Friday, 5 September 2025

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार

 आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

 

मुंबई,दि. ५ : विद्यापीठ,महाविद्यालय, अभियांत्रिकी, चित्रकला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार यापुढे आता "डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार" या नावाने देण्यात येणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

डॉ. जे. पी. नाईक यांच्या शैक्षणिक कार्याची दखल केंद्र शासनाबरोबरच देश विदेश आणि युनेस्कोने देखील घेतली आहे. त्यांच्या योगदानाबद्दलची कृतज्ञता म्हणून या पुरस्काराला डॉ. जे. पी. नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षकांची होणारी निवड अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्वक खऱ्या अर्थाने समर्पित भावनेने शैक्षणिक क्षेत्रात अध्ययनअध्यापन करून मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांची व्हावी याकरिता निवड प्रक्रियेच्या अटी, निकष कार्यपद्धतीत सुधारणा करून सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.पुरस्कारार्थी


पुरस्कारासाठी अंतिम केंद्रीय छाननी समिती रचना


            समिती सदस्य : अध्यक्ष- कुलगुरू, सदस्य- उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, कला संचालनालय सदस्य असतील तर दोन विषय तज्ञ सहसंचालक, उच्च शिक्षण (मुख्यालय) हे सदस्य सचिव असतील.


राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती


समितीचे अध्यक्ष - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उपाध्यक्ष - उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री, सदस्य अपर मुख्य सचिव,राज्यातील दोन मान्यवर शिक्षण तज्ञ,सदस्य-सचिव संचालक, उच्च शिक्षण हे असणार आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथे ५ सप्टेंबर १९०७ रोजी जन्मलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक हे भारतीय शिक्षण क्षेत्राचे दीपस्तंभ मानले जातात. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देश-विदेशात पोहोचले असून युनेस्कोनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. शिक्षण क्षेत्राला जीवन समर्पित करणाऱ्या या महान विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता “डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार” या नावाने दिला जाणार आहे. या निर्णयातून शिक्षकांचा सन्मान अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Justice Chandrashekhar sworn in as CJ of Bombay HC

 Justice Chandrashekhar sworn in as CJ of Bombay HC

Mumbai Dated 5 : Acting Chief Justice of the High Court of Bombay Justice Shree Chandrashekhar was today sworn in as the Chief Justice of the Bombay High Court.

            Maharashtra Governor C. P. Radhakrishnan administered the oath of office to Chief Justice Shree Chandrashekhar at a brief swearing-in ceremony held at Darbar Hall in Raj Bhavan Mumbai on Friday (5 Sept).  

            After countersigning the oath signed by the Chief Justice, the Governor presented a bouquet of flowers to the Chief Justice and congratulated him. The Chief Minister also congratulated the Chief Justice.


 


Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narwekar, Minister of Skill Development Mangal Prabhat Lodha, Minister of Protocol Jaykumar Rawal, judges of the Jharkhand, Rajasthan, Delhi, Allahabad and Bombay High Court, retired judges and senior government officers were present.


 


            Earlier Chief Secretary Rajesh Kumar read out the Notification of Appointment of the Chief Justice issued by Government of India.


 


            The swearing in ceremony started with the rendition of the National Anthem and State Song and concluded with the playing of the National Anthem by the police band.


 

. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

 न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

 

मुंबई, दि. ५ : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली.

शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. चंद्रशेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.  

शपथविधी सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावललोकायुक्त न्या. (नि.) विद्यासागर कानडे तसेच राजस्थानझारखंडदिल्लीअलाहाबादकर्नाटक व मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश व सेवानिवृत्त न्यायाधीश उपस्थित होते.

सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी न्या. चंद्रशेखर यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दिलखुलास' कार्यक्रमात संचालक डॉ.तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात संचालक डॉ.तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात पुरातत्व व वस्तुसंग्रहालय व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. ८मंगळवार दि. ९बुधवार दि. १०गुरुवार दि. ११ आणि शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच "News on AIR" या मोबाईल अॅपवर प्रसारित होईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            ऐतिहासिक स्मारकेस्थळे आणि कलाकृतींचा शोधअभ्यास आणि दस्तावेजीकरण करणेतसेच त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी 'राज्य संरक्षित स्मारकेम्हणून मान्यता देणेआदी महत्वाच्या कामांसाठी सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय कार्यरत आहे. आपल्या वारसास्थळांचे जतनसंवर्धन आणि संरक्षण करणेऐतिहासिक स्थळांचा उज्ज्वल इतिहास प्रकाशात आणणे आदी महत्वाची कामे संचालनालयामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये नुकतेच महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. तसेच आग्रा येथील स्मारक उभारणीजेएनयूतील अभ्यासकेंद्ररघुजी भोसले यांचा इतिहास, ‘राजगड’ नामकरणाची पार्श्वभूमीवाघनखे महाराष्ट्रात आणणे इत्यादी महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. याविषयी संचालक डॉ. गर्गे यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे.

