Friday, 12 January 2024

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधावाटप राज्यातील 1 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

 श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधावाटप

राज्यातील 1 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

 

            मुंबई. दि. 12 : आयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. 22 जानेवारी 2024 आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती दि. 19 फेब्रुवारी 2024 या निमित्त राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी अशा राज्यातील एकूण 1,कोटी 68 लाख 50 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना दि. 22 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदाचा शिधाचे वाटप सवलतीच्या 100 रुपये दरात करण्यात येणार आहे.

            आनंदाचा शिधा संचामध्ये 1 किलो साखर1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळरवामैदा व पोहा असे सहा शिधाजिन्नस आहेत. आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे.

            श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आवश्यक शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरिता एकूण 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

            राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन 2022 च्या दिवाळी सणानिमित्तसन 2023 च्या गुढीपाडवाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त तसेच सन 2023 गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो रवाचणाडाळसाखर व 1 लिटर खाद्यतेल असे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर  सन 2023 दिवाळी सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळरवामैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात आला आहे.

00000

ऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन सीयावर रामचंद्र की जय घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दुमदुमला

 ऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन

सीयावर रामचंद्र की जय घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दुमदुमला

 

            नाशिकदि. 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली.

            यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमाशाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

            काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराजश्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारीमंगेश पुजारीनरेश पुजारीमंदार जानोरकरएकनाथ कुलकर्णीपं. प्रणव पुजारीअद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.

            याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8 व्या अध्यायाचे (श्लोकांचे) (ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे), वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंतवारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला.

स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री मोदी यांचे अभिवादन

            मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

0000

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधावाटप राज्यातील 1 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

 श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधावाटप

राज्यातील 1 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

 

            मुंबई. दि. 12 : आयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. 22 जानेवारी 2024 आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती दि. 19 फेब्रुवारी 2024 या निमित्त राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी अशा राज्यातील एकूण 1,कोटी 68 लाख 50 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना दि. 22 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदाचा शिधाचे वाटप सवलतीच्या 100 रुपये दरात करण्यात येणार आहे.

            आनंदाचा शिधा संचामध्ये 1 किलो साखर1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळरवामैदा व पोहा असे सहा शिधाजिन्नस आहेत. आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे.

            श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आवश्यक शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरिता एकूण 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

            राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन 2022 च्या दिवाळी सणानिमित्तसन 2023 च्या गुढीपाडवाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त तसेच सन 2023 गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो रवाचणाडाळसाखर व 1 लिटर खाद्यतेल असे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर  सन 2023 दिवाळी सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळरवामैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात आला आहे.

00000

राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचे राज्यपालांचे माध्यमांना आवाहन

 राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचे राज्यपालांचे माध्यमांना आवाहन

 

            मुंबई, दि. 12 : ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा भाग म्हणून विविध राज्यांमधील माध्यम प्रतिनिधींसाठी  महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिशा आणि उत्तराखंड राज्यांमधील पत्रकारांच्या एका  शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 11) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

            दोन्ही राज्यातील दूरचित्रवाणी आणि मुद्रित माध्यमातील पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारिता करताना माध्यमांनी राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले.

            माध्यमांनी निव्वळ गुन्हेगारीविषयक बातम्यांवर प्रकाश टाकण्याऐवजी समाजातील सकारात्मक घडामोडी वाचकांपुढे आणून त्यांच्यामध्ये  आत्मविश्वास निर्माण केला पाहिजेअसे त्यांनी सांगितले.

            आपण अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून काम केले होतेअसे सांगून राज्यपाल बैस यांनी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या क्रांतीनंतर देखील मुद्रित माध्यमाने आपली विश्वासार्हता व जागा टिकवून ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

            विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र भेटीचे आयोजन केल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी भारत सरकारचे आभार मानले. राज्य भेटीमुळे आपणांस महाराष्ट्राचा विकासप्रगती आणि सांस्कृतिक वारसा पाहता आलाअसे त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्र भेटीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणेआयएनएस शिवाजी आणि जवाहरलाल नेहरू बंदर आदी संस्थान पाहून प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले व राज्य भेटीचा उपक्रम सुरु राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

            राज्यपालांच्या सूचनेनुसारओडिशा आणि उत्तराखंडमधील पत्रकारांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

            भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पत्रकारांच्या महाराष्ट्र भेटीचे आयोजन केले होते.

            यावेळी प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्माउपसंचालक जयदेवी पुजारी स्वामीसहायक संचालक निकिता जोशीमाध्यम अधिकारी श्रीयंका चॅटर्जी उपस्थित होते.

            शिष्टमंडळामध्ये देवेंद्र सती (दैनिक जागरण)गिरीश चंद्र तिवारी (दैनिक भास्कर)भूपेंद्र कंदारी (राष्ट्रीय सहारा)गिरीश पंत (बद्री विशाल)सुरेंद्र सिंग दशिला (झी न्यूज)अफजल अहमद राणा (दैनिक सहफत)ममता बोसोई (समाजा) चौधरी अमिताव दास (समद). सुदीप कुमार राउत (प्रमेय)रंजन प्रधान (प्रगतिवादी)मृणाल कांती नंदा (कलिंग टीव्ही)देबनारायण महापात्रा (न्यूज 7)दिव्य ज्योती मोहंती (अर्गस न्यूज) आदी माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतील उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास शासनाची मान्यता

 संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतील

उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास शासनाची मान्यता

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 12 : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ  संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविते. 82 पैकी 20 वसतिगृहे सुरु असून उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करून त्यात 100 क्षमतेचे मुला-मुलींसाठी स्वतंत्र असे एकूण 82 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना घेतला होता. बीडअहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आली होती. यांपैकी आतापर्यंत 5 वसतीगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी देखील शासनाने उपलब्ध करून दिला आहे.

            वसतिगृह योजनेतील उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यात यावेतयाबाबत मंत्री श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. त्यानुसार आता आणखी 31 तालुक्यात 62 वसतिगृहे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही वसतिगृहे सुरुवातीस भाड्याच्या जागेत चालवली जाणार असून आगामी शैक्षणिक वर्षांपासून खुली करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने वसतिगृहे स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवली जातील.

            ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यादृष्टीने ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळेसह निवास व भोजनाची उत्तम सोय व्हावीया दृष्टीने ही वसतिगृहे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. ऊसतोड कामगारांच्या पुढील पिढ्यांच्या हातात कोयता येऊ नयेया दृष्टीने शासनाचे हे अत्यंत मोठे पाऊल आहे. वसतिगृहे सुरु करण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

या ठिकाणी सुरू होणार प्रत्येकी दोन वसतिगृहे :-

बीड जिल्हा - वडवणीधारूरशिरूर कासारआष्टीअंबाजोगाई

अहमदनगर - शेवगाव

जालना - परतूरबदनापूरजालनामंठा

नांदेड - कंधारमुखेडलोहा

परभणी - गंगाखेडपालमसोनपेठ

धाराशिव - कळंबभूमपरांडा

लातूर - रेणापूरजळकोट

छत्रपती संभाजीनगर - पैठणसोयगावसिल्लोड

नाशिक - निफाडनांदगावयेवलासिन्नर

जळगाव - एरंडोलयावलचाळीसगाव

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथे आगमन

 राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथे आगमन

 

            नाशिकदि. 12 : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

            यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजिल्हाधिकारी जलज शर्मापोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.

            यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे  रोड शो आणि 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले आहेत.

0000


 

वृत्त क्र. 136

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन

 

            नाशिकदि. 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले.

            यावेळी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीरपोलिस महासंचालक रश्मी शुक्लानाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेजिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

            यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने निलीगिरी बाग हेलिपॅडकडे रवाना झाले.

0000


 


पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

 पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर


महाराष्ट्रातील 30,500 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, आणि पायाभरणी पंतप्रधान करणार


गतिशीलतेत वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान करणार


सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चाचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब पूल, तसेच सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे


पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याची पंतप्रधान करणार पायाभरणी


रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधान सिप्झ सेझ येथे 'भारतरत्नम' आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर (NEST) 01 चे करणार उद्घाटन


रेल्वे आणि पेयजलाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे होणार राष्ट्रार्पण


महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान महाराष्ट्रात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा करणार प्रारंभ


पंतप्रधान करणार 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन


महोत्सवाची संकल्पना - विकसित भारत@2047: युवांसाठी, युवांद्वारे


https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1995055 




PM to visit Maharashtra on 12th January


PM to inaugurate, dedicate to Nation and lay the foundation stone of multiple development projects worth more than Rs. 30,500 crore in Maharashtra


In a significant step to enhance ease of mobility, PM to inaugurate Atal Bihari Vajpayee Sewri - Nhava Sheva Atal Setu


Built at cost of about Rs 17,840 crore, Atal Setu is the longest bridge in India and also the longest sea bridge in the country


PM to lay the foundation stone of underground road tunnel connecting Eastern Freeway's Orange Gate to Marine Drive


In a significant step to bolster the Gems and Jewellery sector, PM to inaugurate the 'Bharat Ratnam' and New Enterprises & Services Tower (NEST) 01 at SEEPZ SEZ


Multiple projects related to rail and drinking water to be dedicated to Nation


In yet another effort towards women empowerment, PM to also launch Namo Mahila Shashaktikaran Abhiyaan in Maharashtra


PM to inaugurate 27th National Youth Festival


Theme of the Festival - Viksit Bharat@ 2047: युवा के लिए, युवा के द्वारा


https://pi

b.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1995055 

Featured post

Lakshvedhi