मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जनजागृतीसाठी २०१८ पासून पोषण माह अभियान राबविण्यात येते. पोषण माह सप्ताहात दरवर्षी राज्य उत्कृष्ठ ठरले असून, यंदाही आपण समन्वयाने देशात उत्कृष्ठ काम करून, कुपोषण समूळ नष्ट करण्याकडे वाटचाल करूया.
सुपोषित राज्य करण्यासाठी अंगणवाडी महिलांचा मोठा सहभाग असून, यासाठी १८ हजार पदांची भरती करण्यात आली आहे. मातृवंदना योजना राबविण्यातही राज्य आघाडीवर असून, ६३ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राज्याच्या निरोगी व उज्वल भविष्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. सेविका आणि मदतनीस या पोषण आहाराच्या आधारस्तंभ असून, गावोगावी, घराघरात पोषण, आरोग्य आणि शिक्षण यांचा संदेश पोहोचविण्याचे काम त्या करीत आहेत.
No comments:
Post a Comment