जिल्हाधिकारी यांना पालकमंत्र्यांशी संपर्क साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. तहसीलदारांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ग्रामसभेला अभियानाची माहिती पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
१७ तारखेला पुणे येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ होणार असून सर्व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आपापल्या जिल्ह्यात याचा शुभारंभ करण्यात यावा असे निर्देश श्री बावनकुळे यांनी दिले पंधरवड्याचा समारोप पवनार येथे होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याचे श्री.बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment