Wednesday, 1 October 2025

कवलापूर येथे विमानतळाबाबत तात्काळ सर्वेक्षण करा

 कवलापूर येथे विमानतळाबाबत तात्काळ सर्वेक्षण करा

-         मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

मुंबईदि. ३० : सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावेअसे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

१५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ९ सेवा ऑनलाईन उपलब्ध Pl share

 १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

९ सेवा ऑनलाईन उपलब्ध

 

मुंबईदि. ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नागरिकाभिमुख सेवांचे वेळेत वितरण सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम२०१५ अंतर्गत नऊ सेवांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यापैकी आठ सेवा आता आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

 

उपलब्ध झालेल्या सेवा :

 

१. रस्त्यांवर समांतर किंवा ओलांडून जाणाऱ्या विविध वाहिन्यांसाठी (ऑप्टिकल फायबर केबलगॅसपाणी पाईपलाईन इ.) ना-हरकत प्रमाणपत्र.

२. वीजपाणीसांडपाणी जोडणी व औद्योगिक युनिटसाठी रस्ता खोदकामाकरिता ना-हरकत प्रमाणपत्र.

३. पेट्रोल पंपाच्या पोहोचमार्गाकरिता ना-हरकत प्रमाणपत्र.

४. रस्त्यालगत इमारती बांधकामाकरिता ना-हरकत प्रमाणपत्र.

५. ठेकेदार वर्ग ४ व ४ (अ) मध्ये नोंदणी व नूतनीकरण.

६. ठेकेदार वर्ग ५५ (अ)६ मध्ये नोंदणी व नूतनीकरणसुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची नोंदणीकामगार सहकारी संस्थांचे वर्ग ’ मध्ये वर्गीकरण व नूतनीकरण.

७. ठेकेदार वर्ग ७८ व ९ मध्ये वर्गीकरणकामगार सहकारी संस्था वर्ग ’ मध्ये वर्गीकरणइमारत नोंदणीचे नूतनीकरणनागरी अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे वर्ग ७ मध्ये नूतनीकरण.

८. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील खड्डे बुजविण्याची सेवा.

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार

 महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे

शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

             मुंबईदि. ३० : राज्यातील औद्योगिक व शैक्षणिक परिसंस्थेला ऑस्ट्रेलियन कौशल्यांशी जोडून परिवर्तनशील शिक्षणसंशोधन व उद्योग सहकार्यासाठी महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब उभारण्यात येणार आहे. या हबच्या माध्यमातून ऊर्जापर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात संशोधननवकल्पना व कौशल्यविकासाला चालना मिळणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

 

            आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इनोव्हेशन अँड स्किल्स हबबाबत बैठक झाली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकरतंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकरऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाचे प्रा. डॉ. अजयन विनू डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी.पाटीलमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णीडॉ होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामतसहसचिव संतोष खोरगडेउपसचिव प्रताप लुबाळतसेच अधिकारी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्सस्टेमी उपकरणांचे लोकार्पण

जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम

 

            मुंबई दि. ३० :- आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे. नियमित व्यायामसंतुलित आहारतणाव कमी करणे आणि नियमित तपासण्याद्वारे आपण हृदयरोगापासून आपला बचाव करु शकतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती कक्षात ट्रायकॉग हेल्थ इंडिया या संस्थेच्या वतीने मंत्रालयातील दवाखान्यासाठी देण्यात आलेल्या ५ एईडी डीफ्रेबिलिटर्स आणि स्टेमी उपकरणाचे लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंहउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखट्रायकॉग हेल्थ इंडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चरित भोगराजवैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारीआरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेट्रायकॉग हेल्थ इंडियाचे परेश शिंदेराजीव दासउपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष भोसलेमंत्रालयातील क्लिनिकचे डॉ. प्रमोद निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे १८ दशलक्ष लोक हृदयरोगामुळे मृत्यू पावतात. भारतातही ही समस्या गंभीर आहे. वाढती व्यसनाधीनतातणावअसंतुलित आहारव्यायामाचा अभाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे आणि त्याला जीवनदान देणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आज लोकार्पण झालेल्या या उपकरणांचे विशेष महत्व आहे. मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या ४ हजार कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाल्यास या उपकरणामुळे निश्चितच जीवनदान मिळेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रालयातील दवाखान्याचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. ईसीजी व रक्त तपासणीसाठी रुग्णांना मंत्रालयाबाहेर जाण्याची गरज भासू नयेयासाठी आरोग्य विभागाने व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चरित भोगराज यांनी यावेळी स्टेमी उपकरणासंदर्भात सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांनी केले.

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली

 पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ;

टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणारजीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य

आपत्तीग्रस्तांकडून वसुली नकोबँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबईदि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरीआपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावीअसे निर्देश बँकाना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेशेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळडाळी व आवश्यक वस्तूंचा संच वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणेशेतजमीन खरडून जाणेयावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊनझालेल्या नुकसानीवरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मात्रकेंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे. केंद्राकडून ती रक्कम रिइम्बर्समेंटच्या स्वरूपात मिळेलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


तंत्रज्ञानामुळे महापारेषणची प्रगती :

 तंत्रज्ञानामुळे महापारेषणची प्रगती :   :डॉ. संजीव कुमार

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महापारेषणमध्ये विविध प्रकल्प व संचलन चांगल्या पध्दतीने व वेगाने होत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता वाढली आहे. भविष्यातहीअधिकारी व कर्मचारी नावीन्यपूर्ण काम करून महापारेषणचे नाव नक्कीच उंचावतीलअसे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

नवी दिल्लीत महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान

 नवी दिल्लीत महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी केले अभिनंदन

 

नवी दिल्लीदि. ३० : डन ऍन्ड ब्रॅडस्ट्रीट या संस्थेच्या वतीने दिला जाणारा पॉवर ट्रान्समिशन (स्टेट पीएसयू) पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) मिळाला. केंद्रीय वित्त विभागाचे सहसचिव नवीन अग्रवाल यांच्या हस्ते महापारेषणचे मुख्य अभियंता किशोर गरूड व जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकाबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

नवी दिल्लीतील हॉटेल ताज मानसिंगमध्ये १७ व्या पीएसयू आणि शासन परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय ग्रामीण विकास विभागाचे सहसचिव कुणाल सत्यार्थी उपस्थित होते.

 

महापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी आहे. अति उच्चदाब वाहिन्यांचे जाळे सर्वदूर आहे. महाराष्ट्र राज्याची ३० हजार मेगावॉटपेक्षा अधिक विजेची मागणी महापारेषणने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महापारेषणने वीजक्षेत्रात नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः दुर्गमडोंगराळ भागात ड्रोनच्या सहाय्याने कामे केली जात आहेत. तसेच हाय परफॉर्मेस कंडक्टर बसविण्यात आले आहेत. ग्रिड स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी धुळे व लोणीकंद (पुणे) येथे स्टॅटकॉम प्रकल्प प्रस्तावित आहेत. टी.बी.सी.बी.च्या माध्यमातून प्रकल्पांकरिता खुला सहभाग महापारेषणने ठेवला आहे.

तंत्रज्ञानामुळे महापारेषणची प्रगती : डॉ. संजीव कुमार

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महापारेषणमध्ये विविध प्रकल्प व संचलन चांगल्या पध्दतीने व वेगाने होत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता वाढली आहे. भविष्यातहीअधिकारी व कर्मचारी नावीन्यपूर्ण काम करून महापारेषणचे नाव नक्कीच उंचावतीलअसे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

०००

Featured post

Lakshvedhi