Sunday, 30 November 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन pl share

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन :

 अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन


            मुंबई दि.30- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सुचना पुस्तिकेचे व भित्तीपत्रकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते रविवारी (दि. 3०) राजभवनमुंबई येथे करण्यात आले.

            यावेळी बोलताना राज्यपालांनी डॉ आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. ज्येष्ठ आर्य समाजी नेते आत्माराम अमृतसरी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यास मदत व शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगितले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समरसता व बंधुभाव या मूल्यांच्या प्रचार प्रसारासाठी आपण विविध तालुक्यांना भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. आजपर्यंत आपण गुजरात येथील 11 गावांना भेट दिली असून त्याठिकाणी ग्राम स्वच्छतावृक्षारोपणग्रामसभादलित - आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजनशाळेत मुक्काम व दुसऱ्या दिवशी शिवारावर जाऊन लोकांना नैसर्गिक शेतीचे महत्व पटवणे हा उपक्रम सुरु केला असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात देखील हा उपक्रम सुरु करणार  असल्याचे  त्यांनी  सांगितले.

            यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधवडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे तसेच समितीचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

000


शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू'

 शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू'

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. 26 :  शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यासअचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावीयासाठी  एसटी महामंडळाची 1800 221 251 या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहेअशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

            राज्यभरातील लाखो विद्यार्थी - विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी एसटी महामंडळ बस फेऱ्या उपलब्ध करून देत असते. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा - ये करण्यासाठी मासिक पासमध्ये 66.66 टक्के सवलत दिली जाते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो.

पुणे जिल्हा रुग्णालयाला तीन वाहनांची देणगी

 पुणे जिल्हा रुग्णालयाला तीन वाहनांची देणगी

·         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण

 

मुंबईदि.२६ - गेस्टम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनपुणे यांच्या संयुक्त उपक्रमातून महिला व बाल आरोग्यसुरक्षा आणि जनजागृती सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पुणे जिल्हा रुग्णालयास तीन वाहनांचे देणगी स्वरूपात वितरण करण्यात आले. आरोग्य भवन येथे या वाहनांचे वितरण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले.

 

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले कीमहिला आणि बालकांच्या आरोग्यविषयक सेवांना अधिक वेग आणि परिणामकारकता देण्यासाठी उद्योग क्षेत्राचे असे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. या वाहनांमुळे आपत्कालीन सेवाजनजागृती मोहिमा आणि आरोग्य कार्यक्रमांची गतिमानता निश्चितपणे वाढेल.

 

कार्यक्रमाला होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. कॅरोलिन डीवाल्टरमुख्य संचालन अधिकारी शकील शेख उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अँड परम आनंदवसीम शेख आणि सचिन करंजुले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

सार्वजनिक-खासगी सहकार्यातून राबविण्यात आलेली ही पुढाकार योजना राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावीसक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी  सकारात्मक पाऊल ठरत आहे.

राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पॅकेजच्या दरामध्ये वाढ केली असून, अनेक नवीन आजारांचा

 

राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पॅकेजच्या दरामध्ये वाढ केली असूनअनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. त्याचा कॅन्सर रुग्णांनाही फायदा होईल. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्‍णांना उपचार पश्‍चात सेवा द्यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून व टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या तांत्रिक सहकार्याने राज्यात 26 ठिकाणी डे - केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जिल्हास्तरावर त्यामुळे कॅन्सर रुग्णांना सेवा उपलब्ध होईल. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या भेटीत "डे केअर" तांत्रिक सहकार्य व प्रशिक्षण याबाबत चर्चा झाली. महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत समावेश असलेल्या रुग्णालयांनी सेवा अधिक प्रभावी करण्यासंदर्भात काही सूचना असल्यास आरोग्य विभागाच्या अभ्यास गटाला द्याव्यात असे आरोग्‍य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

कॅन्सरमुक्त महाराष्ट्रा’चा राज्य शासनाचा निर्धार

 कॅन्सरमुक्त महाराष्ट्रा’चा राज्य शासनाचा निर्धार

-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई  दि. 26 :- सार्वजनिक आरोग्य विभाग व टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्य संयुक्त प्रयत्नांतून ‘कॅन्सर मुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प सिद्धिस नेऊया असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागाची पाहणी केली. आधुनिक कॅन्सर उपचार पद्धतीची माहिती घेतली. टाटा मेमोरियल सेंटरचे ऑल इंडिया डायरेक्टर डॉ. सुदीप गुप्ताटाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईचे डायरेक्टर डॉ. सी. एस.प्रमेशडेप्युटी डायरेक्टर श्रीखंडेडेप्युटी डायरेक्टर सिद्धनाथ लष्कररुग्णालय सुपरिटेन्डन्ट डॉ. विनीत सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेअलीकडच्या काळात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनेही राज्यभर कॅन्सर तपासणी व उपचार मोहीम राबवली जात आहे. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर निर्मूलनासाठीचे चांगले काम सुरु आहे.

राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पॅकेजच्या दरामध्ये वाढ केली असूनअनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. त्याचा कॅन्सर रुग्णांनाही फायदा होईल. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्‍णांना उपचार पश्‍चात सेवा द्यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या

आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे

 आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे

 

मुंबईदि. 26 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  2026 या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्था अर्थात इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर डेमोक्रॅसी अँड इलेक्ट्रोल आसिस्टस (आयडीईएया आंतर-सरकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार आहेत. 3 डिसेंबर 2025 रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे होणाऱ्या सदस्य देशांच्या परिषदेत ते औपचारिकरीत्या अध्यक्षपद स्वीकारतील. आगामी वर्षभर ते या संस्थेच्या सर्व महत्त्वाच्या परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

1995 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय आयडीईए ही संस्था जगभरातील लोकशाही प्रक्रियेचे बळकटीकरण करण्यासाठी कार्यरत आहे. सध्या 35 देशांचे या संस्थेचे सदस्यत्व असून अमेरिका आणि जपान हे निरीक्षक देश आहेत. समावेशकलवचिक आणि जबाबदार लोकशाही व्यवस्थांचा प्रसार हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

अध्यक्षपद मिळणे हा भारताच्या निवडणूक आयोगाच्या जागतिक प्रतिष्ठेचा मोठा सन्मान मानला जात आहे. जगातील सर्वात विश्वसनीय आणि अभिनव निवडणूक व्यवस्थापन संस्थांपैकी एक म्हणून भारताच्या निवडणूक आयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. भारत हा आयडीईए चा स्थापक सदस्य असून विविध लोकशाही उपक्रमांमध्ये त्याचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.

अध्यक्ष म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांचे आयोजन करण्यातील भारताचा अनुभव हा संस्थेच्या जागतिक कार्ययोजनेत वापरण्याचा मानस आहे. निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्यात ज्ञान-विनिमयव्यावसायिक नेटवर्किंग आणि पुराव्यावर आधारित जागतिक निवडणूक सुधारणा यांना या सहकार्यातून गती मिळणार आहे.

जवळपास एक अब्ज मतदार असलेल्या भारताची पारदर्शक आणि सुबद्ध निवडणूक प्रक्रिया ही जगासाठी आदर्श मानली जाते. आगामी वर्षभर भारत आपल्या उत्तम पद्धती आणि अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षण संस्था (इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयडीईएम) ) आणि आयडीईए यांच्यात संयुक्त कार्यक्रमकार्यशाळा आणि संशोधन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दिशाभूल करणारी माहितीनिवडणूक हिंसाचार आणि मतदारांचा विश्वास कमी होणेया जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही भागीदारी अधिक प्रभावी ठरणार आहे.

स्थापनेपासून आयआयडीईएम ने भारतासह जगभरातील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. संस्थेने आतापर्यंत 28 देशांबरोबर सामंजस्य करार केले असून 142 देशांतील 3169 निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली इसीआय आणि (आयडीईए) एकत्रितपणे भारताच्या तांत्रिक व प्रशासकीय नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण व प्रसार करण्याचे काम पुढे नेणार आहेतअसे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धापत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन · २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन · तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

 नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन

·         २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

·         तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

 

नाशिकदि. २६ : श्रद्धापावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोधचिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीनदोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठविता येणार असून देशभरातील जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावेअसे आवाहन विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.

