Sunday, 6 August 2023

नीलमाधव हॉस्पिटलचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज

 नीलमाधव हॉस्पिटलचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज उदघाटन


image.png


 

परळी / प्रतिनिधी



                 परळी शहरात प्रथमच सर्व सोयिनीं अद्यावत असलेल्या नीलमाधव हॉस्पिटलचे उदघाटन राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज रविवार दि ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार असून या उदघाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान डॉ.रवीकुमार नारायणराव फड व डॉ.स्वप्नीत रवीकुमार फड आदींनी केले आहे.



                 छत्रपती शिवाजी चौक येथील सुभाष कॉम्प्लेक्स,पहिला मजला या ठिकाणी नीलमाधव हॉस्पिटल, बालरुग्णालय,सर्जिकल व ट्रॉमा केअर सेंटर चा उदघाटन सोहळा आज रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी आ. संजय दौंड,न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे-बीड,बाजीराव भैया धर्माधिकारी -शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परळी, चंदुलाल बियाणी -जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,अजय मुंडे - गटनेते जिल्हापरिषद बीड, बाळासाहेब देशमुख - जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस बीड, शिवाजी सिरसाट - जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस बीड तर प्रमुख उपस्थिती डॉ.बी.ए.सेवेकर,डॉ.हरिश्चंद्र वंगे,डॉ.सुरेश चौधरी,डॉ.सूर्यकांत मुंडे,डॉ.राजाराम मुंडे, डॉ.मधुसूदन काळे,डॉ. बालासाहेब कराड, डॉ.शालिनीताई कराड, डॉ. ज्ञानेश्वर घुगे, डॉ. रंजना घुगे, डॉ.अजित केंद्रे, डॉ. श्याम काळे, डॉ. दिनेश कुरमे,डॉ.संतोष ए. मुंडे, डॉ. सतीश गुट्टे , तर शुभाशीर्वाद प. पु. श्री ब्रह्मऋषि डॉ.सु.ब.काळे,ह.भ.प.श्री भागवताचार्य केशव महाराज उखळीकर,ह.भ.प.श्री रामायणाचार्य भरत महाराज गुट्टे यांच्या शुभ आशीर्वादाने नीलमाधव हॉस्पिटलचा उदघाटन सोहळा मोठया उत्साहात होत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशे आव्हान डॉ. रवीकुमार नारायणराव फड व डॉ.स्वप्नीत रवीकुमार फड,मा.दिलीप गुट्टे - मा.अप्पर जिल्हाधिकारी, डॉ.अरुण गुट्टे - वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी वै, विश्वम्भर फड - चेअरमन से.स.सो.लाडझरी मूर्ती वाकडी, नाथराव माणिकराव फड - नि.रसायन शाश्त्रज्ञ टीपीएस परळी,रत्नेश्वर फड - मॅनेजर जेबील कंपनी,गिरीश कंकाळ ,गोपाळ कंकाळ - संचालक रिद्धी मेडिकल, पवनराज सूर्यकर - संचालक श्री क्लीनिकल लॅबोरेटरी आदींनी केले आ

हे. 

भारत- बेलारुस व्यापार वृद्धीची महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचेसोबत चर्चा

 भारत- बेलारुस व्यापार वृद्धीची महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचेसोबत चर्चा



मुंबई : बेलारूस चे कॉन्सुलेट जनरल श्री अंतोन पाश्कोह यांनी "महाराष्ट्र चेंबर"च्या फोर्ट, काळा घोडा, ओरिकॉन हाऊस या मुख्यालयास भेट दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी "महाराष्ट्र चेंबर" तर्फे त्यांचा सन्मान केला. भारत आणि बेलारुस या दोन्ही देशातील व्यापार वृद्धीसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा या भेटीच्या दरम्यान झाली. तसेच 'महाराष्ट्र चेंबर' तर्फे शिष्टमंडळाने `बेलारूस `ला भेट देण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिले.


            यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी निर्यात संदर्भातील महाराष्ट्र चेंबरतर्फे सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना म्हणाले, महाराष्ट्र चेंबरतर्फे निर्यात प्रोत्साहन योजना राबविली जात आहे. शेजारील देशासह आखाती देश, आफ्रिकन देशात भारतीय उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.


            दरम्यान भारत व 'बेलारूस' दरम्यान द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासंबंधी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. विशेषत: भारतातून ऑटोमोबाईल कंपोनंट्स, फार्मा व फळांच्या निर्यातीच्या मोठ्या संधी असल्याचे बेलारूस चे कॉन्सुलेट जनरल अंतोन पाश्कोह यांनी सांगितले. 'बेलारूस' मधून उच्च दर्जाचे टेक्स्टाईल व त्यासाठी लागणारे सिंथेटिक यार्न, मायनिंग साठीचे विशेष उपकरण इत्यादी विषयावर उभय देशांमधील व्यापार वाढवण्यासंबंधी चर्चा झाली.


            यावेळी `बेलारूस`चे कॉन्सुलेट जनरल श्री अंतोन पाश्कोह यांनी दिलेल्या प्रस्तावावर महाराष्ट्र चेंबरतर्फे निश्चितच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. या भेटीप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे सहकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.

 पंतप्रधानांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ संपन्न


रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भारत समृद्धी निर्माण होईल : राज्यपाल रमेश बैस

            मुंबई दि. 06 : अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील परळ, विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.  

            या अनुषंगाने मध्य रेल्वे तर्फे रेल्वे कॉलनी मैदान परळ येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री रमेश पतंगे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक अनंत लक्ष्मण गुरव व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी उपस्थित होते.    


            भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन असून रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता निर्माण होईल व विकास सर्वसमावेशक होईल, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले. 

            एखाद्या संस्थेची प्रतिमा तिचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांकडून निर्माण होते असे सांगून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानके पर्यावरण-स्नेही व दिव्यांग-सुलभ करावीत तसेच नैतिक व मानवी मूल्ये जपावी, असे राज्यपालांनी सांगितले.   

            रेल्वे सेवांमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले असून रेल्वे प्रवास अधिक सुखकर झाला असल्याचे सांगून आपण विमानापेक्षा शक्यतोवर रेल्वे प्रवासाला पसंती देतो असे राज्यपालांनी सांगितले.

            रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा राष्ट्रव्यापी प्रकल्प हाती घेऊन केंद्र शासनाने सामान्य माणसाच्या स्वागतासाठी एक प्रकारे लाल गालिचा अंथरला आहे असे सांगून राज्यातील स्थानकांच्या विकासासाठी केंद्राने १६०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन भारतीय रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या विकासासाठी देखील चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास मंत्री यांनी देखील रेल्वे स्थानक पुनर्विकास कार्याबद्दल आनंद व्यक्त केला. 


0000

PM launches Amrit Bharat Station Scheme;Governor attends

 programme in Mumbai


     Prime Minister Narendra Modi laid the Foundation Stone for the work of revamp and re-development of 508 railway stations in the country under the Amrit Bharat Station Scheme, through online mode on Sunday (6 Aug). This includes 44 railway stations from Maharashtra. Redevelopment of three stations in Mumbai, namely Parel, Vikhroli and Kanjurmarg stations was also announced

     Maharashtra Governor Ramesh Bais, Minister of Skill Development and Entrepreneurship Mangal Prabhat Lodha, Minister of Industry Uday Samant, MLA Kalidas Kolambkar, veteran journalist Ramesh Patange, Freedom Fighter Anant Laxman Gurav and General Manager of Central Railway Naresh Lalwani attended the program organized by Central Railway at Railway Colony Ground in Parel.


     Speaking on the occasion, Governor Bais said railways create a level playing field for the rich and the poor. Stating that Indian railways represents the unity in diversity of India, he expressed the hope that the railway station upgradation project will create prosperity in 

rural and urban areas and make development inclusive.

00000


राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

 महाआरोग्य शिबिराचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन


राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार



            पुणे, दि.6: महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केले.


