Wednesday, 8 September 2021

 राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई- पीक पाहणी ॲप डाऊनलोड

·        जळगाव जिल्ह्यातील शेतकरी राज्यात अव्वल

·        सर्वाधिक पीकांची नोंदणी नाशिकअमरावती विभागात

 

            मुंबईदि. 8 : स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पांस राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी देखील नोंदविली असल्याची माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

            त्यांनी दिलेल्या माहितीनुसारराज्यात सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात ( १.१९ लाख) झाली आहे. द्वितीय क्रमांकावर धुळे ( ९४ हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती ( ८१ हजार ) जिल्हा आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक आणि अमरावती विभागात झाली आहे. त्या खालोखाल प्रतिसाद कोंकण आणि नागपूर विभागात दिसून येतो आहे.

            ई-पीक पाहणी प्रकल्पाला शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असून क्षेत्रीय स्तरावर महसूल अधिकारीतलाठी व मंडळ अधिकारी शेताचे बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पिकांच्या काढणी पूर्वी पीक पेरा ऑनलाईन भरणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागात सध्या लगबग सुरु आहेअसे श्री. जगताप यांनी सांगितले. सर्व साखर कारखान्यातील ऊस नोंदणीसाठी सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी ई -पीक पाहणीचा १०० टक्के वापर करण्याच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकत्याच दिल्या आहेतअसेही श्री. जगताप यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी बाबतच्या सर्व अडचणी दूर होतील. त्यासाठी सर्व शेतकरी खातेदार यांनी ॲप डाऊनलोड करून वापरावे. आपल्या पिकाचा अक्षांश रेखांश सह फोटो अपलोड करून पीक पेरा ऑनलाईन नोंदवावाअसे आवाहनही श्री. जगताप यांनी केले आहे.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी?

·       गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी.

·       पीक पेरणीची माहिती सदरामध्ये जमिनीचा भूमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडावा.

·       जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमीनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती दर्शविली जाईल.

·       हंगाम निवडामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष या पैकी हंगाम निवडू शकता.

·       पीक पेरणीसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र दर्शविले जाईल.

·       पिकांचा वर्गामध्ये एक पीक पद्धतीमिश्र पीकपॉलीहाउस पीकशेडनेटहाउस पीकपड क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा.

·       जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापुर्वी जमीनीत कायम पड क्षेत्र असल्यासप्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करावी.

·       पीकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भेळ पीकाचा प्रकार पीक व फळपीक पर्याय दिसतील. त्यातील योग्य पर्याय निवडावा.

·       पीक पर्याय निवडून शेतातील पीकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंद करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळ झाडांची संख्या व क्षेत्र नमूद करावे.

·       मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्रापेक्षा जास्त होवू नये.

·       चालु हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पड क्षेत्र निवड करावे.

·       जल सिंचनाचे साधन पर्यायाखाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनाचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडता येईल.

·       त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे. ठिबक सिंचनतुषार सिंचनप्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.

·       शेतकरी या ठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.

००००


 जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल आणी रस्त्यात चेकिंग करताना पोलीसांनी अडवलं तर -


आपली गाड़ी चुकुनही थांबवु नका,  त्वरीत पळुन जा! पळुन गेल्यावर  पोलिस आपल्या गाड़ीचा नंबर नोट करतील.


कारण  पिऊन गाड़ी चालवायचा दंड *१०,००० रुपये* आहे  आणि  पोलीसांनी थांबवल्यावर ऊभे न रहाण्याचा दंड फक्त *२००० रुपये.*


इतक्या छोट्याश्या माहीतीने सरळ ८००० रुपये आपण वाचवू शकता.


*सौजन्य -

*तळीराम मोटर ड्राइविंग स्कुल. अजुन टिप्स हव्या असतील तर बाटली घेऊन भेटा.*


😜💦🍷😎🍾😎🍷💦😜

 किस ऑफ लाईफ !


कालच्या पोस्टवर एकाने विचारलं की आयुष्याची उमेद राहिली नाही तरी जगायचं कशासाठी ?

उत्तर सोपं आहे. 

जगणं आपल्या हाती आहे. मरण आपल्या हाती नाही त्यामुळे जोवर मरण येत नाही तोवर जगण्यावर प्रेम केलं पाहिजे. 


आपण निराशावादी झालो की भवतालही नैराश्याने ग्रासला जातो, सगळं उदास वाटू लागतं. असा माणूस दुसऱ्याच्या आयुष्यात काय रंग भरणार कारण त्याचं स्वतःच्या असण्यावर प्रेम नसतं. 

एक साधा मेसेज सोबतच्या फोटोत दडला आहे.


घटना १९६७ सालची आहे. १७ जुलै १९६७,अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्सनविले शहर. 

एका ओव्हरहेड वायरमधून स्पार्किंग होत असल्याने विजेची समस्या उद्भवली तेंव्हा दोन लाईनमन्सवर दुरुस्तीची जबाबदारी सोपवली गेली. 

भर दुपारी त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. 

त्यांचं काम जवळपास उरकत आलं होतं आणि तेव्हढ्यात घात झाला. 


