Sunday, 26 February 2023

कंपन्या, उद्योगांशी समन्वय साधत रोजगार उपलब्ध करून देणार

 कंपन्या, उद्योगांशी समन्वय साधत रोजगार उपलब्ध करून देणार

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा


बोरिवली रोजगार मेळाव्यात 7,138 पदांकरीता विविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती.

            मुंबई, दि. 25 : कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्याबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कौशल्य विकास विभागातर्फे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्राशी समन्वय साधत आगामी काळात पाच लाख रोजगार देण्यात येतील. त्यासाठी राज्यभरात 300 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.


            बोरिवली येथील सेंट फ्रान्सिस अभियांत्रिकी महाविद्यालयात कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. या कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त मुकेश संखे, माजी नगरसेवक जगदीश ओझा, जितेंद्र पटेल, हरीश छेडा यांच्यासह गणेश खामकर, दिलीप पंडित, निखिल व्यास आदी उपस्थित होते.


            कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत झालेल्या या रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील 7 हजार 138 पदांसाठी नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्यात साधारण 529 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यातील 373 उमेदवारांची विविध पदांसाठी प्राथमिक निवड झाली असून 18 उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. या मेळाव्यात 33 उद्योग तथा कंपन्यांनी सहभाग घेतला.


5 लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट : मंत्री मंगलप्रभात लोढा


            मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात 5 लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल.


            मेळाव्यात सुमित फॅसिलिटीज लिमिटेड, स्पॉटलाईट, एनआयएसए सिक्युरिटीज, पियानो प्रेसिडेल, मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन, कल्पवृक्ष, जस्ट डायल, डीएसटीए एज्युकेशन फाऊंडेशन, राज सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, कॅटलिस्ट टॅलेंट मॅनेजमेंट, थॉमस रिक्रुटमेंट सोल्यूशन, सब्र रिक्रुटमेंट, टेलिएक्सेस बीपीओ, पवार एंटरप्राइजेस, फन अॅण्ड जॉय ऍट वर्क, एलआयसी ऑफ इंडिया, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन, टाटा स्ट्राइव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम आदी विविध कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.


000

चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी1 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन.

 चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी1 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर, मुंबई येथे 250 मुलींची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष 2022- 2023 मध्ये सुरू होणार आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी घाटकोपर येथील इमारत क्रमांक 4 मधील 14 सदनिकांमध्ये या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी 1 मार्च 2023 पर्यंत विद्यार्थिंनींकडून अर्ज मागविण्यात आले असून, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


            सन 2022-2023 मधील चेंबूर येथील मुलींचे वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत 4 था मजला, चेंबुर, मुंबई, गृहपाल, संत मीराबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, बीडीडी चाळ क्रमांक 116, वरळी, मुंबई, गृहपाल, गुणवंत मुलींचे वसतिगृह, सर्वोदय नगर, मुलुंड, मुंबई येथे 1 मार्च 2023 पर्यंत होईल.


            प्राप्त अर्जावरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी


विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही. वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता अशी : विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, विद्यार्थिनीकडे उत्पन्नाचा दाखला असावा, विद्यार्थिनी सन 2022-2023 मध्ये महाविद्यायालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावी, विद्यार्थिनी स्थानिक रहिवासी नसावी, विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा.


वरीलप्रमाणे पात्र असलेल्या विद्यार्थिनींनी विहीत मुदतीत वसतिगृहात प्रवेश अर्ज सर्व आवश्यककागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


 

जिवन गाणे गात राहावे







 

बीकानेर स्वीट्स & स्नॅक्स च्या फरसाण मध्ये अळी🐛 मिळाल्या आहेत

 दिनांक २४/०२/२०२३ ला बीकानेर स्वीट्स & स्नॅक्स च्या फरसाण मध्ये अळी🐛 मिळाल्या आहेत 

तरी अलिबागकरानी यांच्या कडुन खरेदी करताना विचार करून खरेदी करा या अगोदर पण स्वीट्स मध्ये अळ्या सापडण्याची घटना घडली आहे.

अन्न व औषध प्रशासन या कडे कधी लक्ष देणार ?

नागरीकांच्या जिवाशी खेळ कधी पर्यंत खेळणार?


वणवा

.                       *वणवा*
*डोंगरांना वणवे लावणाऱ्यांना हा फोटो दाखवा, त्यांच्या मनामध्ये मुक्या पशुपक्षांविषयी जराशी संवेदना जागी झाली तरं निसर्गाचे भले होईल ...*
*वणवा नका लावू आणि कोणी लावत असेल तर लावू देऊ नका ...*
*ऐकत नसेल तर किंवा कुठे वणवा लागलेला दिसला तर १९२६ या टोल फ्री नंबर वर माहिती द्या.* 🚔✊👊

देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हिस्सा अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न-

 देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हिस्सा अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई दि. 25 : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन इकॉनॉमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यात महाराष्ट्र 1 ट्रिलीयन इकॉनॉमी देऊन देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा क्रमांक अग्रेसर ठेवेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


            मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे एबीपी नेटवर्कच्या “आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023” (Ideas of India Summit 2023) पर्व दुसरे कार्यक्रमास मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.


            या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, गेल्या 8 महिन्यांत आमच्या शासनाने अनेक महत्वपूर्ण आणि विकासाला चालना देणारे निर्णय घेतले. समृध्दी महामार्ग, मुंबई मेट्रो, मुंबईतला सागरी महामार्ग, आपला दवाखाना, मुंबईतल्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट भूमिपूजन यासह 5 हजार किलोमीटरचे एक्सप्रेस कंट्रोल हायवे विकसित करण्याचे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत.


            रस्ते,रेल्वे आणि समुद्री मार्ग बनवून केवळ देशालाच नाही तर जगाला अनुकरणीय असे परिवहन योजना आणण्यात महाराष्ट्र पुढे राहील. समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे,कोस्टल रोड आणि एमटीएचएल मार्ग हे महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


            राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे चांगले सहकार्य मिळत आहे. केंद्र सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात 13हजार 539 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्रतील रेल्वे विकासासाठी मिळाला आहे. दावोस येथे झालेल्या परिषदेत विविध उद्योग समुहांशी 1 लाख 55 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यातून दीड लाख रोजगार निर्मिती होत आहे. याशिवाय ‘मित्रा’ समितीची स्थापना, आर्थिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात अधिक गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न होणार आहेत. कौशल्य विकासाबरोबरच पायाभूत सोयी सुविधा यांच्या निर्मितीवर भर देण्यात आला असून महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी रोडमॅप तयार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


एबीपी नेटवर्कच्या श्रीमती रुबिका यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मुलाखत घेतली.


000

Saturday, 25 February 2023

ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा...तुकाराम या गजरात

 ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा...तुकाराम या गजरात

17 व्या कामगार साहित्य संमेलनाचा ग्रंथ दिंडीने शुभारंभ


पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन.

          सांगली दि. 24 (जि.मा.का.) : ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा... तुकाराम.. जय जय राम कृष्ण हरी..... गजरात 17 व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.


            छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभूषा करून सहभागी झालेले युवक आणि संबळ वाद्य वाजवणारी गौरी वायचळने ग्रंथ दिंडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळस कट्टा, हाती ब्रेल लिपीत लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व मुखाने ज्ञानोबा... तुकाराम .. जय..जय राम... कृष्ण हरी... असा हरी नामाचा गजर करीत ग्रंथ दिंडीत सहभागी झालेले कै. सु.धा. घोडावत या अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ग्रंथ दिंडीत अंध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चमू सोबत वासुदेवानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कामगार साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ही ग्रंथ दिंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महापालिका कार्यालय, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रवेशद्वार या मार्गावरून बालगंधर्व नाट्यमंदिर पर्यंत काढण्यात आली. ग्रंथ दिंडीत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कामगार विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.


           ग्रंथ दिंडी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे पोहोचल्यानंतर विं. दा. बालमंच, डॉ.शंकरराव खरात ग्रंथ दालन आणि लोकशाहीर पट्टे बापूराव कविता भिंतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


०००००




 


                                                                                                                       



Featured post

Lakshvedhi