डॅशबोर्डची पूर्णता अत्यावश्यक असून त्यामध्ये त्रुटी नसाव्यात असे सांगून अपर मुख सचिव रेड्डी म्हणाले की, डॅशबोर्डमध्ये कोणतीही चूक राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व माहिती एकाच ठिकाणी, डॅशबोर्डवर उपलब्ध असेल याची खात्री करा. प्रत्येक विद्यापीठाने स्वतःचा डॅशबोर्ड तपशीलवार तपासावा आणि त्यातील सर्व माहिती अभ्यासून पूर्ण करावी. सर्व प्रलंबित मुद्दे ३० नोव्हेंबरपर्यंत निकाली काढावेत, असे ही रेड्डी यांनी सांगितले.
राज्यभरात याबाबत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. उच्च शिक्षणातील डिजिटल पारदर्शकता, प्राध्यापक भरती प्रक्रियेची गती, आणि शैक्षणिक गुणवत्तेचे उन्नयन यासाठी डॅशबोर्ड हा केंद्रबिंदू ठरणार असून, ३० नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी राज्यातील विद्यापीठांसाठी निर्णायक ठरणार आहे.
०००००
No comments:
Post a Comment