            स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुरेश नवले, अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ.अजय चंदनवाले आणि राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोविड काळाने आरोग्यसेवा सर्वात जास्त महत्वाची असल्याचे दाखवून दिले. राज्य शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2 हजार 418 संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


            पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य विभागामार्फत साथजन्य आजारांपासून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. साथीच्या आजारावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातच अशा आजाराचे निदान झाल्यास रुग्णांचा त्रास कमी होतो. मात्र उपचारासोबत आजार होऊ नये यासाठी दररोज व्यायाम करणे, व्यसनापासून दूर राहणे, सकस आहार घेणे, वेळेवर आरोग्य तपासण्या करणे, तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. प्रकृतीची काळजी घेताना जीवनशैलीत बदल आणायला हवा. आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्व. विनायक निम्हण यांनी सामाजिक कार्य करताना चांगल्या प्रकारची मैत्री जोपासली असेही श्री.पवार म्हणाले.


            अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्स सहकार्य करण्यासाठी येतात हे कौतुकास्पद आहे. या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आरोग्यसेवा मिळणार आहे. 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले' ही संतांची शिकवण आहे. अशा पद्धतीने विविध व्याधीने त्रस्त असलेल्या नागरिकांवर शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे. म्हणून या शिबिराला विशेष महत्व आहे, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कार्य केले, असेही श्री.भुजबळ म्हणाले.


 


            पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, कोविडच्या निमित्ताने आरोग्यसेवेचे महत्व लक्षात आले. आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत असताना उपचाराला बऱ्याचदा मर्यादा येतात. अशावेळी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चांगली सेवा घडते आणि नागरिकांना फायदाही होतो, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी जात, धर्म पलीकडे नाती जपली असेही श्री.पाटील म्हणाले.


            श्री.वडेट्टीवार म्हणाले, माणसात आणि सेवेत देव आहे असे समजून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य करत असल्याने त्यांची सेवा महत्वाची आहे. शिबिराचे सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याने त्याचा अनेकांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.


            आमदार सिद्धार्थ शिरोळे, निरामय फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, सनी निम्हण यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि पालकमंत्री श्री. पाटील यांनी शिबिरांची पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिबिरासाठी आलेल्या राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. मंत्री श्री.महाजन यांनीदेखील शिबिराला भेट देऊन नियोजनाची माहिती घेतली व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाध साधला.


            महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते. तपासणीनंतर मोफत औषध देण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. तपासणी नंतर आवश्यकता असल्यास गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार आहे.


 


0000

विमानाचे दरवाजे बंद केल्यावर कोणाही प्रवाश्यासाठी परत का उघडत नाहीत? - काय

 *विमानाचे दरवाजे बंद केल्यावर कोणाही प्रवाश्यासाठी परत का उघडत नाहीत? - काय आहेत कारणे?*

उड्डाणास तयार असलेल्या विमानाचे दरवाजे एकदा लावले की एखादा प्रवासी बाहेर राहिला आहे त्याला घेण्यासाठी उघडत नाहीत. अशी गैरसोय का करतात, फक्त दार उघडून एक प्रवासी तर आत घ्यायचाय त्यात काय एवढे असे आपल्याला वाटत राहते.

गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या राज्यपालांनाही ते उशिरा आले म्हणून त्यांना न घेता विमान गेले.

काय आहेत दार पुन्हा न उघडण्याची कारणे? त्यासाठी विमान उड्डाणा आधीची प्रोसिजर समजावून घेणे रंजक ठरेल.

विमान केवळ हवेच्या दाबावर उड्डाण घेते, तरंगत राहते आणि परत जमिनीवर उतरते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच विमानात किती वजन आहे, ते कसे विभागले गेले आहे, विमानाचा गुरुत्वमध्य ठराविक मर्यादेच्या आत आहे ना हे मुद्दे सर्वात महत्त्वाचे असतात.

त्यासाठी प्रोसिजर असे असते,

१. पायलट आणि को-पायलट कॉकपिटमध्ये आले की फ्लाईट डीसपॅचर त्यांना इंधनाचे वजन, इंजिन मधील ऑइलचे वजन, सामानाचे वजन आणि प्रवाशांचे वजन (हे सरासरीवर अंदाजे काढले जाते) याची माहिती देतात.

२. पायलट ही माहिती त्याच्या कॉम्पुटरला फीड करतो. या माहितीवर कॉम्प्युटर विमानाचा टेकऑफ वेग किती असावा, हवेची लिफ्ट किती लागेल, उतरताना याच गोष्टी कशा लागतील यासह सर्व प्रवासातील वेगाचे तपशील तयार करतो.