रॅन्डल चॅम्पियन ह्या तरुण लाईनमनकडून अनवधानाने दुसऱ्या एका उच्च दाबाच्या वायरला स्पर्श झाला आणि तो जागेवरच लटकला. त्या क्षणी तो मधल्या वायरवर लटकून काम करत होता आणि त्याच पोलवर त्याचा सहकारी जे. डी. थॉम्पसन हा काम करत होता. 


रॅन्डलला शॉक बसल्याचे निमिषार्धात त्याच्या लक्षात आले, पोलवर पाय ओणवे करून उभं राहत त्यानं त्याला कवेत घेतलं आणि ताबडतोब त्याला तोंडावाटे श्वास देणं सुरू केलं. 


रॅन्डलच्या सर्व हालचाली बंद होत्या, शरीर थिजलं होतं. तो कसलाही प्रतिसाद नव्हता तरीही तातडीच्या सेवेचं वैद्यकीय पथक येईपर्यंत थॉम्पसन अविरतपणे त्याला श्वास देत राहिला. 


एक वेळ अशी आली की दोघंही निळे पडले. 

मात्र थोड्याच वेळात वैद्यकीय पथक आलं. 

अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरवलं नि कमाल झाली !  


वैद्यकीय उपचारानंतर रॅन्डलचा श्वास पूर्ववत झाला. 

रॅन्डल जगला. 


रॅन्डलला जगवण्याचं श्रेय त्याच्या सहकारी मित्राला थॉम्पसनला जाते.


तिथं त्या क्षणी एखादा निराशावादी व्यक्ती असता तर त्यानं प्रयत्नच केले नसते, हाय व्होल्टेज वायरचा शॉक म्हणजे माणूस वाचणार नाही, तो गेलाच असणार म्हणून अश्रू ढाळत बसला असता. 


मात्र थॉम्पसनचं जगण्यावर प्रेम होतं, त्याला मित्राच्या श्वासाची खात्री होती, त्यानं हार मानली नाही. प्रयत्न जारी ठेवले. त्याचीच फलश्रुती म्हणजे रॅन्डलचं जगणं !


छायाचित्रकार रॉको मोरबिटो अग्नीशमनदलाच्या हरेक मोहिमेत जायचे. त्यांनी हे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. 

१९६८ सालचा पुलित्झर हा छायाचित्रणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार या फोटोने जिंकला होता. 


जॅक्सनविले जर्नलचे संपादक बॉब पॅट यांनी फोटो पब्लिश करताना त्याला नाव दिलं 'किस ऑफ लाईफ' !   

खरेच हा टोटली किस ऑफ लाईफ होता. 


जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या एका व्यक्तीने मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या मित्राला प्राण परत मिळवून दिले !


अनेक लोक कमेंटमध्ये वा इनबॉक्समध्ये विचारतात, आता जगण्यात मजा राहिली नाही, सगळं उदास वाटतं आता मी जगून काय करू ? आता जगायचं तरी कुणासाठी हा सूर त्यात असतो. 


अशांना माझं उत्तर एकच असतं - 

"जो स्वतःपुरता जगू लागतो त्याला हे विचार अधिक त्रास देतात. 

त्या उलट माझ्या आयुष्यात काही रंग उरले नाहीत तर मी इतरांचे आयुष्य रंगीत करेन असं ठरवायचं अवकाश की जगण्याची नवी उर्मी मिळते. जगण्यासाठीचं उद्दिष्ट कारण भवतालात डोकावलं तरी मिळतं मात्र त्यासाठी आधी अंतरंगात डोकावलं पाहिजे. 

मग आपणही आशावादी होतो नि आपल्या हातून एखाद्या जीवाचं भलं होऊ शकतं. 

आपलं जगणं सार्थकी लागण्यासाठी इतकं समाधानही पुरेसं ठरते. 

होय ना ?


- समीर गायकवाड.

 किस ऑफ लाईफ !


कालच्या पोस्टवर एकाने विचारलं की आयुष्याची उमेद राहिली नाही तरी जगायचं कशासाठी ?

उत्तर सोपं आहे. 

जगणं आपल्या हाती आहे. मरण आपल्या हाती नाही त्यामुळे जोवर मरण येत नाही तोवर जगण्यावर प्रेम केलं पाहिजे. 


आपण निराशावादी झालो की भवतालही नैराश्याने ग्रासला जातो, सगळं उदास वाटू लागतं. असा माणूस दुसऱ्याच्या आयुष्यात काय रंग भरणार कारण त्याचं स्वतःच्या असण्यावर प्रेम नसतं. 

एक साधा मेसेज सोबतच्या फोटोत दडला आहे.


घटना १९६७ सालची आहे. १७ जुलै १९६७,अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्सनविले शहर. 

एका ओव्हरहेड वायरमधून स्पार्किंग होत असल्याने विजेची समस्या उद्भवली तेंव्हा दोन लाईनमन्सवर दुरुस्तीची जबाबदारी सोपवली गेली. 

भर दुपारी त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. 

त्यांचं काम जवळपास उरकत आलं होतं आणि तेव्हढ्यात घात झाला. 