 

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. तो दर बारा वर्षांनी एकदा राज्यातील नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर भरतो. अमृत मंथनाच्या आख्यायिकेत येणारा हा कुंभमेळा श्रद्धापवित्रता आणि नवनिर्माणाच्या शाश्वत चक्राचे प्रतीक आहे. बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वरनाशिकची समृद्ध संस्कृतीमंदिरे आणि घाटांचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रतिबिंब या कुंभमेळ्यात दिसते.

 

नाशिकमधील रामायण स्थळांची भव्यतानाशिकचे घाटत्र्यंबकेश्वर आणि गोदावरी नदीचा शाश्वत प्रवाह दोन्ही शहरांना एकत्र जोडतो. कुंभमेळा एक चैतन्यशील आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आध्यात्मिक उत्सव म्हणून वाढत असताना २१ व्या शतकाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करतो. देशाच्या परंपरेत रुजलेली एक ताजी आणि गतिमान दृश्य ओळख निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. नवीन बोधचिन्हाची ओळख भूतकाळातील आवृत्त्यांच्या वारशावर आधारित असेल. भक्ती आणि एकतेची कालातीत भावना अशा स्वरूपात साकार करणारी पाहिजे. आधुनिकसंदर्भात्मक आणि भारत आणि जगभरातील विविध प्रेक्षकांसाठी आकर्षक असे बोधचिन्ह असावे. एवढेच नव्हेतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या संस्कृतीवारसास्थापत्यविधी आणि नैसर्गिक सौंदर्यातून सहभागींना प्रेरणा मिळू शकेल. बोधचिन्ह संस्मरणीय असावे. ते सर्व व्यासपीठांवर श्रद्धाउत्सव आणि कालातीत परंपरा व्यक्त करेल. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक साराचे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक हे बोधचिन्ह असावे.

 

बोधचिन्हासाठी

 कमाल आकार ५ एमबी (पीडीएफ) असावा.

 स्पर्धेत दिलेल्या लेआउटनुसार बोधचिन्हाची डिझाइन ए १ आकाराच्या पोस्टरवर असावे.

 बोधचिन्हाची रंगीतकृष्ण्धवल प्रतिमा आणि बोधचिन्हाबाबत माहिती देणारी १५० शब्दांची टिपणी असावी.

 स्वाक्षरी केलेल्या आणि स्कॅन केलेल्या अटी आणि शर्तींची कमाल आकार १ एमबी (पीडीएफ) फाईल.

 संकल्पना टीपपोस्टरप्रतिमाफाइल नावासहअर्जदाराची ओळख स्थापित करण्यासाठी नावसंस्थेचे नाव किंवा कोणतेही संदर्भ यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती नसावी.

 या निकषांचे पालन न करणाऱ्या नोंदी अपात्र ठरवल्या जातील.

 सहभागींनी वर नमूद केल्याप्रमाणे दोन स्वतंत्र फाइल्स सादर कराव्यात. योग्यरित्या स्वाक्षरी केलेले घोषणापत्र नसल्यासप्रवेशिका अपात्र ठरवली जाईल.

 ही स्पर्धा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खुली आहे. डिझाइनआर्किटेक्चर आणि कला क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

 ही स्पर्धा व्यावसायिक डिझायनर्सकलाकारब्रॅण्ड डिझायनर्स आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडू शकणाऱ्या सर्वांसाठी खुली आहे.

 प्रत्येक सहभागीला फक्त एक प्रवेशिका पाठविण्याची परवानगी राहील. सहभागी स्पर्धकाचे वय किमान १२ वर्षे असावे.  एखाद्या गटाने प्रवेशिका दिली असेलतर एका व्यक्तीला संघाचा प्रमुख आणि प्रवेशिका म्हणून मानले पाहिजे.

 बोधचिन्हाची दृश्य ओळख विशिष्ट ओळख घटकांसह प्रदर्शित केलेली पाहिजे.

 रंगांचा पॅलेटदृश्य आकृतिबंधटाइपफेसदृश्य अँकर आणि त्याचे अनुप्रयोग जसे कीसाइनेजब्रँडिंगस्ट्रीट फर्निचरप्रवेश पासस्टेशनरीझेंडेव्यापारी माल इत्यादींवर दाखवले पाहिजे.

 

अधिक माहितीसाठी www.mygov.in  किंवा ntkmalogocompetition@gmail.com  या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.

