प्रदर्शनात विविध विषयांवर चचासत्रे
वर्ल्ड फूड इंडिया 2025 च्या दुसऱ्या दिवशी शाश्वतता, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यावर केंद्रित चर्चा झाल्या. भारताला जागतिक अन्नटोपली (ग्लोबल फूड बास्केट) म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने या चर्चा महत्त्वपूर्ण ठरल्या. उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, झारखंड आणि बिहार यांसारख्या राज्यांनी आपली सत्रे आयोजित केली, तर न्यूझीलंड, व्हिएतनाम, जपान आणि रशिया यांनीही आपली प्रगती सादर केली. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (MOFPI) पाळीव प्राण्यांचे अन्न, न्यूट्रास्युटिकल्स, विशेष अन्नघटक, अल्कोहोलिक पेये आणि वनस्पती-आधारित अन्न यांसारख्या विषयांवर 13 सत्रांचे आयोजन केले.
या शिखर परिषदेत 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह 21 कंपन्यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या, ज्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी झालेल्या करारांचे एकूण मूल्य 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. रशिया आणि पोर्तुगाल यांच्यासोबत शासकीय स्तरावरील बैठका झाल्या, ज्यामुळे शेती आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सहकार्याला चालना मिळेल. याशिवाय, FSSAI च्या तिसऱ्या ग्लोबल फूड रेग्युलेटर्स शिखर परिषदेने अन्न सुरक्षा मानकांवर चर्चा केली, तर सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने 24 व्या इंडिया इंटरनॅशनल सीफूड शोद्वारे भारताच्या सीफूड निर्यातीच्या क्षमतेवर प्रकाश टाकला.
No comments:
Post a Comment