Wednesday, 5 June 2019

सर्व खादाडांकरता

Dr. Vijay Athalye.

थोडा वेळ जगन्नाथ दीक्षित, र्ऋतुजा दिवेकर बाजूला ठेवा, 
शांततेने वाचा,
   
Enjoy करा......कारण "ब्राम्हण भोजन प्रीया: असे सुभाषीत आहे" 

माणसासारखंच पदार्थांना पण सहजिवन असावे असे मला नेहमी वाटते.. एकमेकांना खमंग खुसखुशीत साथ देत ते एकमेकांमधली रूची वाढवत असावेत..

जसं गोबऱ्या गालाच्या टम्म फुगलेल्या पुरीला साथ द्यावी ती श्रीखंड, बासुंदीनेच..
कोणात तिचे लाड पुरवायची ताकद नाही.. 

सौंदर्यवती जिलबीला साजेसा राजस जोडीदार म्हणजे मसाले भातच.. बाकी मठ्ठा म्हणजे तिचा सेवक.. तिचं सगळं सगळं एकणारा..

पुरणपोळीच्या सुखदुःखात तिला साथ देते प्रत्यक्ष तिची सवत कटाची आमटीच.. काही लोक तिला आमरसाचं स्थळ आणू पाहतात पण ते काही खरं नाही..

ढोकळा या पदार्थांच्या अंगात इतक्या नाना कळा आहेत ना.. त्या सहन कराव्या त्याच्या girlfriend चिंच खजुराच्या चटणीनेच.. दोघं एकत्र आले की धमाल करतात..

मिसळ बहुधा मेषेची किंवा सिंह राशीची असावी.. तिच्या जहालपणाशी समतोल ठेवतो तिचा लाडका पाव.. मुळातच शांत स्वभावाचा.. काही कमी पडू देत नाही तो तिला..

उपम्याचा मात्र वरचष्मा शेवेवर.. तिला काही भाव खाऊ देत नाही तो..
इडली, डोसा, सांबार, चटणी सगळे एकत्र सुखाने नांदतात.. अगदी न भांडता..

लोण्याने तर जणू जन्म भराच्या आणाभाका घेतल्या असाव्यात थालीपीठासोबत..

चिवडा आणि चकली मात्र खेळगडीच.. आपल्याच मस्तीत खेळणारे.. जणू चिवडा खेळ हरायला लागला की चकलीला चिडवत असावा चक चक चकली..

मोठ्या घरचा लाडू कधीकधीच खेळायला येतो त्यांच्यासोबत.. आणि लाडू बेसनांकडचा असेल तर त्याची आई त्याला बेदाण्याची तीट लावून मगच बाहेर पाठवत असावी.. 

शंकरपाळी अन् करंजी सारख्या भांडतात.. एका वेळी खेळायला येत नाहीत..

ह्या सगळ्यांमध्ये सोज्वळ ब्रम्हचारी एकच.. ऊकडीचा मोदक.. त्याचा दिमाखच वेगळा.. नाही म्हणायला तुपाकडून सेवा करुन घेतो.. पण जोडीदार मात्र कोणी नाही त्याचा.. तो असाच एकटा.. अनभिषिक्त राजासारखा...!!

सर्व खादाडांकरता

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना हि नवीन योजना राज्यात सुरु करण्यास मान्यता देणेबाबत







पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र.


हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच!

प्रिय नचिकेत, 
(प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो).
चिरंजीव, आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे, ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर.
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल.

हल्ली आपण खोकत असता.

खोकला थंड पेयाचा दिसत नाही.

आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.

हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात.

जेवण जात नाही.

त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे.

गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात.

पण एक सांगतो ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत.

तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल.

आमची मिलेट्री अकौंटमधील नोकरी आता काही दिवसाची राहिली आहे, तेव्हा पुढची भिस्त आपल्यावर रहाणार नसली तरी आपली भिस्त आमच्यावर ठेऊ नये हि माफक अपेक्षा.

प्रेमं जरुर करा, पण सोबत अर्थार्जन पण हवे.

प्रेमाने मंडईत भाजी फुकट मिळत नाही कि वाण्याकडुन किराणा माल.

अधिक काही बोलत नाही.

आपण सुज्ञ असाल किवा आहात अशी आशा करतो.

आपल्या लग्नानंतर आपणास आमच्या घरात रहायचे असल्यास लिव लायसन्स चे अॅग्रीमेंट बनवण्यात येईल. 

सोबत वीजपट्टी आणि पाणीपट्टी आकारण्यात येईल.

जेवण मातोश्रींना बनवण्यास लावलेत तर त्याचा आकार त्या त्या वेळी लावण्यात येईल व ती रोख स्वरूपात वसुल केली जाईल.

अगदी थोडक्यात आणि मोजकेच सांगायचे झाल्यास लवकर कामाला लागा.

आपला जन्मदाता!

                  - पु. रा. खवचट.

               पुणे  तेथे  काय   उणे.

ही कविता लिहिणाऱ्याला लाखो सलाम


कसे आहात ?
मजेत !
मी ?
मी पण मजेत !

अरे वा काय कमाल आहे ?
मी मजेत
तुम्ही मजेत
मग दुःखी कोण आहे ? 

दुःखी ?
कुठंय कोण दुःखी ?
या एका प्रश्नावर
सारी जनता मुकी !

दुःख कुणी सांगत नाही
हेच मोठं दुःख
सुखी मात्र कुणीच नाही 
एवढं मात्र पक्क !

दुःखाला वाटते
हसण्याची भीती
रोज सोबत राहून सुद्धा 
माणसं राहतात रीती !

एकमेकाचा रितेपणा
घालवावाच लागेल
तरच माणूस चार दिवस
मजे मध्ये जगेल  !

बोलता बोलता हासलं की 
डोळ्यात येतं पाणी 
मग बघा दुःखाचीही
होतात गोड गाणी 

कुणाच्याही दुःखाची
करू नका टिंगल
दुसऱ्याला हासल्यावर
कसे होईल मंगल ?

आपल्या बद्दल इतरांना
विश्वास वाटला पाहिजे
"आतलं दुःख सांगताना"
आधार वाटला पाहिजे 

काळजाच्या कपारीतली
सल सांगत जावी 
वेदना कमी करण्यासाठी 
फुंकर घालत जावी 

मग बघा माणसं कशी 
आपसूक जवळ येतात
एकमेकाच्या दुःखाला 
अलगद कवेत घेतात 

इथे मजेत राहण्याचा
एकच उपाय आहे
मन मोकळं करण्यासाठी 
माणूस हवा आहे!!!

व्हॉट्सअॅप वरील मूर्ख लोकांची लक्षणे एकदा नक्की वाचा

मूर्ख –
फ्री मध्ये बॅलन्स, मोबाइल, pendrive, T-shirt मिळेल. असे मेसेज फॉरवर्ड करणारे. (फक्त लिंक वर क्लिक करा आणि क्लिक करतच रहा व नेटपॅक संपवा. शिवाय या वस्तू कधीच कोणाला भेटल्या नाहीत.)

काही वेडे –
ही मुलगी हरवली आहे हिला हिच्या घरी पोहचवा. या मध्ये कुठेही तारखेचा उल्लेख नसतो, मुलीच्या आई वडिलांचा फोन नंबर / पत्ता नसतो. फोन नंबर असलाच तर लागत नसतो. आला मेसेज की लागले फॉरवर्ड करायला…!

अतीवेडे –
ॲक्सिडेंटच्या बातम्या/फोटो पाठवतात, जे की दोन तीन वर्षाआधी झालेले असतात. यात कधीच तारीख नसते. आयुष्यभर फॉरवर्ड करतात.

बावळट –
 कोणत्याही देवाचा फोटो, संदेश , पत्ते, 108 वेळा लिहा, १२१ वेळा लिहा असे लिहून, फॉरवर्ड नाही केले तर वाईट बातमी मिळेल अशी धमकी देऊन लोकांना फॉरवर्ड करायला सांगाणारे. काय हो, देव कृपाळू आहे, त्याला व्हिलन का बनवताय ?

मंदबुद्धि –
 “पुजारी मंदिरात पूजा करत होता नंतर एक साप/ माकड आला आणि त्याने माणसाचे रूप घेतलं” हा मेसेज पाठवा लॉटरी लागेल. (अरे मूर्खा, तुझीच नाही लागली तर आमची काय लागणार?)

काही दीड शहाणे –
 आताच जन्माला आलेल्या मुलाच्या गळ्यात पिन फसली आहे ऑपरेशनला 50 लाख लागणार. बायपास 10 लाखात होते. कोणत्या ऑपरेशनला 50 लाख लागतात भाऊ?

अती शहाणे –
 अशाच प्रकारे भावूक, हृदयद्रावक मेसेज टाकून सांगतात की फॉरवर्ड करा. यामुळे प्रति शेअरिंग 50 पैसे व्हॉट्सअप कडून मिळतील. कधी मिळणार? कसे मिळणार ?कोण व्हॉट्सअप चा माणूस पैसे आणून देणार…? ऑफिस कुठं आहे व्हॉट्सअप चं, माहित आहे का ? 

बेअक्कल –
 “मेसेज पुढे पाठवा बॅटरी फुल चार्ज होईल किंवा कुलूप उघडेल (म्हणजे physics नावाची काही गोष्ट आहे की नाही?)

जडबुद्धी –
 एखाद्याचे महत्वाचे डॉक्यूमेंट सापडले आहेत . हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. (अरे, डॉक्यूमेंट वर त्याचा पत्ता आणि नंबर नाही का? ते आधी नीट बघा.)

