Friday, 11 August 2023

मोफत शस्त्रक्रिया शिबिर

 


राज्यातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासंदर्भात जपानी शिष्टमंडळाशी चर्चा

 राज्यातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासंदर्भातजपानी शिष्टमंडळाशी चर्चा


            मुंबई, दि. 11 : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापनकरण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्वकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली.


            मंत्री श्री. बनसोडे यांची जपानच्या शिष्टमंडळाने अलीकडेच भेट घेतली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, डेप्युटी चीफ ऑफ मिशन कनेक तोशिहिरो, पोलिटिकल सेक्शन रिसर्चर शिमादा मेगुमी तसेच आमदार बाबासाहेब मोहनराव पाटील उपस्थित होते.


            महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जपानमध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेनंतर तेथील ऑलिंपिक वस्तू संग्रहालयाच्या धर्तीवर पुणे येथील होऊ घातलेल्या भव्य अशा ऑलिंपिक भवनात ऑलिंपिक संग्राहलय तयार करता येऊ शकेल, यावरही चर्चा करण्यात आली.


            जपानने तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रात भरीव काम केले. त्यामुळे जापान आज क्रीडाक्षेत्रात अग्रेसर देश आहे. तसेच जपान हा शिस्तप्रिय, पर्यावरणपूरक जीवनपद्धती, बुद्धीजम मानणारा देश आहे. त्यामुळे बुद्धीज्म, क्रीडा, बंदरे, युवक कल्याण अशा विषयांवर जापानसोबत काम करता येईल असे मत मंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला.


            जपानच्या शिष्टमंडळाने सकारत्मक प्रतिदास देत, भारत- जपान संबंध दृढ करण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत जपानचे कॉन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता यांनी व्यक्त केले. लवकरच या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी जपान उत्सुक असल्याचे शिष्टमंडळ सदस्यांनी सांगितले.


            मंत्री श्री बनसोडे हे आपल्या शिष्टमंडळासोबत जपान दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे जपानसोबत त्यांचे मैत्रीपुर्ण संबंध निर्माण झाले. श्री. बनसोडे हे मंत्री झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जपानचे शिष्टमंडळ मंत्रालायात त्यांना भेटण्यासाठी आले होते. मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी शिष्टमंडळाच्या सदस्यांचा पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान केला.

नैरोबी येथे बॉयलर वर्ल्ड 2023 प्रदर्शनाचे उद्घाटन

 नैरोबी येथे बॉयलर वर्ल्ड 2023 प्रदर्शनाचे उद्घाटन

केनियाला भारताकडून स्वस्त दरात बाष्पकांचा पुरवठा शक्य


- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे


 


            मुंबई, दि. 11 :- “बाष्पके क्षेत्रामध्ये भारतातील बाष्पके ही आरबीआय कोडनुसार बनवली जातात. ही बनवताना अनेक अभियंते आणि कुशल कामगार आपले कौशल्य वापरतात. त्यामुळे केनियाने आयबीआर कोड स्वीकारल्यास भारत कमित कमी खर्चात बॉयलर पुरवू शकतो. तसेच केनियातील या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भारताप्रमाणे पायाभूत प्रशिक्षण दिल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊन केनियाचा सर्वांगिण आर्थिक व औद्योगिक विकास साधता येईल”, असे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी केनियातील नैरोबी येथे आयोजित ‘बॉयलर वर्ल्ड 2023’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.


            ऑरेंज बिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी द रिपब्लिक ऑफ केनियाचे कामगार व सामाजिक संरक्षण कॅबिनेट सचिव फ्लोरेन्स बोर, केनियाच्या राज्य उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.जुमा मखवाणा, केनियातील भारताचे उच्चायुक्त (हाय कमिशन) नामग्या खांपा, ऑरेंज बिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक भानू राजगोपालन, महाराष्ट्र बॉयलर्सचे संचालक धवल अंतापूरकर उपस्थित होते.


            सर्व बॉयलर उत्पादक आणि बॉयलर वापरकर्त्यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी केनियाचे आभार मानले. केनियाचे कौतुक करताना मंत्री डॉ. खाडे म्हणाले, केनिया हा एकमेव विकसनशील देश आहे ज्यामध्ये युनायटेड नेशन संस्थेचे मुख्यालय आहे. भारत व केनियाचे विशिष्ट नाते आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात हजारो भारतीयांनी रेल्वेची पायाभूत सुविधा बांधण्यासाठी केनियामध्ये आपले योगदान दिले. आज लाखो भारतीय केनियाच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, कामगार, दळणवळण, आरोग्य, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांमध्ये केनियाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत.