३. सर्व सामान आणि प्रवासी विमानात आल्यावर वजनाची सर्व माहिती देणारे प्रिंट पायलटकडे दिले जातात. या पेपरना 'लोड अँड ट्रिम शीट' म्हणतात. यात विमानातील स्टाफ आणि प्रवाशी यांची संख्या तर असतेच शिवाय पुरुष किती, स्त्रिया किती, लहान मुले किती असा तपशील आणि सामान ठेवण्याच्या कोणत्या भागात किती वजन आहे हे असते. गुरुत्वमध्य मर्यादेच्या आत आहे हेही नमूद केलेले असते.

४. यानंतर विमानाचे दार बंद करण्यात येते. मुख्य दार बंद करून घेतल्यावर आतील कर्मचारी विमानाची सर्व दारे 'आर्मड पोझीशन' वर आणतो, याचा अर्थ त्या स्थितीत जर कोणतेही दार उघडले तर ते विमानापासून खाली घसरगुंडी सारखे उघडते. आपत्तीकाळात विमान उतरले, अपघात झाला तर त्यासाठी ही तयारी असते.

५. केबिन स्टाफ सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले आहेत का, सीट पाठी सरळ आहेत ना हे तपासून सर्व ठीक असल्यास तसे पायलटला कळवतो.

६. पायलट ट्रॅफिक कंट्रोल, ATS, कडे उड्डाणास तयार आहे आणि किती प्रवासी आहेत ते कळवतो.

६. ATS अन्य विमानाच्या हालचाली, त्यांना उड्डाणास दिलेल्या परवानग्या, धावपट्टीवरील परिस्थिती हे सर्व तपासून विमान जागेवरून हलवण्याची परवानगी देतात आणि धावपट्टीवरील रांगेत कितवा नंबर आहे त्याची कल्पना देतात.

या स्टेजपर्यंत जर एखादा प्रवासी घेण्यासाठी दार उघडले तर केलेली सम्पूर्ण प्रक्रिया रद्द करून पहिल्यापासून सगळ्या स्टेजेस परत कराव्या लागतात. विमान सुटण्यास मोठा उशीर होऊ शकतो.

७. ATS ची परवानगी आल्यावर विमान हलवण्याची प्रक्रिया चालू होते. त्यासाठी चाकाचे ब्रेक काढताच स्वयंचलित पद्धतीने ती वेळ विमान यंत्रणेत नोंदली जाते आणि ती वेळ विमान सुटल्याची वेळ समजली जाते.

-------------------------

संकलन आणि लेखन -

प्रमोद (पी. आर.) कुलकर्णी, पुणे.

०१.०८.२०२३

(Source TOI Dt. 31.07.2023)

तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळावरअशासकीय सदस्यांची नियुक्ती दोन महिन्याच्या आत करणार

 तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळावरअशासकीय सदस्यांची नियुक्ती दोन महिन्याच्या आत करणार


- मंत्री शंभुराज देसाई


            मुंबई, दि. 3 : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर राज्यस्तरासोबतच विभागीय तसेच जिल्हास्तरीय अशासकीय सदस्यांची नियुक्ती येत्या दोन महिन्याच्या आत करण्यात येईल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावेळी मंत्री श्री.देसाई बोलत होते.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले, तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्यात येणार असून या समूहासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विविध योजना एकत्रितपणे कशा राबवता येतील याचा विचार करण्यात येणार आहे. समितीच्या तीन बैठका झाल्या असून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. या समाज घटकासाठी आरोग्य तपासणीसाठी एकदिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचा ३२७५ तृतीयपंथीयांना लाभ झाला आहे. त्यांना नवीन शिधापत्रिका सुलभतेने मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. पोलिस पदासाठीच्या ऑनलाईन अर्जामध्ये पुरुष, महिला बरोबरच तृतीयपंथी उमेदवारांसाठीही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.


            गृह विभागामार्फत आजच पोलिस महासंचालकांच्या माध्यमातून सर्व पोलिस स्टेशनमध्ये सूचना देण्यात येईल की पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या तृतीयपंथीयांना इतर नागरिकांप्रमाणेच चांगली वागणूक देण्यात यावी. असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य वर्षा गायकवाड, अनिल देशमुख, विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला. 


Featured post

Lakshvedhi