महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या कृषी संपत्तीचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले. द्राक्षे, संत्री, आंबा, केळी, डाळिंब, हळद, मिरची आणि लसूण यांसारख्या उत्पादनांनी परदेशी खरेदीदारांचे लक्ष वेधले. या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असली तरी योग्य ब्रँडिंग, पॅकिंग आणि वितरण व्यवस्थेच्या अभावामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या परिश्रमाचे पूर्ण मूल्य मिळत नाही. या व्यासपीठामुळे या उणिवा दूर होऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळतील, असे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
भविष्यातील योजनांबाबत बोलताना मंत्री श्री. रावल यांनी सांगितले की, या प्रदर्शनातील अनुभवाचा उपयोग करून महाराष्ट्र कृषी व पणन मंडळ आणि राज्य शासन शेतकरी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी नवे धोरण आखेल. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी, त्यांची उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचावीत आणि त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी विशेष योजना राबविल्या जातील. शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या उत्पादनांना मागणी आहे हे जाणून त्यानुसार उत्पादन करणे महत्त्वाचे आहे. जागतिक दर्जाच्या उत्पादनावर भर दिल्यास शेतकऱ्यांना निर्यातीचा थेट लाभ मिळेल आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल.”
No comments:
Post a Comment