            उद्योग क्षेत्रातील जीवन आणि मालमत्तेचे धोक्यांपासून संरक्षण आणि उचित सुरक्षा उपायांचे पालन म्हणजेच औद्योगिक सुरक्षितता होय. यासाठी औद्योगिक नियमांमध्ये भारत सरकारने अनेक बदल केले आहेत. भारत १५३ वर्षांपासून जागतिक स्तरावर बॉयलर क्षेत्रामध्ये सर्वांना मार्गदर्शन करत आहे. भारतात बॉयलरच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आयबीआर कोड अंतर्गत अतिशय कडक तपासणी प्रणालीद्वारे बॉयलर बनवले जातात. भारतात बनवलेले बॉयलर दर्जेदार असून आंतरराष्ट्रीय मानक व सुरक्षिततेनुसार अधिक कार्यक्षम असल्याचे मी विश्वासाने सांगू शकतो. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रणालीला जागतिक मान्यता मिळाली आहे.


            उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेसोबतच जबाबदार अभियांत्रिकी आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट राखले पाहिजे. जगाला हवामान बदलासारख्या जटिल आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बॉयलर तज्ञ म्हणून नवीन उपाय शोधण्यासाठी आपल्याला आपले कार्य करावे लागेल. स्वच्छ ऊर्जा, प्रगत साहित्य आणि उच्च कार्यक्षमता असलेली नाविन्यपूर्ण उत्पादने आपली भविष्यातील गरज आहे.


            सुरक्षिततेचे महत्व लक्षात घेता बॉयलरचे सुरक्षित ऑपरेशन आणि योग्य देखभाल जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. उच्च सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आणि बॉयलर फिल्डमध्ये सुरक्षिततेची संस्कृती वाढविण्यात आपण सर्वांनीच नेहमीच आघाडीवर असले पाहिजे असेही मंत्री डॉ. खाडे म्हणाले.


            संपूर्ण जगात भारताच्या कार्य कुशल मनुष्यबळाची मागणी आहे. मानवी भांडवलाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि मुबलक उपलब्धता करण्यासाठी केनिया सरकारने एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे विनंती डॉ. खाडे यांनी केली.


            जागतिक बँकेच्या 'इज ऑफ डुइंग बिझनेस' च्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारताने जगात ६३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केनिया इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीनुसार भारत हा केनियातील दुसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. ६० पेक्षा अधिक मोठ्या भारतीय कंपन्यांनी उत्पादन, रियल इस्टेट (स्थावर मालमत्ता), औषधोत्पादन, दूरसंचार, आयटी, बँकिंग आणि कृषी आधारित उद्योगासह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. भारतीय गुंतवणुकीमुळे केनियन नागरिकांना हजारो थेट नोकऱ्या निर्माण झाल्या असल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी याप्रसंगी सांगितले.


००००



मनीषा सावळे/विसंअ/


भारतातील अती* *महत्वाच्या संस्थांची* *घोषवाक्ये संस्कृत मधील* *आहेत*. आवश्य वाचा. अशी माहीती कोठे वाचावयास मिळणार नाही.

 Indian Slogans 

*भारतातील अती* *महत्वाच्या संस्थांची* *घोषवाक्ये संस्कृत मधील* *आहेत*. आवश्य वाचा. अशी माहीती कोठे वाचावयास मिळणार नाही.


●भारत सरकार👉 सत्यमेव जयते

●लोक सभा👉 धर्मचक्र प्रवर्तनाय

●उच्चतम न्यायालय👉 यतो धर्मस्ततो जयः

●आल इंडिया रेडियो👉 सर्वजन हिताय सर्वजनसुखाय 

●दूरदर्शन👉 सत्यं शिवं सुन्दरम्

●गोवा राज्य👉 सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्।

●भारतीय जीवन बीमा निगम👉 योगक्षेमं वहाम्यहम्

●डाक तार विभाग👉 अहर्निशं सेवामहे

●श्रम मंत्रालय👉 श्रम एव जयते

●भारतीय सांख्यिकी संस्थान👉 भिन्नेष्वेकस्य दर्शनम्

●थल सेना👉 सेवा अस्माकं धर्मः

●वायु सेना👉 नभःस्पृशं दीप्तम्

●जल सेना👉 शं नो वरुणः

●मुंबई पुलिस👉 सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

●हिंदी अकादमी👉 अहं राष्ट्री संगमनी वसूनाम्

●भारतीय राष्ट्रीय विज्ञानं अकादमी👉 हव्याभिर्भगः सवितुर्वरेण्यम्

●भारतीय प्रशासनिक सेवा अकादमी👉 योगः कर्मसु कौशलम्

●विश्वविद्यालय अनुदान आयोग👉 ज्ञान-विज्ञानं विमुक्तये

●नेशनल कौंसिल फॉर टीचर एजुकेशन👉 गुरुर्गुरुतमो धाम

●गुरुकुल काङ्गडी विश्वविद्यालय👉 ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत

●इन्द्रप्रस्थ विश्वविद्यालय👉 ज्योतिर्व्रणीत तमसो विज्ञानन

●काशी हिन्दू विश्वविद्यालय:👉 विद्ययाऽमृतमश्नुते

●आन्ध्र विश्वविद्यालय👉 तेजस्विनावधीतमस्तु

●बंगाल अभियांत्रिकी एवं विज्ञान विश्वविद्यालय,

शिवपुर👉 उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत

●गुजरात राष्ट्रीय विधि विश्वविद्यालय👉 आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः

●संपूणानंद संस्कृत विश्वविद्यालय👉 श्रुतं मे गोपाय

●श्री वैंकटेश्वर विश्वविद्यालय👉 ज्ञानं सम्यग् वेक्षणम्

●कालीकट विश्वविद्यालय👉 निर्भय कर्मणा श्री

●दिल्ली विश्वविद्यालय👉 निष्ठा धृति: सत्यम्

●केरल विश्वविद्यालय👉

Sमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यापन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 Sमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यापन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

             

            मुंबई‍‍दि. १० : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयामार्फत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षामध्ये ५०% अनुदान योजनाबीज भांडवल योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

             महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल  योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाच्या mpbcdc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर संकेतस्थळावर योजनानिहाय उपलब्ध अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह (तीन प्रती) आपले अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.जिल्हा कार्यालयात स्वतः दाखल करावेत. त्रयस्थ तसेच मध्यस्थामार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीतयाची कृपया नोंद घ्यावी.

                  इच्छुक अर्जदारांचे कर्ज मागणी अर्ज ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.गृहनिर्माण भवनतळमजला रूम नं ३५कलानगरबांद्रा (पूर्व)मुंबई-५१ या ठिकाणी स्वीकारले जातील, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

*****

राज्यात पाळणाघर योजनेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार

 राज्यात पाळणाघर योजनेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


            मुंबई, दि. १० : पाळणाघर योजनेबाबत राज्य शासनाची नियमावली तयार करण्यासाठी तसेच ही योजना राबविताना शासकीय, अशासकीय संस्थांचेही मत विचारात घेण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण, कामगार, गृह आणि महिला व बालविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार असून चौथ्या महिला धोरणात पाळणाघराबाबत निर्णयाचा समावेश करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.


            मुंबई शहर व उपनगर परिसरात सार्वजनिक खाजगी स्वरूपात डे केअर सेंटर सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशिबेन शहा, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, प्रेरणा संस्थेच्या प्रिती पाटकर, स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, मुंबई मोबाईल क्रशेसच्या वृषाली नाईक, माधवी भोसले, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी, युनिसेफच्या कामिनी कपालिनी यावेळी उपस्थित होत्या.


         मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ज्या मुलांचे पालक नोकरी अथवा कामानिमित्त बाहेर आहेत अशा मुलांसाठी कौटुंबिक व सुरक्षित वातावरणात संगोपन होण्यासाठी पाळणाघर ही संकल्पना काळाची गरज बनली आहे. फक्त शहरीच नाही तर ग्रामीण भागातील ० ते ६ व ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी पाळणाघर सुरू करावीत. आगामी महिला धोरणात पाळणाघराबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.


शहरी व ग्रामीण भागात पाळणाघर होणे ही काळाची गरज - ॲड. सुशिबेन शहा


     महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशिबेन शहा म्हणाल्या की, आजही मुलांना सुरक्षित निवारा उपलब्ध नसल्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांसमोर मोठा प्रश्न असतो. जास्तीत जास्त डे केअर सेंटर ग्रामीण व शहरी भागात सुरू झाल्यास बालकांसाठी सुरक्षित निवाऱ्याची उपलब्धता होणार आहे. त्यामुळे काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढण्यास निश्चितच मदत होईल. तसेच कुपोषण, बालकांचे लैंगिक शोषण, मुले शाळाबाह्य होण्याचे प्रमाणदेखील कमी होणार आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि अशासकीय संस्थांच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील विभागीय स्तरावर आठ मार्चपर्यंत प्रत्येकी किमान एक डे केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ॲड. शहा यांनी सांगितले.


                        यावेळी विविध सामाजिक संस्थांनी पाळणाघरासाठी शासनाची निश्च‍ित नियमावली असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.


००००

मुंबई मॅरेथॉन सर्वसमावेशक स्पर्धा

 मुंबई मॅरेथॉन सर्वसमावेशक स्पर्धा


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 10 : मुंबई मॅरेथॉन ही श्रीमंत - गरीब, शहरी - ग्रामीण, युवा - वृद्ध, स्त्री - पुरुष यांसारखे भेद मिटवणारी सर्वसमावेशक स्पर्धा आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा पुरस्कार करते. प्रत्येक गाव, शहर व महानगराची स्वतःची मॅरेथॉन सुरु झाल्यास त्यातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल व एकात्मता बळकट होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.   


            दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या स्वतःच्या नावनोंदणीने करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 


            कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार आशिष शेलार, मॅरॅथॉनचे आयोजक अनिल सिंह व विवेक सिंह, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.


            मुंबई मॅरेथॉनना परोपकारी समाजकार्याची जोड दिल्याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले. मॅरेथॉनच्या माध्यमातून गेल्या १९ वर्षांमध्ये ७०० अशासकीय सेवाभावी संस्थांनी सामाजिक उपक्रमांसाठी ३५६ कोटी रुपयांचा निधी उभा केला, त्यामुळे देशाच्या सुदूर क्षेत्रातील दिव्यांग व इतर वंचित लोकांना लाभ झाला, असे राज्यपालांनी सांगितले.


            आज देशात जीवनशैली संबंधी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग सारख्या समस्या वाढत आहेत. हे आजार टाळण्यासाठी नियमित चालणे, धावणे व व्यायाम करणे यासारखा स्वस्त उपाय दुसरा नाही असे सांगून मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन युवकांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.


            आपण मुंबई मॅरेथॉनशी स्थापनेपासून जोडलो असल्याचे सांगून आज ही स्पर्धा जगातील पहिल्या दहा मॅरेथॉन पैकी एक झाली याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. आबाल वृद्धांपासून सर्वजण सहभागी होत असलेली मुंबई मॅरेथॉन ही मुंबईचा सण झाली आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.


            टाटा मुंबई मॅरेथॉन समाज कार्यात देखील योगदान देत असल्यामुळे त्या माध्यमातून देशसेवा घडत आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. 


            यावेळी मुंबई, गोवा व गुजरात विभागाचे मेजर जनरल एच.एस. कहलों, नौदलाच्या महाराष्ट्र विभागाचे ध्वज अधिकारी रिअर ऍडमिरल ए एन प्रमोद, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक मिश्रा, मॅरॅथॉनचे आयोजक अनिल सिंह व विवेक सिंह, अभिनेते राहुल बोस, टाटा समूहाचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट, टीसीएसचे उज्वल माथूर, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे मुख्य अधिकारी एम बालकृष्णन, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.


००००


Maharashtra Governor launches registration of Tata Mumbai Marathon 2024


      The registration process for the Tata Mumbai Marathon to be held on 21 January 2024 was launched with the digital registration of the name of Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Thursday (10 Aug).


       Speaking on the occasion, Governor Bais said the Mumbai Marathon creates a level playing field, removing the distinctions like the rich and the poor, rural and urban, women and men, etc. He said the Mumbai Marathon upholds democratic values and secularism. He complimented the organizers for making charity an integral part of the Mumbai Marathon.


       Minister of Food and Civil Supplies Chhagan Bhujbal, Minister of Sports and Youth Affairs Sanjay Bansode, MLA Ashish Shelar, former MLA Raj Purohit, GOC M G & G Area Gen H S Kahlon, Flag Officer Commanding, Maharashtra Naval Area Rear Admiral A N Pramod, General Manager of Central Railway Naresh Lalwani, GM Western Railway Ashok Misra, Marathon organisers Anil Singh and Vivek Singh, actor Rahul Bose, Brand Custodian of Tata Group Harish Bhat, TCS head Ujjwal Mathur, IDFC First Bank COO M. Balakrishnan, founder of International Institute of Sports Management Nilesh Kulkarni

 and others were present.


Featured post

Lakshvedhi