महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगभरात वैशिष्ट्यपूर्ण- विष्णू मनोहर
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी मालवाच्या दैनंदिन जीवनातील अन्नाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून येथील खाद्य पदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पोषणासोबतच समृद्ध जीवनशैलीसाठी महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती पूरकपोषक आहे. अशा महोत्सवाच्या माध्यमातून या अनोख्या खाद्य संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा. भूक लागली आहे, तरीही आपण इतरांना देतो, ही आपली संस्कृती असल्याचे ही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सात्विक आहाराचे महत्त्व सांगताना, ज्वारी, बाजरी, नाचणी या पौष्टिक धान्यांवर आधारित पदार्थांचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी गजानन महाराजांच्या जेवणाच्या’ ३२ पदार्थांच्या उल्लेख असलेल्या कवितेचे सादरीकरण केले. तसेच औरंगजेबाने शिवाजी महाराजांबद्दल केलेली प्रशंसा त्यांनी साभिनय उद्धृत करून उपस्थितांना भारावून सोडले.
No comments:
Post a Comment