सुनियोजित तैयारी और नागरिकों के सहयोग से भूमिगत मेट्रो परियोजना सफल

 सुनियोजित तैयारी और नागरिकों के सहयोग से भूमिगत मेट्रो परियोजना सफल

-प्रबंध निदेशक अश्विनी भिडे

• दिवंगत बी.जी. देशमुख व्याख्यानमाला में भूमिगत मेट्रो निर्माण की यात्रा का किया सविस्तर वर्णन

मुंबई27 नवंबर: मुंबई में सुगम और निर्बाध परिवहन सुनिश्चित करने के लिए मेट्रो और कोस्टल रोड जैसे बड़े बुनियादी प्रकल्पों का महत्व अत्यंत विशिष्ट है। इन परियोजनाओं के दौरान शुरुआती चरण में कानूनी व पर्यावरणीय अनुमतियातकनीकी कठिनाइयाँ और नागरिकों की विभिन्न चिंताए-इन सभी चुनौतियों का समाधान सुनियोजित तैयारीपारदर्शी संवादविभिन्न विभागों के समन्वय और जनता की भागीदारी से हुआयह जानकारी मुख्यमंत्री कार्यालय की अपर मुख्य सचिव तथा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन की प्रबंध निदेशक अश्विनी भिडे ने दी।

भारतीय लोक प्रशासन संस्थान की महाराष्ट्र शाखा द्वारा आयोजित दिवंगत बी.जी. देशमुख स्मृति व्याख्यानमाला में उन्होंने मेट्रो और कोस्टल रोड परियोजनाओं के पीछे की योजना और कार्यप्रक्रिया का विस्तृत वर्णन किया। सामान्य प्रशासन विभाग (प्रशासनिक नवाचारउत्कृष्टता एवं सुशासन) के अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। संस्थान के अध्यक्ष एवं पूर्व मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रियमानद सचिव विजय सतबीरसिंह और कोषाध्यक्ष विकास देवधर भी उपस्थित रहे।

अश्विनीभिडे ने भारत की पहली पूर्ण भूमिगत मेट्रो — लाइन 3 (कोलाबा से सीप्ज़) — की संपूर्ण जानकारी प्रस्तुति के माध्यम से दी। उन्होंने बताया कि पूर्ण

फ्लश टैंक में मतदाता पहचान पत्र मिलने पर जानकारी देने का मुंबई उपनगर जिला उप-निर्वाचन अधिकारी का आवाहन

 फ्लश टैंक में मतदाता पहचान पत्र मिलने पर जानकारी देने का

मुंबई उपनगर जिला उप-निर्वाचन अधिकारी का आवाहन

 

मुंबई27 नवम्बर: मुंबई उपनगर जिले के अंधेरी क्षेत्र में एक टॉयलेट फ्लश टैंक में चुनावी मतदाता पहचान पत्र मिलने संबंधी एक समाचार और वीडियो क्लिप कुछ मुद्रित एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया में प्रसारित हुई है। लेकिन प्रसारित वीडियो क्लिप से घटन की कोई स्पष्ट जानकारी प्राप्त नहीं हो रही है। संबंधित मीडिया संस्थानों ने बताया है कि यह क्लिप सोशल मीडिया से प्राप्त कर प्रसारित की गई है।

जांच के दौरान घटना का वास्तविक स्थान स्पष्ट नहीं हो सका। इसी वजह से इस समाचार एवं वीडियो क्लिप के संदर्भ में 20 नवंबर 2025 को डी.एन. नगर पुलिस स्टेशन में अज्ञात व्यक्तियों के खिलाफ FIR रिपोर्ट दर्ज की गई है।

मुंबई उपनगर जिले के उप-निर्वाचन अधिकारी ने अपील की है कि यदि किसी भी नागरिक के पास इस क्लिप से संबंधित कोई जानकारी होतो वे अधिकारियों के संज्ञान में लाएं। प्राप्त होने वाली किसी भी जानकारी की संपूर्ण जांच की जाएगीऐसा उप-निर्वाचन अधिकारी ने बताया।

0000


 


Appeal by Mumbai Suburban District Deputy Election Officer to Provide Information on Voter ID Found in Flush Tank

 Appeal by Mumbai Suburban District Deputy Election Officer to Provide Information on Voter ID Found in Flush Tank

Mumbai, Nov 27: A few print and electronic media outlets have reported, along with circulating video clips, that an election voter identity card was found inside a toilet flush tank in the Andheri area of Mumbai Suburban District. However, the circulated video clip does not provide any clarity, and the concerned media houses have stated that the clip was sourced from social media.

Upon investigation, the exact location of the incident could not be ascertained. Consequently, in connection with this news report and video clip, a has been registered at D.N. Nagar Police Station on November 20, 2025, against unknown persons.

The Mumbai Suburban District Deputy Election Officer has appealed that if any citizen has information regarding the clip shown in the report, they should bring it to the notice of the authorities. A thorough inquiry will be conducted based on any input received, the officer said.

0000

फ्लश टँकमध्ये मतदार ओळखपत्र फ्लश टँकमध्ये मतदार ओळखपत्र सापडल्यासंदर्भात माहिती देण्याचे

 फ्लश टँकमध्ये मतदार ओळखपत्र  

फ्लश टँकमध्ये मतदार ओळखपत्र सापडल्यासंदर्भात माहिती देण्याचे


मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन


 


मुंबई, दि. 27 : मुंबई उपनगर जिल्हयातील अंधेरी भागात टॉयलेट फ्लश टँकमध्ये निवडणूक मतदार ओळखपत्र सापडल्याबाबत काही मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांत वृत्त व व्हिडीओ क्लिप प्रसारित झाली आहे. प्रसारित व्हिडीओ क्लिपमधून कोणताही बोध होत नाही. हे वृत्त सोशल मिडिया येथून घेऊन प्रसारित करण्यात आले असल्याचा खुलासा संबधीत माध्यमांनी केला आहे. त्याची चौकशी केली असता घटना कुठे घडली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही बातमी व व्हिडीओ क्लिपच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर. २०२५ रोजी डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबर अहवाल (FIR-१२१८/२०२५) अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तरी देखील या वृत्तातील क्लिपबाबत जर कोणत्याही नागरिकांस माहिती असेल तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहेसापडल्यासंदर्भात माहिती देण्याचे

मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

 

मुंबईदि. 27 : मुंबई उपनगर जिल्हयातील अंधेरी भागात टॉयलेट फ्लश टँकमध्ये निवडणूक मतदार ओळखपत्र सापडल्याबाबत काही मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांत वृत्त व व्हिडीओ क्लिप प्रसारित झाली आहे. प्रसारित व्हिडीओ क्लिपमधून कोणताही बोध होत नाही. हे वृत्त सोशल मिडिया येथून घेऊन प्रसारित करण्यात आले असल्याचा खुलासा संबधीत माध्यमांनी केला आहे. त्याची चौकशी केली असता घटना कुठे घडली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही बातमी व व्हिडीओ क्लिपच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर. २०२५ रोजी डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबर अहवाल (FIR-१२१८/२०२५) अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तरी देखील या वृत्तातील क्लिपबाबत जर कोणत्याही नागरिकांस माहिती असेल तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या १५ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

       अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

       २ डिसेंबर२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २ डिसेंबर२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

        यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ३ डिसेंबर२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

       कर्जरोख्याचा कालावधी १५ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ३ डिसेंबर२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३ डिसेंबर२०४० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरिल दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ३ जून आणि ३ डिसेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

       शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या नऊ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

       अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

       २ डिसेंबर२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २ डिसेंबर२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

        यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ३ डिसेंबर२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

       कर्जरोख्याचा कालावधी नऊ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ३ डिसेंबर२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३ डिसेंबर २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरिल दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ३ जून आणि ३ डिसेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

       शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

                                                            ००००


महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या चार वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

       अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

       २ डिसेंबर२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २ डिसेंबर२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

        यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ३ डिसेंबर२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

       कर्जरोख्याचा कालावधी चार वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी १० सप्टेंबर२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक १० सप्टेंबर२०२९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरिल दरसाल दर शेकडा  .७४ टक्के एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक १० मार्च आणि १० सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

       शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

                                                          

महा-देवा फुटबॉल उपक्रम' अंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

 'महा-देवा फुटबॉल उपक्रमअंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना

विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

- क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबई दि.२७ : राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील फुटबॉलमधील प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी महादेवा फुटबॉल उपक्रम अंतर्गत निवड झालेल्या ६० मुला-मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण विभागमहाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा),वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यूआयएफएआणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफयांच्यात  सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

 

या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ  प्रशिक्षकांकडून प्रशिक्षणआंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधाफिटनेस मॉड्यूल तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक खेळाडूला योग्य संधीसक्षम मार्गदर्शन आणि दर्जेदार सुविधा देण्यात येणार असल्याचे क्रीडामंत्री कोकाटे यांनी सांगितले.

0000

बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे दिव्यांग व्यक्तींना आवाहन

 बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे दिव्यांग व्यक्तींना आवाहन

 

मुंबई दि.२७ : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीमुंबई उपनगर यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतीत सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत दिव्यांगत्वाचा दाखलादोन पासपोर्ट साईज फोटोजन्मतारखेचा दाखला किंवा वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला एक लाखापर्यंत तहसीलदार यांचेकडूनरहिवासी दाखला किंवा जागेचे प्रमाणपत्र रेशनकार्ड. दोन प्रतिष्ठीत व्यक्तीचे दाखले (नगरसेवक/संरपंच/ग्रामसेवक/एस.ई. ओ. यांचेकडून) संबंधित व्यवसायाचे खरेदी कोटेशन १ लाख ५० हजार पर्यंत, राष्ट्रीयकृत बँकेचे नांव व शाखाव्यवसायाचे प्रोजेक्ट रिपोर्ट (सी. ए. कडील) ज्या जागेमध्ये व्यवसाय करणार आहे. त्या जागेची बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड ऑफिसमधील नोंद कागदपत्रे/संमतीपत्र/भाडे प्रमाणपत्रशॉप ॲक्ट लायन्सेस इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर.सी. मार्गचेंबूर (पूर्व)मुंबई – ७१ येथे संपर्क साधावा. योजनांचे अर्ज  कार्यालयात उपलब्ध असल्याचेही मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी प्रसीद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टूर सर्कीटचे आयोजन

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टूर सर्कीटचे आयोजन

-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयाचा कौतुकास्पद उपक्रम

मुंबईदि.29 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून  पर्यटन संचालनालयामार्फत दि. 3, ते 5 डिसेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील चैत्यभूमी येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी टूर सर्किट निःशुल्क असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी  महान कार्यत्यांचे जीवनचरित्रविचार  पर्यटक व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या टूर सर्कीटचा मुख्य उद्देश आहे.पर्यटकांनी या पर्यटन सर्किटचा  लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किट ही केवळ एक पर्यटन संकल्पना नसूनभारताच्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या विचारांना अभिवादन आहे. त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी कार्यसंघर्ष आणि आदर्श या परिपथाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने हाती घेतलेला हा उपक्रमइतिहाससंस्कृती आणि सामाजिक परिवर्तन यांना जोडणारा प्रेरणादायी प्रवास आहे. या परिपथामुळे अनुयायीपर्यटकांना बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची आणि त्यांच्या विचारसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळेल. हा केवळ प्रवास नसूनसमानतास्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची अनुभूती आहे, असे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील चैत्यभूमीराजगृहडॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स महाविद्यालयवडाळाडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनपरळमधील बीआयटी चाळसिद्धार्थ महाविद्यालयफोर्ट या स्थळांचा समावेश आहे.  या टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळे आणि प्रेरणादायी जीवनाचा प्रवाससामाजिक समताशिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे.

            टूर सर्कीट अंतर्गत दररोज 3 बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक/अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवाससहल मार्गदर्शकअल्पोपहार आदी सोयी-सुविधा पर्यटन संचालनालयाद्वारे पुरविण्यात येणार आहेत. पर्यटन संचालनालयाने या सर्किटचे योग्य नियोजन केले असून पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी हे टूर सर्किट महत्त्वपूर्ण ठरेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ  3 डिसेंबर 2025रोजी सकाळी  9.30 वाजता वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समोर गणपती मंदिरशिवाजी पार्क येथे पार पडेल. सदर टूर सर्कीटची सुरुवात चैत्यभूमीदादरमुंबई येथून सकाळी 9.30 वाजता होऊन  सहलीचा समारोप चैत्यभूमी दादर येथे होणार आहे.

000

*सहलीसाठी संपर्क :* 

सूरज चतुर्वेदी - ८१०८१७५५३०

पवन पवार – ७६६६६०३२११                                

पर्यटन संचालनालय चॅटबोट क्र – ९९९३३०८८८३


Featured post

Lakshvedhi