राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी परिविक्षाधीन आय.ए.एस. अधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले की, भावी अधिकारी म्हणून तुम्ही ‘सार्वजनिक प्राधिकरण’ म्हणून काम कराल. तुमचे निर्णय, आदेश व कृती या सर्व गोष्टी माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येतात. त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी निधी, आमदार निधी तसेच विविध शासकीय योजना राबविताना पारदर्शकतेचा अवलंब करणे गरजेचे आहे. जनतेचा विश्वास टिकवणे हेच चांगल्या प्रशासनाचे लक्षण असून, माहिती आयोगाची भूमिका नागरिक आणि शासन यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याची गरज आहे, असेही राहुल पांडे यांनी सांगितले.
माहिती अधिकार कायद्याद्वारे शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा अत्यंत उदात्त हेतू साध्य होत असल्याचे नमूद करुन शासनातील कार्यपद्धती अधिक खुली आणि पारदर्शक बनविण्यासाठी न्यायालयीन कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण क यांसारख्या उपक्रमांना चालना मिळाल्याचेही पांडे यांनी सांगितले.
सामाजिक विषमतेचा विचार करून कायद्यांची अंमलबजावणी वास्तववादी दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे, असेही राज्य माहिती आयुक्त श्री. पांडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment