Tuesday, 6 February 2024

सुशासन हा आमच्या सरकारचा पाया

 सुशासन हा आमच्या सरकारचा पाया

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन

 

            मुंबईदि. ५ : सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्वाचे ठरणार आहेत. जिल्हा सुशासन निर्देशांकामुळे जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे. यातून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या समान विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्देशांकात चांगली कामगिरी करुन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेतअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिककेंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे सहसचिव एनबीएस राजपूत यांच्यासह सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि सुशासन समितीचे पदाधिकारी यांच्यासह इतर मान्यवर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे  उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीशासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत. ‘शासन आपल्या दारी’ सारख्या उपक्रमातून सरकार थेट जनतेपर्यंत आपण नेत आहोत. करोडो लोकांना शासकीय योजनांचे लाभ आपण याद्वारे दिले आहेत. शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला बळ देणारी या निर्देशांकांची संकल्पना आहे. यातील १० क्षेत्राच्या गुणांकनात प्रत्येक जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्यास सर्वसामान्यापर्यंत शासकीय योजना-लाभ प्रभावीपणे पोहचण्यास मदत होणार आहे. याचा विचार करुन सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपला जिल्हा सुशासन निर्देशांकात अग्रेसर कसा राहील यासाठी काम करावे. यातूनच जनतेच्या मनात हे आपले सरकार आहेअसा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

            सुशासन अहवालाचे सादरीकरण करतांना अपर मुख्य सचिव सौनिक यांनी सांगितले कीप्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी मंत्रालय स्तरावर ई-ऑफिस आणि मध्यवर्ती टपाल कक्ष यासारखे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर देखील सुशासन या संकल्पनेनुसार काम होण्यासाठी विविध १० क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याचे या निर्देशांकाचे आधारे मूल्यमापन करण्यात येत आहे. देशात जिल्हा सुशासन निर्देशांक ही संकल्पना राबविणारा महाराष्ट्र हे देशातील पाचवे राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सुशासन निर्देशांकाच्या संकेतस्थळाचे आणि सुशासन अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

0000

 

Sunday, 4 February 2024

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री

 संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी

कायमस्वरुपी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

         मुंबई दि.४- संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारी आढावा बैठक वर्षा निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीला पालकमंत्री दादाजी भुसेखासदार हेमंत गोडसेआमदार हिरामण खोसकरसुहास कांदेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच गोविंदराजनाशिक ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक प्रविण देशमानेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  आशिमा मित्तलनाशिकचे प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधेसंत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे यांच्यासह हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले कीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो वारकरी येत असतात. संत परंपरेतील विश्वगुरु अशी ओळख असणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा पौषवारी सोहळा हा आषाढी आणि कार्तिकी वारी इतकाच भव्य स्वरुपात साजरा होत असतो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरात होणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या सोहळ्याचे नियोजन करतांना प्रशासनाने याला नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून या सोहळ्याकडे पाहावे. या यात्रौत्सवासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना स्टिकर पुरवून अशा वाहनांना टोल माफी देण्याबाबत नियोजन करावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव सर्वांच्या समन्वयातून आणि सहकार्यातून नक्कीच यशस्वी होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री भुसे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या तयारी विषयी माहिती दिली.

तो गरीब आहे

 मी शाळेत गेलो

त्यांनी माझी जात नोंदवून घेतली.

मग आम्ही सर्वांनी....

"सारे भारतीय माझे बांधव आहेत...!"

ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली..!


त्याला पुस्तके ड्रेस मिळाली,

मी पण मागितली...

तर ते म्हणाले,

"तो गरीब आहे."


"मी पण गरीबच आहे."


"तु गरीब आहेस मान्य पण तुझी जात वेगळी आहे."


दोन गरीबांची पण जात वेगवेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं.


त्याला शासनाच्या....

फी माफी आणि अन्य सर्व सुविधा मिळत होत्या,

आणि

माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती...!


आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली.

(इथे स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही का वाटत..?)

तो सिलेक्ट झाला...

मी नव्हतो झालो...!


मी मार्कलिस्ट बघितली तर...

त्याला 150 पैकी....

108 मार्क होते

आणि मला 145...!


नंतर कळालं,

त्याने फॉर्म सोबत स्वतःचं जात प्रमाणपत्र जोडलं होतं.

स्पर्धेतही जातीची परीक्षा असते......

हे मला त्या दिवशी कळालं!


पुढे तो सेटल झाला...

चांगला पैसा ही आला.

घर, गाडी सर्व आलं....

त्याचं आयुष्य मजेत चालू झालं...!


अधूनमधून कुठे कुठे व्याख्यानंही द्यायचा....

सामाजिक समानतेवर तो भरभरुन बोलायचा....!!


एके दिवशी त्याची एका सुंदर मुलीशी भेट झाली....

आणि

बघताच त्याला ती खूप आवडली...!


तिच्या मनात काय हे याला नव्हतं माहीत,

तिच्यावर मात्र याची

जडली होती प्रित...!


काहीही करुन हवी होती ती त्याला...

तिला मिळवण्याचा खटाटोप त्याने सुरु केला.


एके दिवशी मात्र तो गारच पडला,

तिची जात दुसरी....

हे माहीत झालं त्याला..!


प्रचंड संतापला ...

अन् पारा त्याचा चढ़ला,

जातीच्या ठेकेदारांवर

जोराने ओरडला..!


हा जातिभेद काही मुर्खांनी तयार केला,

माणूस सर्व एकच असतो कोण सांगेल यांना...?


नंतर मग,

त्याच्या व्याख्यानाचा एकच विषय असायचा....

जात गाडून टाका

भरसभेत सांगायचा...!


आत्तापर्यन्त साथ देणारी

"जात"च

बाधक झाली होती....

त्याची मात्र यामुळे पुरती गोची झाली होती...!


काय करावे सुचेना त्याला...

आपली जात आडवी येतेय...

सर्व आहे पण एका गोष्टीमुळे मन बैचैन होतेय...!


एके दिवशी तो असाच...

स्वतःची फाईल चाळत होता,

रागारागाने तो आपल्याच

"जात" प्रमाणपत्राकडे पाहत होता!


त्याच्याकडे बघून,

ते प्रमाणपत्र ही हसले....

"चुकतोयस बेटा तू,

जरा विचार कर म्हणाले...!"


ज्या जातीने जगवलं तिचाच तुला आता राग येतोय....

फायदा बघून स्वतःचा...

तूच आज स्वार्थी होतोयस...!


तो बघ... तुझ्या सोबतचा

"तो" गुणी मुलगा,

खाजगी कंपनीत जातोय....

माझ्यामुळे बेट्या,

तू मात्र....

सुखाची रोटी खातोयस...!


जातिभेद वाईट....

हे कुणीही मान्य करेल,

पण तुला तेंव्हाच हे खटंकतय

जेंव्हा तुझ्या हिताआड येतंय...!!


याआधी तूही तुझी जात अभिमानाने मिरवायचास...

जाती मुळे मिळणारे सर्व फायदे...

तोर्यात उचलायचास...!


हे ऐकून तो थोडा स्तब्धच झाला....

मनाशी काही विचार करता झाला....!


त्या दिवशी "तो" माझ्या लग्नात आगंतुक पाहुणा म्हणून आला....

"जिंकलास गड्या तूच..."

मजपाशी येऊन म्हणाला...!


रोख त्याच्या बोलण्याचा मलाही कळला होता....

त्याला आवडणाऱ्या मुलीच्या गळ्यात,

मी हार घातलेला होता...!


तीच सुंदरी माझी

जीवनसाथी झाली होती,

कारण तिची न् माझी

जात एकच होती...!


कसं आहे ना भावा...

जीवनात प्रत्येकाला सर्वच मिळत नसतं...

कुठे न कुठे प्रत्येकाला नमतं घ्यावंच लागतं...!


तुला तुझी जात प्यारी तशीच माझी मला ही...!!

कशाला तत्वज्ञान सांगतोयस भावा....

फायद्यासाठी काहीही..?


खरंच दूर करायचेत का जातिभेद?

चल मग दोघे मिळून करु...

जातीवर नको,

जो आर्थिक गरीब त्यालाच

स्कॉलरशिप,सवलती

मिळवून देऊ...!


जात प्रमाणपत्रे कशाला वाटायची...

आपण फक्त भारतीय होऊ....

तू अन् मी एकच

हीच शिकवण सर्वांना देऊ...!


ज्याच्यात असेल गुणवत्ता

त्याचंच सिलेक्शन होईल...

त्या दिवशी माझा देश

खऱ्या अर्थाने महान होईल....!


तु ही माणूस मी ही माणूस,

मग कसला आपल्यात भेद?

जातीत विखुरला माणूस त्याचाच वाटतो खेद..!


जात हा मुद्दा भाऊ निवडणुकीतही गाजतो...

दरवेळी तुमचा उमेदवार इलेक्शन त्यावरच जिंकतो...!


तुझेन् माझे लालच रक्त,

माणूस आपली जात...

स्वार्थ नको आणू थोडी

उदात्तता हृदयात...!


माहीत मजला रुचणार नाही,

हे कधीही सर्वांना....

कारण,

प्रत्येकाला हवीय येथे....

आपल्या सोईची "जात"......!!


- #लेखक - #अनामिक...

