Wednesday, 5 June 2019

मी आहे नां...!!!

आपल्या आयुष्यांत आलेली 
माणसं ही कांही उगांच 
आलेली नसतात...

प्रत्येक गोष्टीमागं कांहीतरी 
कारण असतं... 

कुणाचं, कुणाशीतरी, कांहीतरी
ऋणानुबंध जुळलेले असतात..!!

अन्यथा आपल्या सव्वाशे कोटी 
लोकसंख्येच्या देशांत नेमक्या 
याच व्यक्तींशी आपली ओळख 
कां होते...? याचं उत्तर कोणीही
देऊ शकत नाही...!!

जी नाती तयार होतात, ती 
आपण जीवापाड जपावी. 
कारण, आपल्या जगण्यासाठी 
ज्या प्राणवायूची गरज असते, 
तो प्राणवायू म्हणजे ही आपली
माणसं... 

रक्ताच्या नात्यांना कांही चॉईस 
नसतो. पण, मैत्रीच्या नात्यांत 
तसं नसतं...It's mutual 
relation... मन जुळलं, की 
मैत्री होते...

जे बंध खूप स्ट्रॉंग असतात, ते 
कोणाच्याही सांगण्यानं किंवा 
विपरीत परिस्थितीत कधीच 
तुटत नाहीत...!! 

आपण खूप वाईट परिस्थितीतून
जात असतांना मित्राचे किंवा 
मैत्रिणीचे " मी आहे नां एवढे
शब्द संजीवनी सारखे कां
वाटतात...? 

अगदी प्रत्यक्ष नाही, पण  
अप्रत्यक्ष सोबत असणं,
खूप सकारात्मक ऊर्जा
देणारं असतं...!! 

पैशांनी श्रीमंत होणं, खूप
सोपं आहे हो... पण,
नात्यांनी समृद्ध होणं,
तितकंच कठीण...!!!

श्रीस्वामी समर्थ...!! 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi