Monday, 6 September 2021

 अंकनाद स्पर्धेतून मुलांच्या प्रतिभेला वाव

- सुभाष देसाई

·       राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे पारितोषिक वितरण

 

            मुंबईदि. 6 : राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात पार पडला. यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित या उपस्थित होत्या. 

            शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था तसेच मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील 7 गटातील प्रातिनिधिक 7 विजेत्यांना श्री.देसाई यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

            या स्पर्धेसाठी राज्यभरातून 1382 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यशस्वी विद्यार्थ्याना प्रत्येक गटात राज्य पातळीवर रुपये 11 हजार7 हजार,  5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे पारितोषिके म्हणून देण्यात आली.

            भारतीय संस्कृतीतील चांगल्या परंतु काळाच्या ओघात मागे पडलेल्या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न अंकनाद पाढे स्पर्धेतून होत आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमांतून मराठी भाषेचे वैभव पुढे येत असल्याने शासन अशा उपक्रमास प्रोत्साहन देत आहे. गणितासारखा भीती वाटणारा विषय अंकनादच्या उपक्रमातून नादमधूर होत आहे. गणिताच्या वाटेला जे जात नाहीतत्यांनाही हा प्रवास आवडायला लागेल. त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळेलअसे मराठी भाषा मंत्री श्री. देसाई म्हणाले.

            अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणाल्या, ' ताल,  नाद याबरोबर गणिताचा प्रवास पुढे जात आहे,  हे महत्वाचे आहे. यशस्वी व्हायचे असेल तर पाढयांना पर्याय नाही. मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय या शासनाने घेतला ही राज्यासाठी महत्वाची बाब आहे.

            पारितोषिक विजेते :  स्वराज कुलकर्णी ( प्रथम क्रमांक,  बाल गट ),  कैवल्य खेडेकर ( प्रथम क्रमांकइयत्ता दुसरी-तिसरी गट)शाश्वत कुलकर्णी (द्वितीय क्रमांकइयत्ता दुसरी- तिसरी गट ),  सृष्टी कुलकर्णी ( प्रथम क्रमांक,  इयत्ता सहावी सातवी गट )दामोदर चौधरी (द्वितीय क्रमांक,  इयत्ता सहावी-सातवी गट )कृतीका किणीकर ( प्रथम  क्रमांकइयत्ता आठवी ते दहावी गट ),  दामोदर चौधरी ( प्रथम,  खुला गट ) यांना गौरविण्यात आले.

            यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादेमॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशीसंचालक पराग गाडगीळमराठी काका उर्फ अनिल गोरेसमीर बापट,  निर्मिती नामजोशी,  वैशाली लोखंडेरसिका सुतार,  पार्थ नामजोशी उपस्थित होते

 गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीयधार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे

मुख्यमंत्र्यांचे राज्यातील पक्ष - संघटनांना कळकळीचे आवाहन

·        जनतेचे आरोग्य महत्वाचेउत्सव नंतरही साजरे करू

·        कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते

 

            मुंबई, दि. :  कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेतामी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो कीत्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रमसभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकतामात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाहीजनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्याअसे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे.

            राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतचपण सत्ताधारीविरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे कीआता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सणउत्सव आले आहेतत्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेलपण शेवटी आपले आरोग्यप्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू.

तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणतात की, 'हे उघडा ते उघडाया मागण्या ठीक आहेतपण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहेआपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सणउत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतीलपण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तरशासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहागर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभासंमेलनांना उत्तेजन देऊ नकाहीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.

            मला वारंवार आपणांस  हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहेकारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहेअसेही मुख्यमंत्री म्हणतात.

            दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.

            महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे नव्हेकोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या लाटेने जीवन अस्ताव्यस्त केले. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३०,००० नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाहीतर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.  सरकार सुविधा निर्माण करीलपण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा असेही मुख्यमंत्री आवाहनात म्हणतात.

0000

 परवा चर्चा करताना आई म्हणाली, 

अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न 

पीताही दारु पिल्याचा अभिनय किती 

सुरेख करतात.


