Friday, 15 August 2025

प्रेरणादायी यशोगाथाराष्ट्रपती भवनातील विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रणअंजना शंकर कुंभार

 प्रेरणादायी यशोगाथा

सातारा जिल्ह्यातील परळी गावातील अंजना शंकर कुंभार यांनी पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत मातीच्या सुबक वस्तूगणेश मूर्तीटेराकोटा शिल्पकलामातीची भांडी आणि खेळणी तयार केली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उमेद’ अभियानांतर्गत त्यांनी जय सदगुरू कृपा’ नावाचा स्वयंसहाय्य गट स्थापन केलाज्यामध्ये 12 महिला कार्यरत आहेत. या गटाने दीड वर्षांपूर्वी उमेद’ योजनेंतर्गत सहा लाख रुपयांचे कर्ज घेतलेज्याच्या मदतीने त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला आणि पुणेमुंबईपाटण आणि सातारा येथील बाजारपेठांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या या यशाची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचली आहे. श्रीमती कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले असूनत्या आपल्या पतीसह या समारंभात सहभागी होणार आहेत

आहे. तसेच, सातारा जिल्ह्यातील लखपती दीदी, बचतगट सदस्यांना सत्कार

 यंदाच्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी सातारा जिल्ह्यातील परळी (ता. सातारा) येथील महिला उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष स्वागत समारंभासाठी निमंत्रण मिळाले आहे. तसेच, सातारा जिल्ह्यातील लखपती दीदी, बचतगट सदस्यांना आणि भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) पुरस्कार विजेत्या दीदी यांना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील श्रीमती रूपाली सत्यवान जाधव (कारंवडी), श्रीमती जयश्री शिवाजी जांभोडे (नायगांव), श्रीमती शैला शरद पवार (धोंडेवाडी), श्रीमती वैशाली राजेश धर्मे (रेठरे बुद्रुक), श्रीमती स्वप्नाली जितेंद्र जाधव (जांब खुर्द), श्रीमती सुवर्णा पांडुरंग देशमुख (कापील), श्रीमती मंगल सुरेश मारढेकर (कुदळ), श्रीमती रुबिना नसरुद्दीन मुलाणी (कुलालजाई), कुमारी मंगल दादासो हजारे (कोपर्डे हवेली), कुमारी शोभा विजय रांजणे (डापवाडी), श्रीमती छाया अजित कदम (अरळे), श्रीमती अश्विनी संदीप कदम (अरळे), श्रीमती भाग्यश्री मंदार जाधव (ओझर्डे), श्रीमती सरस्वती सुरेश निकम (मुमगासेवाडी) श्रीमती सुजाता चंद्रकांत महांगडे (पारखंडी), भंडारा जिल्ह्यातील श्रीमती उषा राजू कावळे, श्रीमती रेखा सुधीर चाचणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीमती आशा संभाजी जाधव , श्रीमती प्रज्ञा प्रमोद सुर्वे यांचा समावेश आहे

लखपती दीदींनी आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने ग्रामीण भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान

 निवासी आयुक्त आर. विमला यांनी या दीदींच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांना या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी मिळालेल्या निमंत्रणाबद्दल हार्दिक अभिनंदन केले. त्या म्हणाल्यालखपती दीदींनी आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने ग्रामीण भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. साताऱ्याच्या अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात आणि इतर दीदींना लाल किल्ल्यावर निमंत्रित केले जाणे हे त्यांच्या यशाचा आणि देशाच्या सक्षमीकरण मोहिमेचा गौरव आहे. महाराष्ट्र सदन त्यांच्या या प्रवासात पूर्ण सहकार्य करेल.

उमेद’ अभियानामध्ये चार वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून महिलांसोबत काम

 आयुक्त आर. विमला यांनी सांगितले कीत्यांनी उमेद’ अभियानामध्ये चार वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून महिलांसोबत काम केलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गटांच्या आत्मनिर्भरतेसाठी काम करण्यात आलेज्यामुळे सुमारे 5 लाख बचतगट (Self-Help Groups) तयार झाले आणि 50 लाख महिलांना जोडले गेले. या प्रयत्नांमुळे 18 लाख महिला शेतकरी आणि उद्योजक म्हणून उदयास आल्या. आज हे यश पाहून त्यांना खूप आनंद झालाअशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली

महाराष्ट्राची जागतिक झेप -

 महाराष्ट्राची जागतिक झेप - पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील

 ‘टीटीएफच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ऐतिहासिक – सांस्कृतिक वारसाहिल स्टेशनसमुद्रकिनारेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाची जिवंत उदाहरणे असलेले गड किल्लेयुनेस्को स्थळे असे  वैविध्यपूर्ण पर्यटनविषयक वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी फायदा झाला. शिवायमहाराष्ट्र राज्याने या प्रदर्शनात सहभाग दर्शविल्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारकांनी महाराष्ट्र जाणून घेण्यासाठी अधिक रुची दाखविली. त्यामुळे येत्या काळात पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र भरारी घेईल, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी उत्तम व्यासपीठ

 पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी उत्तम व्यासपीठ

- पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे

महाराष्ट्र पर्यटन विभागाने या प्रदर्शनात सहभाग घेऊन या माध्यमातून राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाची बलस्थाने पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील टीटीएफच्या माध्यमातून विविध घटकांपर्यत पोहोचविण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय भागधारकांनी पर्यटन सेवासुविधांची माहिती आदान प्रदान करण्यात आली. या माध्यमातून भागधारकांना पर्यटन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी फायदा होणार आहेतसेच या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होईल, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सांगितले.


महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

 महाराष्ट्राचे दालन ठरले सर्वोत्कृष्ट

या प्रदर्शनात महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनाला ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’ यांच्याकडून सर्वोत्कृष्ट दालनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील आपली ओळख अधोरेखित केली आहे.

Featured post

Lakshvedhi