Thursday, 4 December 2025

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘सेवाखंड क्षमापित’ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे

 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवाखंड क्षमापित’ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे

आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होणार

-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

150 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित’ पत्रांचे वितरण

 

मुंबईदि.04 : राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या अस्थायी सेवाकाळातील सेवाखंड कालावधी क्षमापित’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थेत निश्चितच गुणात्मक सुधारणा होईलअसे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले.

 

       निर्णयाचा थेट लाभ १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळणार असून त्यांना विविध आर्थिक व प्रशासकीय लाभ प्राप्त होणार आहेत. आरोग्य भवनमुंबई येथे आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सेवाखंड क्षमापित’ पत्रांचे वितरण करण्यात आले.

 

          राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात २००९ पूर्वी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी अस्थायी स्वरूपात सेवेत होते. वर्ष २००९ मध्ये त्यांचा शासकीय सेवेत समावेश झालामात्र सेवाखंड कालावधी क्षमापित’ न झाल्याने अनेक लाभांपासून ते वंचित राहिले होते. आता या निर्णयामुळे शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सलग सेवेला मान्यता मिळणार आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून पात्र अधिकाऱ्यांना पत्रे प्रदान करण्यात आली आहेत.

            संबंधित पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उर्वरित पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही या निर्णयाचे पत्र देण्यात येणार असल्याचेही मंत्री आंबिटकर त्यांनी स्पष्ट केले.

            यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, शासकीय आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा अधिक परिणामकारकपणे द्यावी. नागरिकांनी खाजगी रुग्णालयांऐवजी सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवावाअशी अपेक्षा आहे. नक्षलग्रस्तडोंगरी व आदिवासी भागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेतनासह विशेष प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठीही वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

         तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रियाविशेष उपचार व तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढावी यासाठी शासकीय रुग्णालयांना विशेष इन्सेंटिव्ह फंड देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे रुग्णालयांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील आणि सेवा गुणवत्तेत वाढ होईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचारासाठी मान्य आजारांची संख्या वाढवून ती २३९९ करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवेतील सर्वांनी समर्पण भावनेने काम करावे, असे आबिटकर यांनी सांगितले.

याप्रसंगी आरोग्य भवनमुंबई येथे पात्र 150 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित’ पत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वर्सोवा मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र में छह महीने के प्रशिक्षण सत्र का आयोजन

 वर्सोवा मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र में छह महीने के प्रशिक्षण सत्र का आयोजन

 

मुंबईदि. 2: मत्स्य व्यवसाय के विकास और विस्तार को बढ़ावा देने के लिएवर्सोवा स्थित मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र में समुद्री मत्स्य व्यवसायनौकायनऔर समुद्री डीज़ल इंजन के रखरखाव और परिचालन पर छह महीने के 135वें सत्र का प्रशिक्षण आयोजित किया गया है। यह प्रशिक्षण 1 जनवरी 2026 से 30 जून 2026 की अवधि के लिए आयोजित किया जा रहा है और पात्र मछुआरों से आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं।

इस प्रशिक्षण में मत्स्य व्यवसाय नौकायन के मूल सिद्धांतसमुद्री डीज़ल इंजन के पुर्ज़ेउनकी मरम्मतमछली पकड़ने के आधुनिक उपकरणऔर प्रैक्टिकल सत्र शामिल हैं। गरीबी रेखा से ऊपर के प्रशिक्षुओं से प्रति माह ₹450 शुल्क लिया जाएगाजबकि गरीबी रेखा से नीचे के प्रशिक्षुओं से प्रति माह ₹100 शुल्क लिया जाएगा।

प्रवेश के लिए पात्रता मानदंड:

इस प्रशिक्षण में प्रवेश के लिएप्रशिक्षु का सक्रिय मछुआरा और शारीरिक रूप से स्वस्थ होना आवश्यक हैऔर उसकी आयु 18 से 35 वर्ष के बीच होनी चाहिए। प्रशिक्षु के लिए तैरना आना अनिवार्य है और उसे कम से कम कक्षा चौथी उत्तीर्ण होना चाहिए।

उसे मछली पकड़ने का कम से कम दो साल का अनुभव और बायोमेट्रिक/आधार कार्ड धारक होना चाहिए। साथ हीउसे मछुआरा संस्था की सिफारिश के साथ पूर्ण आवेदन और गरीबी रेखा से नीचे होने पर संबंधित प्रमाण पत्र संलग्न करना अनिवार्य है।

आवेदन जमा करने की तिथि:

इच्छुक और पात्र मछुआरे 22 दिसंबर 2025 तक निर्धारित प्रारूप में आवेदन पत्रसंबंधित मछुआरा सहकारी संस्था की सिफारिश के साथमत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई-19 में जमा करें।

यह जानकारी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी स. श. भालेराव ने दी है।

 

अधिक जानकारी के लिए संपर्क करें:

•          सचिन भालेरावमत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी (9920201207)

•          जयहिंद सूर्यवंशीप्रशिक्षण निर्देशक (7507988552)

0000


महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा

 महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         इंदू मिल येथील पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार

 

मुंबईदि. 2 : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिले आणि जागरूक केले. या जागरूकतेला अधिक बळकटी देण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण करुयाअसेही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळमाजी मंत्री विजय गिरकरमुख्य सचिव राजेश अग्रवालपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहबेस्ट'च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठीमुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतीमुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयलतसेच विविध विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेचैत्यभूमी परिसरात योग्य मंडप व्यवस्थापिण्याच्या पाण्याची सोय<

ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करणार

 ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या क्षमतेस चालना देण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात निधी उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात महापारेषण (एमएसईटीसीएल), त्यानंतर महावितरण आणि महानिर्मिती या देशातील मोठ्या वीज कंपन्या सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. या प्रक्रियेसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अनुभवाची मोठी मदत ठरेलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक महानगरपालिकेला खुल्या बाजारातील गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद

 नाशिक महानगरपालिकेला खुल्या बाजारातील गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेयापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनीही खुल्या वित्तीय बाजारातून बॉण्डद्वारे निधी उभारला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या क्लीन गोदावरी बॉण्ड'ला गुंतवणूकदारांकडून सबस्क्रिप्शनसाठी मिळालेला चौपट प्रतिसाद ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक सक्षमतारेटिंग आणि पारदर्शक प्रक्रियेची पावती आहे. राज्यातील 15 महानगरपालिका अशा क्षमतेच्या असून नियमन प्रक्रियेतून विशिष्ट पात्रता आणि नियामक मान्यता पूर्ण करून या महानगरपालिकाही विकासासाठी निधी उभारू शकतात.        

खुल्या बाजारातून उभारलेल्या निधीच्या आधारे केंद्र सरकारकडून पायाभूत विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा मार्गही सुलभ झाला आहे.

तसेच ‘एनएसई’ प्रक्रियेमुळे 26 कोटी रुपये प्रोत्साहन निधी मिळणार असून याद्वारे महानगरपालिकेवरील व्याजभार शून्य टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतोअशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार

 कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         नाशिक महापालिकेचा क्लीन गोदावरी बॉण्डनॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध

·         गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा

 

मुंबईदि. 2 :- दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. विकास भीविरासत भी’ हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश मार्गदर्शक असून कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचेही जतन करण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

       नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा क्लीन गोदावरी बॉण्डसमारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवालनगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के.एच. गोविंदराजनॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, 'मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीविभागीय आयुक्त प्रवीण गेडामकुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री उपस्थित होते.

महाराष्ट्र 'राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

 महाराष्ट्र 'राजभवनझाले आता लोकभवन

 

मुंबई, दि. 2 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत.

 

राजभवन अधिक लोकाभिमुखपारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.   

 

लोकभवन’ म्हणून ओळखले जाणारे राज भवन आता केवळ राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय न राहताराज्यातील नागरिकसमाजातील विविध घटकविद्यार्थीसंशोधकशेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद व सहभाग यांचे एक केंद्र व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

 

'लोकभवनहे सरकार आणि राज्यातील जनतेमध्ये सेवासहकार्य व संवादाचा सेतू व्हावेहीच या नामांतरामागची भूमिका आहेअसे त्यांनी सांगितले.

 

'लोकभवनकेवळ संवैधानिक कर्तव्यांपुरते मर्यादित न राहतासमाजाच्या आशाआकांक्षा आणि समस्यांप्रति संवेदनशील राहून त्यांच्याशी थेट नाते जपणारे खऱ्या अर्थाने लोकभवन असेल असे राज्यपालांनी स्पष्ट केले.


Featured post

Lakshvedhi