आता आईला कोण सांगणार --- 

दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय

 करण्यापेक्षा, 


दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करण किती अवघड असते ते ! 


 अखिल भारतीय श्रावण संपल्यावर बसू संघटना 😂😂😂😁😁😁😃😃

 #ब्राह्मण व्यवसाय संघ 

#रत्नागिरी 

#तेजस खरे 8275442741

दिनांक २४/०८/२०२१ 


पणती मॉडेल नंबर १.


आता गणपती /दिवाळी सजावटीसाठी पटापट विद्युत उर्जे शिवाय उत्कृष्ट रोषणाई करा.


रिटेल किंमत : ५०/-रुपये प्रति नग (उद्पादन भारता मध्ये बनविलेले )


होलसेल किंमत :४०/प्रति नग( ५० नगा साठी)


होलसेल किंमत :३५/प्रति नग( १०० नगा साठी)


कुरिअर चार्जेस वेगळे लागू होतील. 


पाण्यावर पणती पेटविणे हा  साक्षात साई बाबा यांनी चमत्कार साऱ्या विश्वाला दाखविला होता.


पण त्याच आधारे एक विशिष्ट कौशल्य वापरून आम्ही तयार करून आपल्यासाठी आणत आहोत पाण्यावर पेटणारी पणती.


ज्या पणती मध्ये फक्त आपणास  पुरेसे पाणी ओतायचे आहे,  आणि आपली पणती ज्योती सकट प्रखर  पेटती होणार.


आमच्या पणतीचे फायदे :- 


१) कापूस वातीची गरज नाही.

२) तेलाची गरज नाही.

३) हवेवर सुद्धा पणती बंद होणार नाही.

४) पुरेसे पाणी  पणती मध्ये ओतल्यावर पणती पेटणार.

५) पाणी ओतून दिल्यावर पणती बंद होईल.

६) उपयोग नसताना पणती मधील पाणी ओतून पूर्णपणे पाण्याचा ओलावा साफ करून बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.

७) सजावट आणि  डेकोरेशन साठी उत्तम पर्याय.

८) पूर्णपणे टिकावू आणि हाताळण्यासाठी सोप्पे.

९) कसलाही धोका नाही.

१०)विद्युत प्रवाह ची गरज नाही.

११) महत्वाचे म्हणजे हे संपूर्णपणे भारता मध्ये बनलेले उत्पादन आहे.


लगेच ऑर्डर देण्यासाठी गुगल पे

तेजस खरे 8275442741

 🙏 परेल, मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा रुग्ण 24 तासाच्या आत घेऊन जाणे ) या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, रुग्णाच्या मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये  ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

जगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे (न्युरोसर्जन) हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर  मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

 💐🙏🏻💐🙏🏻💐👍👌

माहीती सर्वाना कळवा फायदा होईल .

 राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा

असे नाव देण्यात येणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 2 : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम केले आणि त्यामुळेच राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा असे नाव देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष वर्षा धाबेप्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरेप्रदेश उपाध्यक्ष प्रकाश लेणेकर,महासचिव प्रमिलाताई भिसेकोषाध्यक्ष शाम वानखेडेआयोजन समिती प्रमुख शिवराज शिंदेप्रसिध्दी प्रमुख जयप्रकाश पाटीललोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगेसांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीकेशवराव भोसले यांच्या नावाने नाटक आणि संगीत क्षेत्रातील कर्तृत्ववान कलाकरांसाठी राज्य पुरस्कार सुरु करण्याबाबत शासन विचार करेल. मात्र तत्पूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रने याबाबतचा परिपूर्ण प्रस्तावमार्गदर्शक तत्वे याबाबतची सांस्कृतिक कार्य विभागाला सादर करावी. संगीत नाटक क्षेत्रातील होतकरु विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याबाबतही विचार करण्यात येईल.

            संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे जयंतीपुण्यतिथी कार्यक्रम शासकीय पातळीवर करण्यात यावेत याबाबत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाला कळविण्यात येईल. संगीतसूर्य केशवराव भोसले कलासाहित्य आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याबाबतही विभागामार्फत विचार करण्यात येईल. येत्या 4 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे होणाऱ्या सांगता कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

 टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा

नायर रुग्णालयाला 100 कोटी रुपयांचा निधी

                              - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

 

            मुंबईदि. 4-  टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्यावतीने 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेखमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरेमहापौर श्रीमती किशोरी पेडणेकरआमदार यामिनी जाधवउपमहापौर सुहास वाडकरमहापालिका आयुक्त इकबालसिंह चहलनायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेजनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था आज शतायुषी होते आहेहे समाधान काही वेगळे असून या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. संस्था निर्माण केल्यावर जीव ओतून इतरांना जीवदान देण्याचे काम या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केले आहे. आज मंदिरेप्रार्थनास्थळे बंद आहेतदेव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रूपात रुग्णांचा जीव वाचवत आहे. कोविडचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होतेसुरुवातीला या संकटाची दहशत होतीमात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे राज्य सरकारप्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्रया कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.

            कोविडच्या अगोदर शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली होतीआता त्याची काही माहिती उपलब्ध असेल असे वाटत नाहीमात्र यापुढे कोणताही विषाणू येईल त्यावेळी कोरोनाकाळात आपण काय केलेकाय करायला हवेयाची  अधिकृत नोंद करण्याची आवश्यकता असून ही माहिती 50-100 वर्षानंतरदेखील उपलब्ध होईल या दृष्टिने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवतानाच या संस्थेला जेव्हा दोनशे वर्षे पूर्ण होतील त्यावेळी इतिहासात या रुग्णालयाच्या कार्याची निश्चितच नोंद होईल, असेही   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

            शंभर वर्षांपूर्वी अनेक दानशूरांनी दान दिले, मदत केली म्हणून आज आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून जीवनदान मिळाले आहे. टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय या संस्थेला 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतानाच शंभर वर्षांनंतरही लोकांसाठी हितकारक ठरेल असे काम करून दाखवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

            2005 च्या मुंबईतील पूरानंतर लॅप्टोडेंग्यूचा धोका वाढला होता त्यावेळी चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात पहिली लॅब सुरु झालीनंतर कोरोनाच्या काळात चाचण्यांसाठी सुरुवातीला कस्तुरबा आणि पुण्याची एनआयव्ही अशा दोनच प्रयोगशाळा होत्या आज या प्रयोगशाळांची संख्या सहाशेच्या वर गेल्या असून पूर्वी सात-आठ हजार खाटांची क्षमता असलेल्या या राज्यात आता साडेचार लाख खाटा वाढल्या आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तपासणीसाठी नायर रुग्णालयातच एकमेव जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

            शतकपूर्तीवर्षे असलेल्या या संस्थेचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान असून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेऊन संस्थेने केलेल्या कार्याचा पालकमंत्री अस्लम शेख यांनी यावेळी गौरव केला. फ्रंटलाईन वर्कर्ससाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या भरीव उपाययोजनांची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

            नायरसारखी मुंबईतील सर्व रुग्णालये ही मुंबईकरांची हृदयस्थाने असून कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या काळात नायर रुग्णालयाने केलेल्या सेवेचा महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी गौरव केला. भविष्यातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीदेखील महापौरांनी यावेळी दिली.

            याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इम्युनॉलॉजीशल्यक्रिया कौशल्य आणि संगणकाधारित शिक्षण या तीन प्रयोग शाळांचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागनिर्मित  पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या गणेशोत्सव 2021’ या माहितीपुस्तिकेचे तसेच नायर रुग्णालयातील डॉक्टर्सकर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना कोविड काळात आलेल्या अनुभवांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते  प्रकाशन करण्यात आले.  भारतीय टपाल विभागाने नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त जारी केलेल्या विशेष टपाल कव्हरचे प्रकाशन आणि संस्थेच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या भित्तीचित्राचेदेखील यावेळी अनावरण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरातील विविध रुग्णालयांमध्ये कोविड काळात केलेल्या व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही यावेळी मान्यवरांनी प्रकाशन केले. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

0000

Featured post

Lakshvedhi