Sunday, 29 March 2026

AI आधारित प्रणालीद्वारे पाणीपुरवठा, गुणवत्ता, दाब आणि वापर यांचे रिअल-टाईम विश्लेषण केले

 AI आधारित प्रणालीद्वारे पाणीपुरवठागुणवत्तादाब आणि वापर यांचे रिअल-टाईम विश्लेषण केले जात असून नागरिकांच्या अभिप्रायाचे स्वयंचलित विश्लेषण करून सेवेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहे. तसेच GIS व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिओटॅगिंगनकाशे व निर्णय सहाय्य प्रणाली (Decision Support System) विकसित करून नियोजन आणि निर्णयप्रक्रिया अधिक अचूक करण्यात आली 

ई-गव्हर्नन्स अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने नाविन्यपूर्ण व प्रभावी उपक्रम राबवून कार्यक्षम

 ई-गव्हर्नन्स अंतर्गत पाणी पुरवठा    स्वच्छता विभागाने नाविन्यपूर्ण व प्रभावी उपक्रम राबवून कार्यक्षमपारदर्शक आणि नागरिकाभिमुख सेवा प्रणाली विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), IoT, GIS आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून पाणीपुरवठा व्यवस्थापनतक्रार निवारण आणि सेवा वितरण अधिक सक्षम करण्यात आले आहे

१५० दिवसांच्या ई – गव्हर्नन्स कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला तृतीय क्रमांक

 १५० दिवसांच्या ई – गव्हर्नन्स कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता

विभागाला तृतीय क्रमांक

मुंबईदि. २९ : राज्य शासनाच्या १५० ई – गव्हर्नन्स  कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्थामहामंडळेप्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत ५७ मंत्रालयीन विभागांपैकी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २०० पैकी १७०.५० गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा गौरव प्रदान करण्यात आला.


तक्रार निवारणाचा दर 97 टक्के

 तक्रार निवारणाचा दर 97 टक्के

 

तांत्रिकदृष्ट्या एससीईआरटीची वेबसाइट 100 टक्के सुरक्षितप्रमाणित आणि मोबाइल सुसंगत असून दररोज एक हजाराहून अधिक वापरकर्ते या वेबसाइटला भेट देत आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत आवश्यक माहितीचे प्रकटीकरणही पारदर्शकपणे करण्यात आले आहे. तक्रार निवारण प्रक्रियेत 10 पैकी 9.7 इतका चांगला समाधान दर नोंदवला गेला आहे.

 

एकूणचकृत्रिम बुद्धिमत्ताजीआयएस आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून एससीईआरटीने शिक्षण क्षेत्रात आधुनिकपारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. परिषदेने सुरू केलेले हे कार्य यापुढे अधिक प्रभावीपणे राबविले जाईलअसा विश्वास विद्यमान संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.


तंत्रज्ञान आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग

 तंत्रज्ञान आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग

 

डॅशबोर्ड प्रणालीद्वारे डेटा व्हिज्युअलायझेशन आणि नियमित अपडेट्समुळे जिल्हास्तरापर्यंत निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम झाली आहे. डिजिटल हजेरी आणि इतर उपक्रमांचे रिअल-टाइम मॉनिटरिंगही प्रभावीपणे केले जात आहे. तसेच जीआयएस तंत्रज्ञानाच्या वापरातून राज्य ते शाळा स्तरापर्यंत हीटमॅप्सद्वारे उपस्थिती व अध्ययन कामगिरीचे विश्लेषण करण्यात येत आहे. यामुळे जोखीम ओळखतफावत विश्लेषण आणि लक्ष्यित नियोजन अधिक परिणामकारक ठरत आहे.

 

चॅटबॉट च्या माध्यमातून शंकांचे निराकरण

 चॅटबॉट च्या माध्यमातून शंकांचे निराकरण

 

नागरिकाभिमुख सेवांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचा प्रभावी वापर करण्यात आला असून नागरिकांच्या शंकांचे स्वयंचलित निराकरणयोजनांची माहिती आणि अलर्ट्स देण्यात येत आहेत. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सेवा उपलब्ध असल्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एआय च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन

 एआय च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन

 

एससीईआरटीने एआयच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचे आणि एकूण प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले आहेत. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करून शिक्षक व प्रशासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ झाले आहे. डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रातही परिषदेने लक्षणीय प्रगती केली असून एकूण 152 पैकी 135.5 गुण मिळवत उच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-ऑफिस प्रणालीत 100 टक्के अंमलबजावणी करत 96.94 टक्के फाइल्स निकाली काढण्यात आल्या आहेत. सर्व 92 कर्मचारी ई-ऑफिसवर सक्रिय असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान झाले आहे.

 

Featured post

Lakshvedhi