मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केले की, अशा तांत्रिक हस्तक्षेपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, खर्च कमी होईल आणि कृषीक्षेत्रात अधिक नफा मिळेल. AI, ब्लॉकचेन आणि डिजिटायझेशन या तंत्रज्ञानांनी केवळ उद्योगच नव्हे तर शासन प्रणालीतही पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात देशभरातील जवळपास 40 हजार तरुणांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 40 सर्वोत्तम नवीन कल्पक उपक्रमांचा सन्मान करण्यात आला. हे 40 नवीन उपक्रम समाजात आणि अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष परिणाम करू शकतील या उपक्रमांच्या माध्यमातून नागरीकांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment