Monday, 26 June 2023

दापोली-हर्णे मार्गावर अपघात,

 दापोली-हर्णे मार्गावर अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोकमृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

            मुंबई दिनांक २६: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी याविषयी माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही दिले.


            या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला काही प्रवासी जखमी आहेत.जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आ

हेत.


युवा परिवर्तन


 

मन शुद्ध तुझे गोष्ट आहे लाख मोलाची

 ✍️ *अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाच नाही तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्वाचं आहे बोलताना जरा सांभाळून बोलावे शब्दांना तलवारी सारखी धार असते फरक फक्त एवढाच कि तलवारीने मान आणि शब्दांनी मन कापले जाते पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे शुल्लक गोष्टीसाठी खोटं बोलणारी माणसे ही जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत जोपर्यंत आपण बेदम मेहनत करायला सुरू करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वप्नं झोपेतचं दिसतील प्रत्यक्षात नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते आयुष्यात सर्व काही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही आयुष्य संपत जाते शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्ष्यात येते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होते‌‌ समाधान तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचा जन्म नव्हे तर तुमचं कर्म ठरवत असते कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो त्याला त्याच कर्मच योग्य दिशेला घेऊन जात असतं आणि शून्यातून तो घडत जातो देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो स्वतःची ओळख लपवणारी माणसं कधीच विश्वास पात्र नसतात शब्दकोडी सोडवताना बुध्दीची कसोटी लागते तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खुप हसतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून रडत असतो काही नाती अळवावरच्या पाण्यासारखी असतात साठतं पण लगेच वाहतं पण लगेच पूर्व जन्मातील नाती असतात ती राहीलेला हिशोब पूर्ण करतात कधी सुख देऊन तर कधी दुःख तुमच्यात असणारी जिद्द च तुम्हाला सिध्द करण्यास भाग पाडते नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं आयुष्य जास्त सुंदर वाटत प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमीच जीवंत राहतात मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही परमात्मा कधीच कुणाचं भाग्य लिहित नाही भाग्य लिहीतात ते आपले विचार व्यवहार आणि कर्म मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो त्यामुळे आनंदी रहा खुश रहा स्वतः हसा व दुसऱ्यांनाही हसत ठेवा हेच यशस्वी जीवनाचे गमक होय साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही रंग असे ऊधळा की नंतर त्यांचे डाग म्हणून नाही तर गोड आठवण असं अस्तीत्व राहील जे दिसतं ते सत्यात असतच असं नाही हसतोय म्हणून सुखी आहे पण तसं नाही*✍️


*👏विचारधन परिवर्तन👏*


    *🕉️शुभदिन 🕉️*

Yuva parivartan

] Yuva Parivartan Sharma: https://forms.gle/7486UmERNYtpTcX47


Yuva Parivartan Sharma: Hi Sir/ Madam

Good day



Please joined this link get more information on our Mobile Application and on YES TALK webinar, it is a free session.


कृपया या लिंकवर सामील व्हा आमच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर आणि येस टॉक वेबिनारवर अधिक माहिती मिळवा, हे एक विनामूल्य सत्र आहे.



Thank you 

Shital Garud

8876893404

उच्च रक्तदाबात*

 *उच्च रक्तदाबात*


१) उच्च रक्तदाब चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही. 


२) तीन ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे. 


३) कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.


४) टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे.


५) जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे.


६) उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे. 


७) 5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे. 


८) गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी, त्याच सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाला




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड शहरातील 436 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड शहरातील 436 कोटी रुपयांच्याविकास कामांचे भूमिपूजन


            अमृत अभियानांतर्गत 329 कोटी रुपयांच्या कामांचा समावे

            नांदेड, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 436 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.


            चैतन्य नगर येथील शिवमंदीर परिसरात झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.


            केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण कामासाठी 329.16 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यामधून शहरात अद्याप मलनिस्सारण वाहिनी नसलेल्या भागात नवीन मलनिस्सारण वाहिनी करण्यात येणार आहे. तसेच ज्या भागातील मलनिस्सारण वाहिनी नादुरुस्त झाली आहे, तेथे जुनी वाहिनी बदलून नवीन मलनिस्सारण वाहिनी जोडली जाणार आहे. एकूण 430 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनिस्सारण वाहिनीची जोडणी याद्वारे केली जाणार आहे. तसेच मलनिस्सारण केंद्रातील विविध यंत्रसामग्रीचा यामध्ये समावेश आहे.


            महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नांदेड शहर रस्ते विकास प्रकल्पातील 107.32 कोटी रूपये निधी मंजूर आहे. या निधीतून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील 182 रस्त्यांची कामे होणार आहेत. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यां

च्या हस्ते झाले.


0000


येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य माणसाचा !

 

त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत राहणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य माणसाचा !


▪ शासन आपल्या दारी कार्यक्रमात विविध विभागाच्या योजनांमधून


2 हजार 213 कोटी रुपयांचे लाभ 


▪ मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शहिदांना अभिवादन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद 


▪ लाभधारकांच्या अभूतपूर्व गर्दीने अबचलनगर फुलले


▪40 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतली अनुभूती  


 


            नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासनाने केवळ 11 महिन्यात घेतलेले निर्णय हे मागील अडीच वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढणारे असून “सरकारी काम सहा महिने थांब” ही संकल्पना आपण सर्वांनी मोडीत काढून दाखविली आहे. सरकारी कामासाठी आता सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, कारण शासनच आपल्या दारी आले आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य जनतेचा असेल व त्यांच्या हितासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण सतत काम करत राहू या शब्दात आश्वस्त केले. नांदेड येथील अबचलनगर येथे आयोजित “शासन आपल्या दारी” या भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.


            यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार संतोष बांगर, आमदार ज्ञानराज चौगुले, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक, विविध योजनांचे लाभार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी माहूरगड येथील श्री रेणुकादेवी, श्री गुरूगोविंद सिंघजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचा, हुतात्म्यांचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची बांधिलकी आम्ही स्विकारली आहे. नांदेड जिल्ह्यातील जनतेसाठी विविध शासकीय विभागांच्या योजनांमधून सुमारे 2 हजार 213 कोटी रुपयांचे लाभ दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 


शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत उभे


 शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याच्या कष्टाचा सन्मान सर्वांनी करायला हवा असे मुख्यमंत्री म्हणाले. शासनाला आता कुठे एक वर्षच पुर्ण होईल परंतू या अल्पकाळात शासनाने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. शासनाने एनडीआरएफच्या दरापेक्षा दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत केली, आतापर्यंत शासनाने जवळपास 10 हजार कोटी रुपयांची मदत आपदग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची नुसतीच घोषणा झाली होती परंतू हे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे काम या शासनाने केले आहे. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय शासनाने केला, त्यासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूदही केली. शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. प्रधानमंत्री महोदयांनी 6 हजार रुपयांची शेतकरी सन्मान योजना सुरु केली होती आपण त्यात आणखी सहा हजार रुपयांची भर घालून शासनाने ही रक्कम 12 हजार रुपये इतकी केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


 


सरकार सर्वसामान्यांचे


सर्वसामान्य माणसांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे शासन काम करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या शासनाने सर्वसामान्य माणसाच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय असो, पर्यटनाचा, ई फाईलिंगचा निर्णय असो की अन्य कोणताही, शासनाने 75 हजार युवक-युवतींना शासकीय नोकऱ्या देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. विविध कंपन्यांसमवेत चर्चा आणि समन्वय करून आपल्या तरूणांच्या हाताला रोजगार देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करत असून आतापर्यंत दीड दोन लाख लोकांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.


 


कृषि महाविद्यालयाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय


नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पैनगंगा नदीवर 1 हजार 600 कोटी रुपये खर्चाचे सात बंधारे बांधण्यास शासनाने मंजुरी दिली आहे यातून 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. विविध सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने 6 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचेही ते म्हणाले, लेंडी प्रकल्प असो की नांदेडला जोडणारे रेल्वे प्रकल्प असो, शासन नांदेडच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करील, समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हिंगोलीमध्ये शंभर कोटीचा हळद प्रकल्प शासन सुरु करत आहे. नांदेडच्या कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव तपासून त्यावरही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


 


हक्काचे सरकार आणि हक्काचा माणूस..


महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली असून लेक लाडकी उपक्रम असेल, बचतगटांच्या वस्तुचे ब्रॅण्डिग आणि मार्केटिंग असेल, महिलांना एसटी बस प्रवासात 50 टक्के तिकिट दरात सवलत असेल, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास असेल या सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांचा लाभ आज राज्यातील नागरिक घेत आहे, हे आपल्या हक्काचे सरकार आणि मी आपल्या हक्काचा माणूस असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


 


गावापर्यंत पोहचण्याचा शुद्ध हेतू म्हणजे शासन आपल्या दारी - पालकमंत्री गिरीष महाजन


 


दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजना पोहोचाव्यात या शुद्ध हेतूने शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम आपण राबवित आहोत. सर्वसामान्य माणसाला बऱ्याचवेळा त्यांच्या हक्काच्या, तो ज्या योजनेला पात्र आहे त्या योजनेबाबत नेमकी कुठे अर्ज करावा लागतो याची कल्पना नसते. त्या-त्या योजनांचे निकषही त्याला माहित नसतात. अशावेळी शासन ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचते याला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. कर्तव्याची भावना आणि जबाबदारी स्विकारून शासकीय योजनेत अधिक पारदर्शकता व साक्षरता यातून निर्माण होईल, असा विश्वास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे दु:ख समजून घेत आहेत. त्यांच्यासाठी शासन पातळीवर अनेक योजना घेऊन ते पोहोचत असल्याचे गौरव उद्गार नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काढले.


     शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी आम्ही सदैव तत्पर - कृषि मंत्री अब्दुल सत्तार


निसर्गाच्या आव्हानात शेतकरी हा नेहमी गुरफटलेला असतो. विविध आव्हानात गुरफटलेल्या शेतकऱ्यांना अनेक विकास योजनांच्या माध्यमातून आर्थीक विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी निसर्गाकडून आणि बाजारपेठेतील शेतमालाच्या भावात होणाऱ्या बदलातून सदैव त्रस्त असतो. जेंव्हा शेतमालाचे उत्पादन अधिक होते तेंव्हा बाजारात भाव नसतो. शेतकऱ्यांची ही आर्थिक कुचंबना थांबविण्यासाठी शासनाने गोडाऊन योजनेवर भर दिला आहे. यासाठी तब्बल 60 टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जात आहे. बाजारात जेंव्हा शेतमालाला भाव नसतील तेंव्हा हा शेतमाल गोडाऊनमध्ये साठवता येईल, असे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधतांना सांगितले. शेतीसमवेत शेतीपूरक उद्योग व्यवसायावर अधिक भर दिला आहे. महिला बचतगटांना शेळी याचबरोबर गाई व म्हशीबाबतचा निर्णय शासनाने घेतला. मागेल त्याला शेततळे, सौरऊर्जा, औजार बँक, नांगर, वकर, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ड्रोनने फवारणी यासाठी विद्यापीठ पातळीवर प्रशिक्षण, सौरऊर्जेवर कृषिपंप अशा विविध योजना घेऊन सरकार शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असल्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.


उद्योग विकासाला चालना मिळेल - खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर


राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावी, तत्पर सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी झटत आहेत. हे सरकार देणारे असल्याचे सांगून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात उद्योग व रस्ते विकासाचा प्रलंबित अनुशेष पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.


 


शासन आपल्या दारी अभियानाच्या अनुभूतीने सर्वसामान्यांचा विश्वास वाढला - खासदार हेमंत पाटील


शासनाशी संबंधित सर्वसामान्य माणसाला अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. साध्या प्रमाणपत्रापासून ते लाभाच्या योजनेपर्यंत त्याला कार्यालयात खेटे मारावे लागतात. शासन आणि लाभार्थी यांच्यामधील ही दरी कमी करण्यासाठी शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम अत्यंत मोलाचा असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. रिक्षा चालविण्यापासून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अनुभव घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप काही अनुभवले आहे. ही अनुभवाची शिदोरी घेऊन शासकीय योजनांना त्यांनी अधिक जबाबदार व लोकाभिमूख केल्याचे त्यांनी सांगितले.


 


कृषि महाविद्यालयाची आ. कल्याणकर यांची मागणी या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून शासना आपल्या दारीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात शासकिय योजनांना गती मिळाल्याचे सांगितले. याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील कृषिचे क्षेत्र लक्षात घेता कृषि महाविद्यालयाची मागणी केली.


 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे वितरणही करण्यात आले. “माझी मुलगी माझा अभिमान” अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 5 हजार घरांना मुलींचे नाव दिले. या अभियानाला अधोरेखीत करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सौ. लताताई एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी कुमारी प्रगती व्यंकट नव्हाते या लहान मुलीच्या हस्ते मुख्यमंत्री यांना देण्यात आली. याचबरोबर त्यांच्या हस्ते शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 हजार 123 शेतकऱ्यांना 2 कोटी 5 लक्ष एवढे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य

 मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.


 


00000


Featured post

Lakshvedhi