पोषण महा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट सेविका, मदतनीस व अंगवाडी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
आयुक्त कैलास पगारे यांनी राष्ट्रीय पोषण माह राज्यात एकूण ५५३ बाल विकास प्रकल्पातील एक लाख १० हजार ६२९ केंद्रात राबविण्यात येते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील २५ लाख ८२ हजार ३३० बालके, ३ ते ६ वयोगटातील २४ लाख ७४ हजार ४१७ बालके, ४ लाख ३२ हजार २३४ गरोदर महिला व ४ लाख २३ हजार ७५६ स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र शासनाने पोषण माहसाठी सहा विशेष ‘थीम’ ठरविल्या आहेत. यामध्ये लठ्ठपणा कमी करणे, अर्भक व बालक आहार पद्धती, पुरुषांचा बालकांच्या पोषण आणि आरोग्याच्या काळजीत सहभाग, वोकल फॉर लोकल, एकत्रित कृती व डिजीटायझेशन या थीमनुसार विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नव चेतना अभियान राबविण्यासाठी ३७ हजार मदतनीस व सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानही याच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. गतवर्षी गडचिरोली येथून या अभियानाचा शुभारंभ करून देशात राज्य अव्वल ठरले होते. यंदाही उत्कृष्ट कामगिरी बजाविणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
०००
No comments:
Post a Comment