राज्य शासनाने मेट्रो नेटवर्क, अटल सेतूसारखे महामार्ग प्रकल्प, खड्डेमुक्त रस्ते आणि शहर सुशोभीकरणाच्या कामांना गती दिली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून मुंबई-एमएमआरचा विकास वेगाने होईल. गृहनिर्माण धोरणानुसार गिरणी कामगार, झोपडपट्टी रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार महिला सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. गृहनिर्माणाच्या क्लस्टर विकासामुळे मोकळी जागा, खेळाची मैदाने, सोसायटी सुविधा उपलब्ध होत आहेत. धारावी पुनर्विकास हा गृहनिर्माण पुनर्विकासातील सर्वात मोठा टप्पा ठरणार आहे, जो जगभरातून पाहायला लोक येतील.
No comments:
Post a Comment