 

महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते शिक्षक

 महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते शिक्षक

डॉशेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूलअर्धापूरनांदेड)

 

28 वर्षांपासून विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉशेख यांनी ग्रामीण भागातील अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. ‘सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी या उपक्रमातून त्यांनी गावापासून दूर भाड्याच्या जागेत शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलीघरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप सुरू केलेबालभारतीच्या सहावी ते बारावीच्या पुस्तकांसाठी लेखन केले असून त्यांना यापूर्वी राज्य पुरस्कारही मिळाला आहे.

सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबई)

मुख्याध्यापिका सोनिया कपूर यांनी कमी खर्चातील शिक्षण साहित्याची निर्मिती करून सहकारी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. ‘टीच टू एनरिच या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या कपूर यांनी समूह आधारित शिक्षण आणि आयसीटीचा वापर शिक्षणात प्रोत्साहित केलागेल्या 23 वर्षांत विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्ये आणि मूल्ये दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.

महाराष्ट्रातील सहा शिक्षक 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025' ने सन्मानित शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल -

 महाराष्ट्रातील सहा शिक्षक 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025' ने सन्मानित

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

नवी दिल्ली, 5 : शिक्षकांचे समाजातील स्थान सर्वोच्च असून शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतातत्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे. राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 च्या अंमलबजावणीत शिक्षणाला आनंददायी बनवण्यावर भर देत बालिका शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. भारताला कौशल्याची राजधानी आणि सुपर पॉवर बनवण्यात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार  प्रदान करून सन्मानित करण्यात आलेयामध्ये शालेय शिक्षण क्षेत्रातील डॉशेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूलअर्धापूरनांदेड), सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबईआणि उच्च शिक्षण क्षेत्रातील डॉसंदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्सलातूर), डॉनीलाक्षी जैन (शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयमुंबई), प्रापुरुषोत्तम पवार (एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंगबारामती), आणि कौशल्य विकास क्षेत्रातील श्रीअनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानागपूरयांचा समावेश आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे आयोजित या सोहळ्यात 45 शालेय शिक्षक, 21 उच्च शिक्षण आणि 16 कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आलायावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानशिक्षण राज्यमंत्री डॉसुकांत मजूमदारजयंत चौधरीशिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमारकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे (MSDE) सचिव  देबाश्री मुखर्जी यावेळी उपस्थित होते.

या पुरस्काराचा उद्देश शिक्षकांचे समर्पणनाविन्यपूर्ण कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करणे हा आहेमागील काही वर्षांपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातील शिक्षकांनाही संधी देण्यात येत आहे.

 

अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात

 अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार;

बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

        मुंबईदि. ५ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहेअसे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

            अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६११८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. 

          सर्वाधिक बाधित जिल्हे : नांदेड – ,२०,५६६ हेक्टर,वाशीम – ,६४,५५७ हेक्टरयवतमाळ - १,६४,९३२ हेक्टरधाराशिव - १५०,७५३,बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर,अकोला - ४३,८२८ हेक्टर,सोलापूर - ४७,२६६ हेक्टर,हिंगोली - ४०,००० हेक्टर क्षेत्रामध्ये बाधित पिके सोयाबीनमकाकापूसउडीदतूरमूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपालाफळपिकेबाजरीऊसकांदाज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.एकूण बाधित जिल्हे नांदेडवाशीमयवतमाळबुलढाणाअकोलासोलापूरहिंगोलीधाराशिवपरभणी,अमरावतीजळगाववर्धासांगलीअहिल्यानगरछ. संभाजीनगरजालनाबीडलातूरधुळेजळगावरत्नागिरीचंद्रपूरसातारानाशिककोल्हापूरसिंधुदुर्गगडचिरोलीरायगड व नागपूर.

****

Featured post

Lakshvedhi