

 


Signature machine be alert

 


Jeevan sar

 


 चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार

- वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

             मुंबई, दि. 20 : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

          मंत्रालयातील दालनात राज्यातील चंदन उत्पादन वाढीसाठी उत्तेजन देण्याबाबत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य महाव्यवस्थापक( नियोजन) संजीव गौंड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) नागपूर जीत सिंग, व्यवस्थापकीय संचालक बांबू विकास मंडळ श्रीनिवास राव, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक श्रीमती अभरना, चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर,वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे, चंदन उद्योजक वदीराज मदभावी या बैठकीला उपस्थित होते.

            वने राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, राज्यात चंदनाची लागवड वाढून हा उद्योग वाढल्यास राज्याच्या महसूलात भर पडेल.चंदन उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेवून जे उद्योजक या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार आहेत त्यांना सहकार्य करण्यात येईल. शासनस्तरावरून देण्यात येणाऱ्या परवानग्या विहित वेळेमध्ये  देण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात येतील. चंदन पावडर,तेल तसेच चंदन काड्या यांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी आहे त्यामुळे चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. या उद्योगाला बळकटीकरणासाठी शासन नक्कीच प्रोत्साहन देईल. अगरबत्तीच्या व्यवसायात कशा प्रकारे चंदनाचा समावेश करता येईल याचीही पाहणी वने विभागाने करावी. जेणेकरून अगरबत्ती व्यवसायाला देखील गती मिळेल, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी स्पष्ट केले.

            यावेळी चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर  यांनी अगरबत्ती व्यवसायाची सद्य:स्थितीची माहिती सांगितली. यावेळी चंदन उद्योजक वदीराज मदभावी यांनी चंदन उद्योगात महाराष्ट्राला असलेल्या संधी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चंदनाची मागणीचंदन उद्योजकांना शासनाकडून हवे असलेले सहकार्य याबाबतीत सविस्तर सादरीकरण केले.

******


 

तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणाली विकसीत करावी

- वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

            मुंबई, दि. 20 : तेंदूपत्ता ई - लिलाव विकसीत करण्याबाबत आलेल्या सूचनांचा योग्य अभ्यास करून वने विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात तेंदूपत्ता ई लिलाव प्रणाली विकसीत करण्याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दूरदृश्यप्रणालीव्दारे अप्पर  प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) विकास गुप्ता,उपसचिव गजेंद्र नरवणे उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे म्हणाले, सध्या तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणालीमध्ये फक्त स्थानिकच व्यापारी सहभागी होतात  मात्र यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारी सहभागी झाले तर तेंदूपत्त्याला चांगला दर मिळून तेंदू पत्तामध्ये काम करणाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल.मात्र यासंदर्भात या क्षेत्रातील उद्योजकांनी केलेल्या सूचनांचा निश्च‍ित विचार करू, असे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

           अप्पर  प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) विकास गुप्ता  यांनी सध्याची तेंदूपत्ता ई - लिलाव प्रणालीबाबत बैठकीत माहिती दिली.

******


Voters registration

 नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक साक्षरता मंच’ महत्त्वाचा

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

·       ‘एनएसएस’ मार्फत राज्यभर विशेष मतदार नोंदणी मोहिमेस लवकरच सुरूवात

 

            मुंबईदि. 20 : मतदार म्हणून नोंदणी करणे हा लोकशाही सुदृढ करण्याचा महत्त्वाचा भाग असून यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. याचाच भाग म्हणून शालेय शिक्षणउच्च व तंत्र शिक्षणवैद्यकीय शिक्षण या विभागाने शासन निर्णय निर्गमित करून प्रत्येक विद्यापीठांमध्ये निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. या दृष्टीने महाविद्यालय स्तरावर निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करून ती लोकशाही सक्षमीकरणाची व्यासपीठे व्हावीतअसे प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या.

            विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजन केंद्राच्या समन्वयकांसोबत ऑनलाईन बैठक घेण्यात आलीत्यावेळी श्री.देशपांडे बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय सेवा योजना केंद्राचे संचालक प्रभाकर देसाईएनएसएस विद्यापीठ संचालकसमन्वयक त्याचबरोबर मुख्य निवडणूक कार्यालयाचे स्वीप सल्लागार दिलीप शिंदे उपस्थित होते.

            लोकशाही क्लबमार्फत प्रत्येक विद्यापीठेमहाविद्यालयेविद्यालयाने नवमतदारांची नोंदणी होण्यासाठी सहभाग घ्यावा. क्लबच्या मंचावर राजकीय नेतेविविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. मतदानाकरिता वापरण्यात येणाऱ्या ई.व्ही.एम.मशीनची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना करून द्यावी जेणेकरून हा मंच आणखी सक्षम करता येईलअशाही सूचना श्री.देशपांडे यांनी यावेळी केल्या.

            मतदार यादी अद्ययावत करण्याचे महत्त्वाचे काम निवडणूक विभागाद्वारे सातत्याने करण्यात येते. यावेळी दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांमार्फत जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी करण्यासाठी जनजागृती येत असून दि. 131427 आणि 28 नोव्हेंबर 2021 या दिवशी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत असून यात ग्रामपंचायत स्तरावर मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. या विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना केंद्रातील जे जे विद्यार्थी उत्कृष्ट काम करतीलअशा विद्यार्थ्यांना निवडणूक कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनी मानचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी दिली.

            राष्ट्रीय सेवा योजना केंद्राचे संचालक प्रभाकर देसाई यावेळी म्हणाले कीराष्ट्रीय सेवा योजना केंद्रामार्फत एक परिपूर्ण असा रोडमॅप तयार करून तो निवडणूक विभाग तसेच महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

000

Curruption prohibit

 भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन

 

            मुंबई, दि. 20 : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने२६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर 2021 या कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताहाचेआयोजन करण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेचभ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४दूरध्वनी क्रमांक 022-24921212वेबसाईट acbmaharashtra.gov.inईमेल - acbwebmail@mahapolice.gov.in/ addlcpacbmumbai@mahapolice.gov.inफेसबुक - www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप - www.acbmaharashtra.netट्वीटर - @ACB_Maharshtra, व्हॉट्सॲप - 9930997700 येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी अशी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली आहे.

०००

 


Featured post

Lakshvedhi