अजून काही वेडेपणा –
आज दुपारी 12:30 to 3:30 यावेळेत काॅस्मो किरणे मंगळावरुन पृथ्वीवर प्रवेश करणार आहेत. यावेळेत तुमचा मोबाईल शक्यतो स्विच आॅफ ठेवा आणि शरीरापासून दूर ठेवा कारण काँस्मो किरणे खुपच घातक ठरु शकतात अस NASA नी BBC NEWS वर थोड्या वेळापूर्वी जाहीर केलंय. म्हणजे जणू काही हे येडं BBC हे english channel रात्रंदिवस पाहत असतं. आणि हे असे मेसेज पोस्ट करून वर सांगितात….
जास्तीत जास्त शेयर करा किंवा हा मेसेज सगळ्या ग्रुप वर पाठवा. लगेच पाठवा (जसं काही सगळ्या जगाची काळजी या मूर्खांवरच पडली आहे. )

तेव्हा, फालतू मेसेज पाठवून स्वतःचा आणि दुसऱ्यांचा वेळ वाया घालवू नका आणि मोबाईलला कचरा पेटी नका बनवू….!

बोधकथा

‘ईगो’ (Ego) म्हणजे नक्की काय?

एकदा एक कावळा आपल्या पंजात मांसाचा एक भला मोठ्ठा तुकडा घेऊन उडत चालला होता. 

त्याचा विचार होता की एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मांसाचा तुकडा शांतपणे गट्ट करावा. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे त्याच्या मागे लागली आहेत.

ती गिधाडे बघुन तो कावळा घाबरला. त्याला वाटले की ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहेत. 

त्या गिधाडांच्या तावडीतुन सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना.

कावळ्याची चांगलीच दमछाक झाली. त्याला काही फार उंचावरून उडता येईना. एक गरूड ही गंमत बघत होता. 

शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘का रे बाबा! काय भानगड आहे? तु एवढा घामाघुम का झाला आहेस?’
तो कावळा म्हणाला, ‘ हे गरूडा! ही गिधाडे केव्हापासुन माझ्या मागे लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत. त्यांच्यापासुन बचाव करण्यासाठी मी अजुन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे.’
.
कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला, ‘ अरे ती गिधाडे तुझ्यामागे नाहीत, तर तुझ्या पंजात असलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागली आहेत.
.
तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते!’
.
कावळ्याने त्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या पंजामधुन सोडुन दिला. मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली.

मांसाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली....

आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक जड तुकडा आयुष्यभर आपल्या डोक्यात ठेवून आपण जगत असतो. या तुकड्याचे नाव आहे ‘ईगो’ (Ego) म्हणजेच ‘मी’ पणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना..!

आपण कोणीतरी खास आहोत, आपण फार हुषार किंवा बुद्धीमान आहोत, आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते, आपण दादा आहोत, आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात. आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घराण्याची अब्रु अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. आपला ईगो कुरवाळत असतात.
मग या साठी शत्रुत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात,

पण ज्यांना ‘ईगो’ नावाचा अवजड तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात.

एकदा तरी आपला ईगो बाजुला ठेवा.. विसरा..सोडून द्या..
बघा काय चमत्कार होतो ते..!

मी आहे नां...!!!

आपल्या आयुष्यांत आलेली 
माणसं ही कांही उगांच 
आलेली नसतात...

प्रत्येक गोष्टीमागं कांहीतरी 
कारण असतं... 

कुणाचं, कुणाशीतरी, कांहीतरी
ऋणानुबंध जुळलेले असतात..!!

अन्यथा आपल्या सव्वाशे कोटी 
लोकसंख्येच्या देशांत नेमक्या 
याच व्यक्तींशी आपली ओळख 
कां होते...? याचं उत्तर कोणीही
देऊ शकत नाही...!!

जी नाती तयार होतात, ती 
आपण जीवापाड जपावी. 
कारण, आपल्या जगण्यासाठी 
ज्या प्राणवायूची गरज असते, 
तो प्राणवायू म्हणजे ही आपली
माणसं... 

रक्ताच्या नात्यांना कांही चॉईस 
नसतो. पण, मैत्रीच्या नात्यांत 
तसं नसतं...It's mutual 
relation... मन जुळलं, की 
मैत्री होते...

जे बंध खूप स्ट्रॉंग असतात, ते 
कोणाच्याही सांगण्यानं किंवा 
विपरीत परिस्थितीत कधीच 
तुटत नाहीत...!! 

आपण खूप वाईट परिस्थितीतून
जात असतांना मित्राचे किंवा 
मैत्रिणीचे " मी आहे नां एवढे
शब्द संजीवनी सारखे कां
वाटतात...? 

अगदी प्रत्यक्ष नाही, पण  
अप्रत्यक्ष सोबत असणं,
खूप सकारात्मक ऊर्जा
देणारं असतं...!! 

पैशांनी श्रीमंत होणं, खूप
सोपं आहे हो... पण,
नात्यांनी समृद्ध होणं,
तितकंच कठीण...!!!

श्रीस्वामी समर्थ...!! 

Featured post

Lakshvedhi