रॅन्डल चॅम्पियन ह्या तरुण लाईनमनकडून अनवधानाने दुसऱ्या एका उच्च दाबाच्या वायरला स्पर्श झाला आणि तो जागेवरच लटकला. त्या क्षणी तो मधल्या वायरवर लटकून काम करत होता आणि त्याच पोलवर त्याचा सहकारी जे. डी. थॉम्पसन हा काम करत होता. 


रॅन्डलला शॉक बसल्याचे निमिषार्धात त्याच्या लक्षात आले, पोलवर पाय ओणवे करून उभं राहत त्यानं त्याला कवेत घेतलं आणि ताबडतोब त्याला तोंडावाटे श्वास देणं सुरू केलं. 


रॅन्डलच्या सर्व हालचाली बंद होत्या, शरीर थिजलं होतं. तो कसलाही प्रतिसाद नव्हता तरीही तातडीच्या सेवेचं वैद्यकीय पथक येईपर्यंत थॉम्पसन अविरतपणे त्याला श्वास देत राहिला. 


एक वेळ अशी आली की दोघंही निळे पडले. 

मात्र थोड्याच वेळात वैद्यकीय पथक आलं. 

अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरवलं नि कमाल झाली !  


वैद्यकीय उपचारानंतर रॅन्डलचा श्वास पूर्ववत झाला. 

रॅन्डल जगला. 


रॅन्डलला जगवण्याचं श्रेय त्याच्या सहकारी मित्राला थॉम्पसनला जाते.


तिथं त्या क्षणी एखादा निराशावादी व्यक्ती असता तर त्यानं प्रयत्नच केले नसते, हाय व्होल्टेज वायरचा शॉक म्हणजे माणूस वाचणार नाही, तो गेलाच असणार म्हणून अश्रू ढाळत बसला असता. 


मात्र थॉम्पसनचं जगण्यावर प्रेम होतं, त्याला मित्राच्या श्वासाची खात्री होती, त्यानं हार मानली नाही. प्रयत्न जारी ठेवले. त्याचीच फलश्रुती म्हणजे रॅन्डलचं जगणं !


छायाचित्रकार रॉको मोरबिटो अग्नीशमनदलाच्या हरेक मोहिमेत जायचे. त्यांनी हे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. 

१९६८ सालचा पुलित्झर हा छायाचित्रणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार या फोटोने जिंकला होता. 


जॅक्सनविले जर्नलचे संपादक बॉब पॅट यांनी फोटो पब्लिश करताना त्याला नाव दिलं 'किस ऑफ लाईफ' !   

खरेच हा टोटली किस ऑफ लाईफ होता. 


जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या एका व्यक्तीने मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या मित्राला प्राण परत मिळवून दिले !


अनेक लोक कमेंटमध्ये वा इनबॉक्समध्ये विचारतात, आता जगण्यात मजा राहिली नाही, सगळं उदास वाटतं आता मी जगून काय करू ? आता जगायचं तरी कुणासाठी हा सूर त्यात असतो. 


अशांना माझं उत्तर एकच असतं - 

"जो स्वतःपुरता जगू लागतो त्याला हे विचार अधिक त्रास देतात. 

त्या उलट माझ्या आयुष्यात काही रंग उरले नाहीत तर मी इतरांचे आयुष्य रंगीत करेन असं ठरवायचं अवकाश की जगण्याची नवी उर्मी मिळते. जगण्यासाठीचं उद्दिष्ट कारण भवतालात डोकावलं तरी मिळतं मात्र त्यासाठी आधी अंतरंगात डोकावलं पाहिजे. 

मग आपणही आशावादी होतो नि आपल्या हातून एखाद्या जीवाचं भलं होऊ शकतं. 

आपलं जगणं सार्थकी लागण्यासाठी इतकं समाधानही पुरेसं ठरते. 

होय ना ?


- समीर गायकवाड.

 गांव की नयी नवेली दुल्हनअपने पति से अंग्रेजी भाषा सीख रही थी, 

लेकिन अभी तक वो "C" अक्षर पर ही अटकी हुई है।


क्योंकि, उसकी समझ में नहीं आ रहा था कि 

"C" को कभी "च" तो 


कभी "क" तो 


कभी "स" क्यूं बोला जाता है।


एक दिन वो अपने पति से बोली, आपको पता है,


"चलचत्ता के चुली भी च्रिचेट खेलते हैं"

पति ने यह सुनकर उसे प्यार से समझाया


यहां "C" को "च" नहीं "क" बोलेंगे।

इसे ऐसे कहेंगे, "कलकत्ता के कुली भी क्रिकेट खेलते हैं।


"पत्नी पुनः बोली "वह कुन्नीलाल कोपड़ा तो केयरमैन है न ?


"पति उसे फिर से समझाते हुए बोला, "यहां "C" को "क" नहीं "च" बोलेंगे।


जैसे, चुन्नी लाल चोपड़ा तो चेयरमैन है न 


थोड़ी देर मौन रहने के बाद पत्नी फिर बोली,"आपका चोट, चैप दोनों चाटन का है न ?


"पति अब थोड़ा झुंझलाते हुए तेज आवाज में बोला, 

अरे तुम समझती क्यूं नहीं, यहां"C" को "च" नहीं "क" बोलेंगे


ऐसे, आपका कोट, कैप दोनों कॉटन का है न


पत्नी फिर बोली - अच्छा बताओ, "कंडीगढ़ में कंबल किनारे कर्क है ?


"अब पति को गुस्सा आ गया और वो बोला, "बेवकुफ यहां "C" को "क" नहीं "च" बोलेंगे। 😡


जैसे - चंडीगढ़ में चंबल किनारे चर्च है न


पत्नी सहमते हुए धीमे स्वर में बोली," 


और वो चरंट लगने से चंडक्टर और च्लर्क मर गए क्या ?


"पति अपना बाल नोचते हुए बोला,"अरी मूरख, यहां

 "C" को "च" नहीं "क" कहेंगे...


करंट लगने से कंडक्टर और क्लर्क मर गए क्या?


इस पर पत्नी धीमे से बोली," अजी आप गुस्सा क्यों हो रहे हो... इधर टीवी पर देखो-देखो...


"केंटीमिटर का केल और किमेंट कितना मजबूत है


"पति अपना पेशेंस खोते हुए जोर से बोला, "अब तुम आगे कुछ और बोलना बंद करो वरना मैं पगला जाऊंगा।"


ये अभी जो तुम बोली यहां "C" को "क" नहीं "स" कहेंगे - 


सेंटीमीटर, सेल और सीमेंट


हां जी, पत्नी बड़बड़ाते बोली, 


"इस "C" से मेरा भी सिर दर्द करने लगा है।


और अब मैं जाकर चेक खाऊंगी, 


उसके बाद चोक पियूँगी फिर 


 चाफी के साथ 


 चैप्सूल खाकर सोऊंगी


 तब जाकर चैन आएगा।😅


उधर जाते-जाते पति भी बड़बड़ाता हुआ बाहर निकला..🙇‍♂


तुम केक खाओ, 

पर मेरा सिर न खाओ..😩


तुम कोक पियो या 

कॉफी, पर मेरा खून न पिओ..


तुम कैप्सूल निगलो, 

पर मेरा चैन न निगलो..😤


इसे देखकर मैंने भी निर्णय कर लिया कि अंग्रेजी में बहुत कमियां है, हम हिदुस्तानी हैं अतः अपनी हिंदी पर गर्व करें।

😀

 *आजाराशी लढावे कसे... ?*




*लेख संपूर्ण वाचा तुम्हाला कुठलाच व्हायरल आजार होणार नाही*

 

आजारपण प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणात येतं. काहीवेळा ते किरकोळ प्रमाणात असतं काहीवेळा गंभीर ! 


आजाराची वैद्यकीय व्याख्या खुप व्यापक असली तरी, शरीराला नको असलेला घटक शरीरात शिरुन वाढायला लागला आणि शरीराला गरजेच्या असणा-या क्रियांमध्ये व्यत्यय आणायला लागला, शरीराला त्रास द्यायला लागला तर त्याला आजारपण म्हणावं असं आपण सर्वसामान्य लोक म्हणु शकतो. 


आजारपण कुणालाच नको असतं तरीही ते येतंच...! 


आजारपण येवुच नये, आलंच तर गंभीर रुप धारण करु नये, अगदी अॕडमिट वैगेरे होण्याची वेळ येवु नये यासाठी काही साधे उपाय सांगत आहे. 


*हे उपाय म्हणजे उपचार (Treatment) नव्हेत... Prevention is better than Cure हे जे म्हटलं जातं, त्यातला Prevention चा प्रकार आहे याची नोंद घ्यावी.*


कोणताही आजार टाळायचा असेल तर आपली प्रतिकारशक्ती म्हणजेच Immunity Power  वाढवणं हा त्यावरचा प्रमुख इलाज आहे. 


Immunity Power म्हणजेच प्रतिकारशक्ती प्रबळ असेल तर कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही. आलाच तरी जास्त हानी पोचवणार नाही. 


आपण हे ऐकत असतो, परंतु प्रतिकारशक्ती म्हणजे नेमकं काय...ती वाढवायची कशी हे मात्र कुणीच नीट सांगत नाही, सांगितलंच तर, सांगितलेलं आपल्याला पाळायला जमेलच असं नाही... 


म्हणुन सर्वसामान्यांना प्रतिकारशक्ती म्हणजे काय, ती वाढवण्यासाठी नेमकं काय करावं हे साध्यासोप्या भाषेत सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !   


*डाॕ. पी.पी. देवेन, प्रोफेसर, ए.जे.मेडिकल काॕलेज, केरळ यांच्या अभ्यासपुर्ण निष्कर्षांवर आधारीत हा लेख आहे...!* 


*आजारपण का येतं?* 


मघाशी सांगितल्याप्रमाणे शरीराला नको असलेला घटक म्हणजेच शत्रु आपल्या शरीरात शिरला तर सर्वप्रथम तो काय करतो तर आपल्या शरीरात  स्वतःचं सैन्य वाढवतो. 


ज्याचं सैन्य जास्त, तो जिंकणार हे आपल्याला सर्वसाधारणपणे टिव्ही आणि पिक्चरमधल्या लढाया पाहुन माहित आहे. 


