डॉ. मयंक जैन यांनी सांगितले की, जर नैसर्गिक उपायांमध्ये कोणता सुपरस्टार असेल, तर तो बांबूच आहे. महाराष्ट्राने बांबू उत्पादनाच्या दिशेने काही चांगली पाऊले उचलली आहेत, परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जंगल व्यवस्थापनाच्या एकूण उद्दिष्टांपैकी एक चतुर्थांश बांबू लागवड प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे, ही मोठी गोष्ट आहे.
डॉ. शर्मा यांनी सांगितले की, भारतात सध्या ४० मिलियन हेक्टरवर बांबू लागवड आहे आणि ती ५० मिलियन हेक्टरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. बांबूपासून ऊर्जा निर्मिती, पेट्रोलियम तेलाची जागा घेणारे इंधन तयार करणे, तसेच कार्बन साठवणूक शक्य होते. बांबूपासून कार्बन क्रेडिट्सही मिळू शकतात. त्याचबरोबर स्टील उद्योग, रबर उद्योग आणि बॅटरी उत्पादन क्षेत्रातही बांबूपासून तयार होणाऱ्या पदार्थांचा वापर शक्य आहे.
No comments:
Post a Comment