Thursday, 4 December 2025

मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम गिनीज बुकमध्ये नोंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान होणार

 मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

गिनीज बुकमध्ये नोंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान होणार

 

·         छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटीत उद्या सोहळा

 

मुंबईदि. ४ : महाराष्ट्राने 'मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक केला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारअपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावेछत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाटऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकरऊर्जा विभागाच्य अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर

 पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती. कागदपत्रांतील त्रुटीपूर्ततेतील विलंब यामुळे अनुदान देण्यास उशीर होत होता. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने ही संपूर्ण अर्जप्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहेअसे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

        ऑनलाईन अर्जप्रक्रियेमुळे अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घराबाहेर न पडतात्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच अर्ज भरू शकतील. अर्जाची सद्यस्थितीही महाडीबीटी पोर्टलवर पाहता येणार आहे. पोर्टलवर अर्ज भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर जाईल. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित शेतकरी किंवा वारसदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे सूचना मिळणार आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांच्या चकरा न मारता त्रुटी ऑनलाइनच दुरुस्त करता येतील.

शेतीत काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या

 शेतीत काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात वारंवार घडतात. अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकार १९ एप्रिल २०२३ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवत आहे. या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन मिळणार

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. 4 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असूनशेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरत असूनपूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘सेवाखंड क्षमापित’ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे

 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवाखंड क्षमापित’ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे

आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होणार

-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

150 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित’ पत्रांचे वितरण

 

मुंबईदि.04 : राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या अस्थायी सेवाकाळातील सेवाखंड कालावधी क्षमापित’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थेत निश्चितच गुणात्मक सुधारणा होईलअसे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले.

 

       निर्णयाचा थेट लाभ १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळणार असून त्यांना विविध आर्थिक व प्रशासकीय लाभ प्राप्त होणार आहेत. आरोग्य भवनमुंबई येथे आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सेवाखंड क्षमापित’ पत्रांचे वितरण करण्यात आले.

 

          राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात २००९ पूर्वी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी अस्थायी स्वरूपात सेवेत होते. वर्ष २००९ मध्ये त्यांचा शासकीय सेवेत समावेश झालामात्र सेवाखंड कालावधी क्षमापित’ न झाल्याने अनेक लाभांपासून ते वंचित राहिले होते. आता या निर्णयामुळे शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सलग सेवेला मान्यता मिळणार आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून पात्र अधिकाऱ्यांना पत्रे प्रदान करण्यात आली आहेत.

            संबंधित पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उर्वरित पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही या निर्णयाचे पत्र देण्यात येणार असल्याचेही मंत्री आंबिटकर त्यांनी स्पष्ट केले.

            यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, शासकीय आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा अधिक परिणामकारकपणे द्यावी. नागरिकांनी खाजगी रुग्णालयांऐवजी सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवावाअशी अपेक्षा आहे. नक्षलग्रस्तडोंगरी व आदिवासी भागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेतनासह विशेष प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठीही वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

         तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रियाविशेष उपचार व तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढावी यासाठी शासकीय रुग्णालयांना विशेष इन्सेंटिव्ह फंड देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे रुग्णालयांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील आणि सेवा गुणवत्तेत वाढ होईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचारासाठी मान्य आजारांची संख्या वाढवून ती २३९९ करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवेतील सर्वांनी समर्पण भावनेने काम करावे, असे आबिटकर यांनी सांगितले.

याप्रसंगी आरोग्य भवनमुंबई येथे पात्र 150 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित’ पत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वर्सोवा मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र में छह महीने के प्रशिक्षण सत्र का आयोजन

 वर्सोवा मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र में छह महीने के प्रशिक्षण सत्र का आयोजन

 

मुंबईदि. 2: मत्स्य व्यवसाय के विकास और विस्तार को बढ़ावा देने के लिएवर्सोवा स्थित मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र में समुद्री मत्स्य व्यवसायनौकायनऔर समुद्री डीज़ल इंजन के रखरखाव और परिचालन पर छह महीने के 135वें सत्र का प्रशिक्षण आयोजित किया गया है। यह प्रशिक्षण 1 जनवरी 2026 से 30 जून 2026 की अवधि के लिए आयोजित किया जा रहा है और पात्र मछुआरों से आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं।

इस प्रशिक्षण में मत्स्य व्यवसाय नौकायन के मूल सिद्धांतसमुद्री डीज़ल इंजन के पुर्ज़ेउनकी मरम्मतमछली पकड़ने के आधुनिक उपकरणऔर प्रैक्टिकल सत्र शामिल हैं। गरीबी रेखा से ऊपर के प्रशिक्षुओं से प्रति माह ₹450 शुल्क लिया जाएगाजबकि गरीबी रेखा से नीचे के प्रशिक्षुओं से प्रति माह ₹100 शुल्क लिया जाएगा।

प्रवेश के लिए पात्रता मानदंड:

इस प्रशिक्षण में प्रवेश के लिएप्रशिक्षु का सक्रिय मछुआरा और शारीरिक रूप से स्वस्थ होना आवश्यक हैऔर उसकी आयु 18 से 35 वर्ष के बीच होनी चाहिए। प्रशिक्षु के लिए तैरना आना अनिवार्य है और उसे कम से कम कक्षा चौथी उत्तीर्ण होना चाहिए।

उसे मछली पकड़ने का कम से कम दो साल का अनुभव और बायोमेट्रिक/आधार कार्ड धारक होना चाहिए। साथ हीउसे मछुआरा संस्था की सिफारिश के साथ पूर्ण आवेदन और गरीबी रेखा से नीचे होने पर संबंधित प्रमाण पत्र संलग्न करना अनिवार्य है।

आवेदन जमा करने की तिथि:

इच्छुक और पात्र मछुआरे 22 दिसंबर 2025 तक निर्धारित प्रारूप में आवेदन पत्रसंबंधित मछुआरा सहकारी संस्था की सिफारिश के साथमत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई-19 में जमा करें।

यह जानकारी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी स. श. भालेराव ने दी है।

 

अधिक जानकारी के लिए संपर्क करें:

•          सचिन भालेरावमत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी (9920201207)

•          जयहिंद सूर्यवंशीप्रशिक्षण निर्देशक (7507988552)

0000


महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा

 महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         इंदू मिल येथील पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार

 

मुंबईदि. 2 : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिले आणि जागरूक केले. या जागरूकतेला अधिक बळकटी देण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण करुयाअसेही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळमाजी मंत्री विजय गिरकरमुख्य सचिव राजेश अग्रवालपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहबेस्ट'च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठीमुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतीमुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयलतसेच विविध विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेचैत्यभूमी परिसरात योग्य मंडप व्यवस्थापिण्याच्या पाण्याची सोय<

Featured post

Lakshvedhi