शत्रुला उत्तर द्यायचं म्हणुन आपलं शरीरसुद्धा सैन्याची जमवाजमव करायला लागतं. (हां, बरोबर... सासु बोलली की सुन पदर खोचुन तयार व्हायला लागते तस्सं )


आपण बेसावध असतांना अचानक पणे शत्रु पुर्ण शक्तीनिशी शरीरात येतो... 


त्यामुळे आपल्या शरीराला शत्रुशी युद्ध करण्यापुरतं सैनिक जमवायला थोडा तरी वेळ लागणारच की राव... !


आपलं पुरेसं सैन्य जमण्याच्या आधीच शत्रुने जर शरीरावर जोरदार हल्ला केला तर... ? 😔


आपलं सैन्य कमी असल्यामुळे म्हणा बेसावध असल्यामुळे म्हणा किंवा सैन्य जमवण्यात आपला वेळ गेल्यामुळे म्हणा आपला पराभव होणार हे निश्चित ! म्हणजेच आजार होणार हे निश्चित ... साधं आहे ! 


शत्रु येण्याआधीच आपल्या शरीरानं, आपलं भरपुर सैन्य साठवुन ठेवलं असतं, हातात भाले घेवुन आधीच तयार करुन ठेवलं असतं तर... ? 


शत्रु नक्कीच हरला असता ! 


शत्रु शरीरात येण्याआधीच आपल्या शरीरानं आधीच भरपुर सैन्य साठवुन ठेवलेलं असणं म्हणजे आपली *प्रतिकारशक्ती* ! 


हि प्रतिकारशक्ती ज्याची जास्त, त्याची "जीत" होणार हे साधं गणित आता कळायला हरकत नाही !


💁‍♀️शत्रु शरीरात आल्याबरोबर पहिले 48 तास महत्वाचे. 


या 48 तासांत जो जास्त सैन्य निर्माण करेल तो भविष्यात जिंकणार... साधं आहे ना हो ! 


मग, या 48 तासांत आपण आपलं सैन्य शत्रुपेक्षा जास्त प्रमाणात तयार केलं तर ठिक; नाहीतर शत्रु आपलं सैन्य या 48 तासांत वाढवणार... आणि आपल्यावर हल्ला करणार...आणि आपण हरणार ... म्हणजेच आपल्याला आजार होणार ! 


पटलंय ना हितवर...व्हय तरी म्हणा कि राव !!!


*गनिमी कावा*


यावेळी आपण करायचं काय... ?तर आपल्या रक्तातच असलेला महाराजांचा "गनिमी कावा" आता खेळायचा !


आजाराचं कुठलंही लक्षण दिसायला लागलं आपल्याला उदा. घसा खवखवणे, शिंका, नाक गळणे, बारीक ताप येणे इ. कि लगेच सोसेल इतकं गरम पाण्याचे घोट (पाण्याचेच) घ्यायला सुरुवात करायची. 


सोसेल इतकंच बरं का... नायतर घसा घ्याल भाजुन...! 


लक्षण दिसायला लागल्यापासुन दर अर्ध्या तासाने सुरुवातीच्या 48 तासांपर्यंत हे गरम पाणी पीत रहायचं ... ! 


(कोई मिल गया मधल्या बालिश हृतिक रोशन प्रमाणे बालीश चेहरा करुन .... एकावेळेला एक गिलास पिवु का, आर्दा गिलास पिवु ?  हे विचारायला फोन करु नका... ज्यानं त्यानं आपल्याला "झेपतंय" तेव्हढं प्या ! पाणी हां.. इतकावेळ पाण्याचंच बोलतोय मी )


यानं होतं काय... कि आपल्या शरीराचं तापमान वाढायला लागतं.  


यामुळं होतं काय.... तर शरीरात आलेला शत्रु वातावरण बदलल्यामुळे बावचळतो... भांबावतो... मध्येच काय झालं ? असं समजुन स्वतःचं सैन्य निर्माण करायचं जरा वेळ थांबवतो... परिस्थिती बदलेल याची थोडी वाट पाहतो... बेसावध होतो...! *(पक्का कोल्हापुरकर इथं म्हणणार....कसा फशीवला...कसा गंडीवला...! )*


या गनिमी काव्यामुळं, शत्रुचा सैन्य जमवण्याचा वेग बघा मंदावला, पण आपण आपलं सैन्य निर्माण करायचं थांबवलंय का... ? तर नाही... ! (हुषार आहे आपण )


आलं लक्षात ? 


या गनिमी काव्यानं शत्रुला सैन्य वाढवण्यापासुन आपण थांबवलं... आपलं सैन्य मात्र सतत वाढवत गेलो... तर होईल काय... ? 


अर्थात् सुरुवातीच्या 48 तासांत आपल्याकडे शत्रुपेक्षा जास्त सैन्य साठलेलं असेल... आणि त्यामुळं भविष्यात "जीत" आपलीच !


आता आजार गंभीर होणार नाही हे निश्चित ! 


("जीत" हा शब्द सारखा मध्येमध्ये कडमडतो आहे, जिंकणं या अर्थाने तो आलेला आहे. लेखकाच्या नावातील शेवटची दोन अक्षरे घुसडण्याचा यात मुळीच हेतु नाही, कुणाला तसे वाटले तर तो निव्वळ योगायोग समजावा.)


*शस्त्रांची जमवाजमव ...*


चला आपल्याकडे सुरुवातीच्या 48 तासांत सैन्य तर वाढलं. पण नुसतंच सैन्य वाढुन काय कामाचं ? 


त्यांच्या हातात शत्रुबरोबर लढायला हत्यारं नकोत ? 


सैन्याकडे मशीनगन, स्टेनगन, तोफा, रणगाडे नसतील तर नुसतीच सैनिकांची संख्या वाढुन काय कामाचं ? (शाब्दिक भांडणात चार शिव्या दिल्या की झालं. शिवाय यांतुन त्या भांडणाची खुमारीही वाढते...हो... आपापल्या जबाबदारीवर करुन पहा ! )


पण हे शाब्दिक भांडण नव्हे, इथं युद्ध चालु आहे, शिव्या कामाच्या नाहीत... इथं शस्त्रंच लागतात.


आपल्याला सुद्धा आपल्या सैनिकांना ही शस्त्रं  पुरवावी लागतील, तरच आपलं सैन्य युद्ध करु शकेल शत्रुशी... ! 


आपण आता कोणती शस्त्रं द्यायची आपल्या सैन्याच्या हातात ? 


तशी बरीच आहेत... पण 100 टक्के युद्ध जिंकुन देणारी, भरवशाची प्रमुख चार ! 


*1. आयर्न - Iron*


*2. अमायनो अॕसीड - Amino Acid*


*3. क जीवनसत्व - Vitamin C* 


*4. जस्त - Zinc* 


*शस्त्रं मिळवायची कशी... ?*


 सोपं आहे. 


*1. आयर्न - Iron* - 


सफरचंदात हे असतं. परवडतंय त्यांनी रोज सफरचंद खा. इतरांनी मुठभर काळ्या मनुका खा. दोन्ही खाल्लं तर ऊत्तमच ! इकडं पाठवलं तर त्याहुन उत्तम ! 


*2. अमायनो अॕसीड - Amino Acid*


नाव ऐकुन दचकु नका ! फक्त मोड आलेली कडधान्य खा भरपुर ... ! 


*3. क जीवनसत्व - Vitamin C* 


एका लिंबाचा रस काढुन सरबत करुन प्या. संत्रा, मोसंबी पण चालेल. *(हि फळांची नावं आहेत याची नोंद घ्यावी)*🤦‍♂️


*4. जस्त - Zinc* 


ऐकुन गंमत वाटेल, पण पपईच्या बियांत सर्वात जास्त प्रमाणात जस्त असते. 


पपईच्या बिया खाणार नाही तुम्ही  मला माहित आहे (चांगलाच ओळखुन आहे मी तुम्हांला)


ओके ! 


मग इथुन पुढे कलींगड खातांना, तोंडाचा चंबु करुन त्याच्या बिया शिताफीनं थुंकुन टाकायचं बंद करा! त्या चावुन खा...! 


त्यांतही भरपुर जस्त आहे. 


हि चार शस्त्रं जर आपण आपल्या  सैन्याला दिलीत तर "हर हर महादेव" म्हणत आपलं सैन्य शत्रुवर तुटुन पडणार... आणि आपला झेंडा कायम डोलत राहणार... निरोगी !


तेव्हा नेहमीसारखं गाफील राहु नका... ( गाफील या शब्दाचा समानार्थी गोड शब्द म्हणजे धांदरट... ! बायकांचा हा  आवडता शब्द, जणु यांच्या माहेरचाच. 'आमचे हे किनई पयल्यापासुन धांदरटच' हे म्हणण्यात काय त्यांना आसुरी आनंद होतो कळत नाही )


तर, ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा, आपलं सैन्य आजपासुनच जमवायला सुरु करा...! 


हुश्श् ...! 


... तुमच्या घरापर्यंत, हि टेक्नीकल माहिती, खाटेवर  उताणं पडल्या पडल्या तुमाला समजावी, कळावी यासाठी   कष्टानं तुमच्यापर्यंत ती पोचवली आहे... !


➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

*(कॉपी पेस्ट)*

Tuesday, 7 September 2021

 [02/09, 10:45] Mangaon Kadam: अपरिचित रायगडाचा घेरा ( भाग चौथा ) .....


मौजे रायगडवाडी....


प्रत्यक्ष शिवप्रभूंचं वास्तव्य ज्या दुर्गदुर्गेश्वरावर होतं , त्या गडाचा पायथा होण्याचं भाग्य या वाडीला लाभलंय......रायगडासंदर्भातील अर्धेआधिक खलबतं , राजकारण ज्या गावाने पाहिलंय ती हीच वाडी.......अठरा कारखान्यांपैकी काही कारखाने असलेली रायगडाची वाडी....


कोळी आवाड , हिरकणीवाडी,  परडी , टकमकवाडी , नेवाळी , खडकी आणि शिंदे आवाड अशा सात वाड्यांची मिळून रायगडवाडी आहे.......छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही सरदारांचं वास्तव्य देखील याच वाडीत होते......चितदरवाजापासून खाली वाडीकडे उतरल्यानंतर डाव्या बाजूला आज जिथं निलगिरी आणि सुरूची झाडे दिसतात....तीच पूर्वीची राजबाग होती...महाराजांनी ती खास बनवून घेतली होती.....याच राजबागेला लागून पूर्वी काही घरं होती.......वाडीमध्येही बाजारपेठ असल्याचा उल्लेख सापडतो......रायगडावर व्यापारी पेठ वसवणारा नागशेट्टी ( नागराज शेठ ) याचे निवासस्थान सुध्दा वाडीत होते , त्या भागाला ग्रामस्थ " नाग्याबाग " म्हणून ओळखली जाते.....नाग्याबागमध्ये एक पडीक जोते आणि विहीर दिसते.......अत्यंत सुबक चिरेबंदी विहीरीचं पाणी ग्रामस्थ अलीकडच्या काही वर्षांपर्यत वापरत होते......


रस्त्याच्या उजव्या बाजूला " फड" होता , याच फडात गडावर आलेल्या आगंतुकांसाठी विश्रामगृहासारखी सोय होती......इथं पडकी आणि अर्धी बुजलेली घुमटी पण पाहायला मिळते......यालाच " गोसाव्याचा मठ " असे म्हणतात.....छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू मौनीबाबांचे शिष्य तुरतगिरी यांच्यासाठी महाराजांनी मठाची स्थापना केली होती...


रायगडवाडीत आजमितीस साटम , सावंत , खोपकर , जाधव , वाडीकर , राईलकर , कडू , तांबे , हिरवे , लांबरे अशी विविध जातीधर्माची कुटुंब राहतात.... तसं म्हटलं तर बारा बलुतेदारच नांदतात.....मराठा , सोनार , चर्मकार , परीट , बौद्ध, धनगर अशी मिश्र वस्ती आढळते......


वाडीचं ग्रामदैवत झोलाई ......छत्रनिजामपूरमार्गे आल्यानंतर छत्रपती शिवराय झोलाईचं दर्शन घेऊनच गडचढाई करत असत....... अतिशय जागृत देवस्थान आहे ते......याशिवाय श्रीसोमजाई , श्रीवरदायिनी , हनुमान आणि श्री हरेश्वराचं पडीक शिवमंदिर आहे.....जावळीच्या युद्धातून पळून आलेल्या चंद्रराव मोरेंनी रायगडावर जाण्यापूर्वी याच हरेश्वराच्या मंदिरात कौल घेतला , परंतु तो कौल विरोधात गेल्याचेही नोंदीमध्ये उल्लेख  आढळतो....हरेश्वर मंदिरासमोर डांबरी रस्त्यालगत मराठा कालखंडातील काही समाधीशिळा सुध्दा दिसतात......थोडंसं अंतर पुढे चालून गेल्यानंतर " गोदावरीची समाधी " दिसते.....समाधी बोलण्यापेक्षा कुणातरी महत्वाच्या स्त्रीचं ते वृंदावन आहे....शंभर  वर्षांपासून भलेभले इतिहासकार संशोधन करून गेले , पण आजतागायत कुणीही त्या " वृंदावनाचं " रहस्य आणि कथा उलगडू शकले नाहीत......प्रत्यक्ष रायगडावर देखील  इतकं सुबक बांधकाम केलेलं वृंदावन नाही,  मग इथेच कसं ?.....रायगडवाडीत घडलेल्या त्या प्रसंगाचा काळच साक्षीदार ......आपण बापुडे काय बोलावे ?.......


अशीच एक कथा इथल्या " रायनाक" बद्दल सुध्दा......मे 1818 मध्ये पोटल्याच्या डोंगरावरून तोफा डागणार्या ब्रिटिशांना मदत केलेल्या रायनाकाला " फितुर " ठरवलं गेलं , पुन्हा त्याच निर्दयी इंग्रजांनी कडेलोटाचं बक्षिस दिलं आणि जिथं रायनाकाचा देह पडला तिथं स्मारक बनवलं गेलं......शिवरायांचे गडकोट , मेटे सांभाळणारी रायनाकाची जमात निष्ठावंत आणि विश्वासू असूनही फितुरीचा शिक्का माथी मारला गेला......


वाडीमध्ये " ब्राह्मणवाडा " कुंभारबाव अजूनही त्याच नावाने ओळखल्या जातात...हवालदाराचं घर , कारखानीसाच्या घराची जोती अजूनही खाणाखुणा सांभाळून आहेत.....वाडीपासून बाहेर पडल्यानंतर गडाच्या किंचितशा चढणीवर काही थडगी दिसतात....चाळीस वर्षे रायगड किल्ला जंजिरेकर सिद्दीकडे होता.....सिद्दी अंबर , खैर्यतखान यांच्याकडून पेशव्यांनी गड जिंकला....रायगड आणि रायगडवाडी ताब्यात असताना , सिद्दीच्या सैनिकांची ती थडगी असावीत असा एक तर्क करता येतो.....


काळ आणि गांधारीच्या मधोमध वसलेल्या , टकमक टोकाचा उत्तुंग कडा शतकानुशतके पाहत असलेली ही वाडी म्हणजे स्वराज्याची दौलतच .......


शब्दांकन - रामजी कदम 

माणगाव रायगड

[02/09, 10:45] Mangaon Kadam: अपरिचित रायगडाचा घेरा ( भाग तिसरा ) 


छत्रपती शिवरायांच्या खासगी अंगरक्षक बाजी कदमांचं " कोंझर "......


राजधानी रायगडाचा पहिला टप्पा कोंझरपासून सुरू होतो....कोंझर हे शिवकालीन महत्वाचं लष्करी ठाणं......पाचाडमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष नेहमीच असल्याने सैन्याचा तळ इथेच पडत असे......


छत्रपती शिवरायांनी गोवेलेकर सावंतांना स्वराज्यकार्यात आणले आणि याच कोंझरची चौकी त्यांच्याकडे सोपवली......आजच्या कोंझर गावात शिरताना भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाजवळ ही चौकी असल्याचे उल्लेख सापडतात......गावात भवानीमातेचं मंदिर आणि ग्रामदैवत वाघजाई देवीचं देऊळही आहे.....


सरदार बाजी सूर्याजी कदम हे याच कोंझर गावचे .....छत्रपती शिवाजी महाराजांच्या  अंतिम निर्वाणाच्या वेळी राजवाड्यातील दालनात जी मोजकीच तीन चार मुत्सद्दी मंडळी होती त्यात बाजी कदम उपस्थित  असल्याची नोंद आढळते......यावरून छत्रपती शिवरायांचे अतिशय विश्वासू अंगरक्षक म्हणून बाजी कदमांचं कर्तृत्व कळतं......महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर 1689 मध्ये रायगडाला वेढा पडला असताना , छत्रपती राजाराम महाराजांना वाघ दरवाज्यातून खाली उतरवून , थेट जिंजीपर्यत ज्यांनी साथसोबत केली ते हेच बाजी सूर्याजी कदम.......परमुलुखातून शत्रूला हुलकावणी देत देत , वेशांतर करून जीवावर उदार होत आमच्या गादीच्या वारसाला सुखरूपस्थळी पोहोचवणारे शूर बाजींचे स्मरण आजही इथले कदम वंशज करतात........पण नाही चिरा , नाही स्मारक ..... 


कोंझरमध्ये कदम , देवगिरीकर , पवार , भद्रिके , जाधव, घोलप , महाडीक अशा उपनामांची कुटुंबं राहतात......ब्रिटिश काळातही इथल्या स्वातंत्र्यसैनिकांनी गावाचं नाव केलं होतं....सुरबा नाना टिपणीसांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात कोंझरमधल्या अनेकांनी सहभाग घेतला होता......पारतंत्र्यातील हिंदुस्थानातून ब्रिटिशांना " चलेजाव " चा इशारा दिला गेला ....देशभक्तीचे बाळकडू उपजतच असलेल्या कोंझरवासीयांनी यात उडी घेतली......तुकाराम परशुराम कदम , सिताराम शंभू महाडीक,  बाळू हबाजी घोलप , रघुनाथ परशुराम पवार आणि यांचं नेतृत्व करणारे विष्णुपंत केरू खातू यांनी सक्रिय सहभाग घेतला.....महाडजवळच्या खिंडीत सत्याग्रहींची धरपकड सुरू झाली .....तत्कालीन इंग्रज सरकारने यांना तुरूंगात डांबले .....महाराजांच्या मावळ्यांनी देशासाठी हालअपेष्टा सोसल्या.....आणि आज महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत कोंझर गावचे हे पाच पांडव समाविष्ट झालेले दिसून येतात.......


कोंझर गावात आजही काही जुनी पडीक जोती दिसतात......काळाच्या ओघात गावपण हरवलं असलं तरी या शिवकालीन खेड्यात गेल्यानंतर ठायी ठायी इतिहास बोलू लागतो......गांधारी नदीच्या काठावर वसलेल्या या कोंझरमध्ये सरदार बाजी सूर्याजी कदमांचं स्मारक होणं उचित ठरेल.....थोरल्या महाराजांची सावली बनून राहिलेल्या बाजींचा इतिहास अजूनही दुर्लक्षित राहिलाय.....


गाव विकासाच्या वाटेवर असून , शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेलं आहे.....राजमाता जिजाऊ विद्यालय कोंझर ह्या ज्ञानमंदिरातून अनेक विद्यार्थी घडले.......वसंत तुकाराम कदम , विठ्ठल रामचंद्र कदम , संभे गुरूजी , नागे गुरूजी यांच्यासारख्या दूरदृष्टी लाभलेल्यांनी शिक्षणाचा पाया रचला .....तर द्वारकानाथ घोलप , शंकर भद्रिके यांच्यासारख्या ज्ञानयोग्यांनी कळस चढवण्याचं काम केलंय...... कोंझरमधील सुशिक्षित , सुसंस्कृत पिढी हे त्याच कार्याचं फलित दिसून येतंय......


माजी सभापती संजय चिखले , माजी सरपंच निलेश देवगिरकर यांच्यासारख्या राजकीय जाण असलेल्या नेत्यांमुळे विकासगंगा गावात पोहोचलेली दिसते......


छत्रपती शिवरायांचा निष्ठावंत मावळा बाजी सूर्याजी कदमांच्या स्मृती जागवत असलेले हे कोंझर म्हणजे शिवकालीन इतिहासाचे कोंदणच जणू.......


शब्दांकन - रामजी कदम 

माणगाव- रायगड

Featured post

Lakshvedhi