वर्धा जिल्ह्यातील जळगाव ग्रामपंचायतीच्या
साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार नाही
- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि. ९ : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीमधील साहित्य खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नसल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. गोरे बोलत होते.
कोणत्याही कारणाशिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी अचानक जळगाव ग्रामपंचायतीची चौकशी केल्याचे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले की, ही चौकशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले. त्यानंतर गट विकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीमध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या खरेदीची सखोल चौकशी करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहितीही मंत्री श्री. गोरे यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment