खाणकामानंतर निर्माण झालेल्या
खड्ड्यांच्या पुनर्वापरासाठी नियोजन
– महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. ९ : खाणकाम पूर्ण झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या मोठ्या खड्ड्यांचा पुनर्वापर करण्यासाठी १२ जानेवारी २०१८ रोजी जारी अधिसूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य कृपाल तुमाने यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
तलाव, जलसाठा, मत्स्यव्यवसाय किंवा कचरा व्यवस्थापनासाठी या खड्ड्यांचा वापर केला जावा, असे निर्देश असल्याचे सांगून महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने याबाबत प्राधान्याने पावले उचलावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वडार समाजाला ५०० ब्रासपर्यंत उत्खननाची परवानगी तत्काळ द्यावी, यासाठी शासनाने नियम ठरवले आहेत. कोल्हापूरमधील खाण बुजवण्याच्या कामासाठी स्थानिक प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करुन तत्काळ अंमलबजावणी करावी, असेही महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सर्व दगड व वाळू खाणींवर ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून, खाण क्षेत्र, रॉयल्टी व उपलब्धता याची नियमित तपासणी केली जात आहे.
No comments:
Post a Comment