ज्येष्ठा नागरिकांसाठी

 



राज्यातील विविध प्रकल्पांसाठी १६०० कोटी रुपयांचा निधी देणार

 राज्यातील विविध प्रकल्पांसाठी १६०० कोटी रुपयांचा निधी देणार

                केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

भारतीय राजमार्ग अभियंता अकादमीचा नगरविकासबरोबरतर राष्ट्रीय राजमार्ग वाहतूकचा सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर सामंजस्य करार

            मुंबईदि. ३ : राज्यातील पर्यटन वृध्दी होऊन रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी रोप वे करीता निश्चित केलेल्या ४० ठिकाणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावाअसे निर्देश देतानाच राज्यातील ८१ रस्ता प्रकल्पांच्या कामासाठी १६०० कोटी रुपये मंजूर करण्यात येतीलअसे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.

 

            भारतीय राजमार्ग अभियंता अकादमी आणि राज्य शासनाचा नगरविकास विभाग यांच्या दरम्यान राज्यातील सहा शहरातील वाहतूक कोंडी समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी आणि राष्ट्रीय राजमार्ग वाहतूक व्यवस्थापन कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात रोप वे उभारणी बाबत आज दुपारी सह्याद्री अतिथिगृह येथे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

 

            त्यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणसार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरनगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

 

            केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले कीराष्ट्रीय राजमार्ग वाहतूक व्यवस्थापना बरोबरच्या सामंजस्य करारामुळे रोप वे विकसित केले जातील. राज्यातून 40 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सहा ठिकाणच्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरु आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक असणारा निधी केंद्र सरकार देईल. राज्य शासनाने प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करुन द्यावी.

 

            श्री. गडकरी यांनी सांगितले की, रोप वे ची निर्मिती करतानाच त्या भागात पर्यटकांसाठी पार्किंग सुविधानिवासभोजनाच्या व्यवस्था विकसित कराव्यात. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. रोप वे तयार करतानाच त्या भागातील उत्पादने विक्रीसाठी बाजारपेठ विकसित करावी. तसेच वाहनांच्या चार्जिंगसाठीची सुविधा उपलब्ध करून देतानाच सौर ऊर्जा वापरासाठी प्राधान्य द्यावे.

             सर्वत्र नागरीकरण वाढत आहे. अशा परिस्थितीत वाहतुकीच्या नियोजसाठी शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. अभियंता अकादमीच्या माध्यमातून अभ्यास होऊन वाहतूक सुलभ होऊन अपघात कमी होण्यास मदत होईलअसे श्री. गडकरी यांनी सांगितले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या शहरातील वाहतूक कोंडीचा अभ्यास करुन उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत.

 

            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले कीराष्ट्रीय राजमार्ग वाहतूक व्यवस्थापनाबरोबरच्या करारामुळे पर्यटनाला चालना मिळेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शासनातर्फे आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच नगर विकास विभागाच्या करारामुळे वाहतुकीचे नियोजन करणे सोयीस्कर होईल. वाहतुकीच्या अभ्यासासाठी निवडलेल्या शहरांमध्ये स्मार्ट सिटी साठी निवडलेल्या शहरांचा समावेश करावाअशी अपेक्षा व्यक्त केली.

 

            श्रीमती म्हैसकर म्हणाल्या कीरोप वे सामंजस्य करारामुळे राज्यातील निसर्ग रम्यऐतिहासिकधार्मिक स्थळे जोडली जातील. त्यामुळे पर्यटकांना सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल. श्री. गुप्ता म्हणाले कीअभियंता अकदामी बरोबर च्या सामंजस्य करारामुळे वाहतुकीचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास होईल. पहिल्या टप्प्यात यामध्ये राज्यातील सहा शहरांचा समावेश आहेअसे सांगितले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलारमनोजकुमार फेगडे  अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

 

                                            

Saturday, 3 February 2024

आदिवासी भागातील कुपोषण आणखी कमी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग घ्यावा चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करावी -

 आदिवासी भागातील कुपोषण आणखी कमी करण्यासाठी

सरपंचांचा सहभाग घ्यावा

चावडी वाचनशिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुपोषणविषयक कृती दलाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

            मुंबई, दि. १ : आदिवासी भागातील पोषण आहार आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर राज्य शासनाचे विविध विभाग समन्वयाने काम करीत असल्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होताना दिसते. मात्र, कृती दलाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून हे प्रमाण आणखी कमी झाले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकामी सरपंचांचा सहभाग वाढविण्याचे आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेण्याचे निर्देश दिले. 

            आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांना कृती दलाचा पहिला अहवाल अध्यक्ष डॉ दीपक सावंत यांनी सुपूर्द केला. यावेळी अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिकमहिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव आणि कृती दलातील विविध विभागांचे सचिवअधिकारी उपस्थित होते.

            प्रारंभी विभागाने केलेल्या सादरीकरणात गेल्या तीन वर्षात आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण १.८२ टक्क्यांवरुन १.६२ टक्के इतके कमी झाल्याचे आणि उर्वरित राज्यातील कुपोषणाचे प्रमाण १.४३ टक्क्यांवरून १.२२ टक्के इतके कमी झाल्याची माहिती देण्यात आली.  आरोग्य सेविकाअंगणवाडी कार्यकर्तीआशा स्वयंसेविका व आयुष यांच्या जोडीने सरपंचांशी देखील समन्वय साधून आरोग्य आणि पोषण सेवा देण्यात येत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.       

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीग्रामविकासात सरपंचांची मोठी भूमिका असते. सरपंचांचे देखील आपापल्या गावपाड्यामधील कुपोषण कमी करण्यात सहभाग असणे गरजेचे आहे. चावडी वाचनशिबिरे या माध्यमातून कुपोषित महिलाबालकांची माहिती वेळीच प्रशासनाला कळेल आणि त्यावर त्वरेने उपाययोजना करता येतील.

माध्यान्ह भोजन आठवीपुढे सुद्धा

            सध्या आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येते. ही योजना नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यासंदर्भात तसेच अमृत आहार योजना शहरी भागात देखील देण्यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याच्या सूचना देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

            कुपोषण ही गंभीर समस्या आहे. संबंधित सर्व विभागांनी एकत्रित समन्वयाने काम करून उचित पाऊले टाकली पाहिजे. कुपोषणात देशाच्या आकडेवारीत महाराष्ट्र सर्वात शेवटी हवा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीयामध्ये आदिवासी भागात एखादी महिला गरोदर राहिल्यापासून तिचे आरोग्यआहारावर सातत्याने आरोग्यमहिला व बालविकास विभागाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लेक लाडकी योजनेविषयी देखील आदिवासी भागात चांगला प्रसार झाला पाहिजे. मेळघाटपालघरप्रमाणे इतरत्रही  दुचाकी रुग्णवाहिका किंवा नौका रुग्णवाहिका कायम तयार असल्या पाहिजेत. दुर्गम गावे आणि पाड्यांमध्ये किमान एखादे वाहन आपत्कालीन परिस्थितीत जाण्यायेण्यासाठी साधी वाट हवी यासाठी लवकरच वन विभागाची बैठक घेण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

डेटा एकत्रित झाल्याने लाभ

            या कृती दलाने केलेल्या शिफारशींवर उत्तमरीत्या कार्यवाही झाल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी सांगितले. सर्व संबंधित विभाग प्रथमच एकत्र येऊन काम करीत आहेतत्यामुळे त्यांच्यात योग्य समन्वय आहे. कुपोषित बालके व महिलांचा डेटा एकत्रित संकलित केला जात असल्याने वेळीच माहिती मिळत आहे.

हिमोग्लोबिनकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे

            पोषणाचे व्हिडिओ आदिवासींच्या भाषेत भाषांतर करून प्रसारित करणेपोषण ट्रेकरचे विश्लेषण करणेअती तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्रांचा सुधारित दरमध्यम कुपोषित बालकांकडे देखील लक्ष देणे व त्यांना अतिरिक्त पोषण देणेबालकांच्या पोषणाची चावडी वाचनाद्वारे माहिती देणेआश्रमशाळेने एक नर्सआणि क्रीडा शिक्षकाची नेमणूक करणेकिशोरवयीन मुलींच्या हिमोग्लोबिन तपासणीसाठी डिजिटल मीटर उपलब्ध करणेगर्भवती महिलांना ॲनिमिया कमी करण्यासाठी लोहयुक्त गोळ्यांऐवजी एमएमएस देणे अशा शिफारशी करण्यात आल्याचे डॉ. सावंत  यांनी यावेळी सांगितले.

            कृती दलाने केलेल्या काही सूचनांवर कार्यवाही झाली असून गरोदर स्त्रियांना देण्यात येणाऱ्या एकवेळच्या चौरस आहार दरात ३५ रुपयांवरून ४५ रुपये वाढ झाली आहे. मध्यम कुपोषित बालकांसाठी अतिरिक्त पोषण आहार कार्यक्रम सुरु झाला आहे. सरपंचांना देखील सहभागी करणे सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

0000


श्री राम व्या पूजसेठी

 २२/१/२४, अयोध्येत रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठेदिनी लोणावळ्याच्या राममंदिरात आलेल्या वानराने त्याला खायला दिलेल्या कशालाही हात लावला नाही, रामाकडे उडी मारून जाऊन बसले, रामाच्या पायांना हात लावला आणि निघून गेले.


Featured post

Lakshvedhi