Wednesday, 11 January 2023

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगामुळे नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक

 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगामुळे नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक

- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

               मुंबई, दि. ११ : मानवी हक्कांची जपणूक करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कार्यरत आहे. समाजामध्ये याबद्दल जाणीव जागृती व्हावी, या हेतूनेच 'राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत' ही संकल्पना समोर ठेवून सुनावणी आयोजित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना या माध्यमातून त्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.


            राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्यावतीने आज आणि उद्या दि. १२ जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे दोन दिवसीय विभागीय खंडपीठाच्या शिबीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन डॉ. मुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सदस्य राजीव जैन, आयोगाचे महासंचालक (चौकशी) मनोज यादव, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, रजिस्ट्रार सुरजित डे, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती.


            यावेळी बोलताना डॉ. मुळे म्हणाले की, मानवाधिकारांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तक्रारकर्त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण व्हावे, या उद्देशाने असे शिबीर, बैठका आणि खुली सुनावणी आयोगाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. मानवी हक्क हा नैसर्गिक हक्क आहे. त्यामुळे या हक्कांची जपणूक करणे ही संबंधित राज्यांची जबाबदारी आहे. नागरिकांना याद्वारे त्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्याचा मार्ग उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले.


            अनेक राज्यांमध्ये राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. हा आयोग स्वायत्त असला तरी मानवी हक्कांच्या बाबतीत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या सर्वांच्या समन्वयाने आणि त्यांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका घेतली आहे. विविध तक्रारींच्या सोडवणुकीसाठी हे उपयुक्त असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.


            ते म्हणाले की, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने तक्रारदारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


            या दोन दिवसीय सुनावणी दरम्यान न्यायालयीन कोठडीतील मृत्यू, मूलभूत मानवी हक्क आदींच्या बाबतीतील तक्रारींची सुनावणी होणार आहे. यावेळी तक्रारदार आणि संबंधित विभाग प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांचे म्हणणे आयोगासमोर मांडणार आहेत, असे डॉ. मुळे यांनी सांगितले.


            राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अशा प्रकारे विभागीय खंडपीठाच्या सुनावणी सन २००७ पासून घेत आहेत. आयोगाने आतापर्यंत उत्तर प्रदेश,बिहार, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, आसाम, मेघालय, छत्तीसगड, मणिपूर, मध्यप्रदेश, पंजाब, केरळ, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, झारखंड, अंदमान आणि निकोबार, नागालँड, उत्तराखंड, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यात सुनावणी घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.


            आयोगाचे सदस्य श्री. जैन म्हणाले की, प्रत्येक राज्याने मानवी हक्कांविषयीचा स्वतंत्र कक्ष सुरू करणे आवश्यक आहे. आयोगाने पोर्टल सुरू केल्यामुळे यंत्रणांना त्यांची माहिती तत्काळ अपलोड करणे सोयीचे होणार आहे. मानसिक आरोग्य संदर्भातील कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.


            गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये म्हणाले की, महाराष्ट्र राज्याने नेहमीचं मानवी हक्कांची जपणूक करण्याबाबतचा दृष्टिकोन ठेवला आहे. त्यामुळेच दिव्यांगासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्याचा निर्णय येथे घेण्यात आल्याचे ते म्हणाले.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त पोलिस महासंचालक श्री. कारगावकर यांनी केले. सूत्रसंचालन वरिष्ठ पोलिस अधिकारी जयंत मीना यांनी केले तर आभार आयोगाचे रजिस्ट्रार श्री. जैन यांनी मानले.


            उद्घाटन सत्रानंतर दुपारच्या सत्रात विविध तक्रारींच्या सुनावणी आयोगाच्या सदस्यांसमोर घेण्यात आल्या.

अंगणवाड्यांच्या बळकटीकरणावर शासनाचा भर

 अंगणवाड्यांच्या बळकटीकरणावर शासनाचा भर

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

५० अंगणवाड्या दत्तक देण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार.

            मुंबई, दि. ११ : लोकसहभागातून अंगणवाडी केंद्रे बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. अंगणवाडी केंद्र दत्तक देवून अंगणवाडी बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनकल्याण समिती, युनायटेड वे मुंबई, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट, भव्यता फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्यामध्ये आज झालेल्या सामंजस्य करार (एमओयू) अंतर्गत 50 अंगणवाड्या दत्तक देण्यात आल्या आहेत. यामुळे या अंगणवाड्यांचे बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


                मंत्री श्री. लोढा यांच्या दालनात आज अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनकल्याण समिती यांच्यामध्ये एक सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला, त्यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते. एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल, महिला व बालविकास विभागाचे उपसचिव वि.रा.ठाकूर, अवर सचिव श्री.खान, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर, जनकल्याण समितीचे अजित मराठे, युनायटेड वे मुंबईचे अनिल परमार, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे जय कुमार जैन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्टचे जयराम शेट्टी, भव्यता फाऊंडेशनचे कुनिक मणियार, लायन्स क्लब ऑफ जुहूचे अंकित अजमेरा उपस्थित होते.


                मंत्री श्री.लोढा म्हणाले, या करारानुसार पुढील १० वर्षांसाठी शासनाला सहाय्य करण्यासाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत. जनकल्याण समिती मुंबईतील १२ अंगणवाड्या, युनायटेड वें मुंबई कर्जत मधील वीस अंगणवाड्या, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी वडाळा मधील तीन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट यांनी पश्चिम उपनगर येथील पाच, भव्यता फाउंडेशन यांनी मुंबई उपनगर घाटकोपर येथील पाच अंगणवाड्या, लायन्स क्लब ऑफ जुहू यांनी मुंबई उपनगरातील पाच अशा ग्रामीण व शहरी मिळून ५० अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत.


            दत्तक घेतलेल्या कालावधीत या अंगणवाड्यांचे नूतनीकरण, रंगकाम, फर्निचर, क्षमता वाढ, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांची जबाबदारी देखील जनकल्याण समिती द्वारे घेण्यात येणार आहे. अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी 9082269044 या नंबर वर संपर्क साधावा, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.


            तसेच राज्यातील प्रत्येक माता निरोगी राहून, लहान बालक सुदृढ ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. सक्षम राज्य निर्मिती होण्याकरिता अंगणवाडी केंद्र दत्तक घेणे ही शासनाची नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. या संकल्पनेला सर्वांनी पुढे नेण्यासाठी ‘चला अंगणवाडी दत्तक धोरणाला हातभार लावूया व महाराष्ट्र राज्याला एक सक्षम व सुदृढ पिढी देवूया’, असेही ते म्हणाले.


            एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, राज्यात एक लाख दहा हजार अंगणवाडी असून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्यांना स्मार्ट सुविधा देण्यात येतात. याव्यतिरिक्त उर्वरित अंगणवाड्यांना अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत विकास करण्यासाठी हे धोरण राबवण्यात येत आहे.


***

करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील जागा

 करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील जागा

शासकीय कार्यालयांना देण्याबाबत कार्यवाहीच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.

            मुंबई, दि. ११ : करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील कृषी आणि आरोग्य विभागाच्या ताब्यात असणाऱ्या जागेमधील त्यांना आवश्यक असणारी जागा वगळून इतर उपलब्ध जागा शासकीय कार्यालये आणि इतर प्रयोजनासाठी उपयोगात आणण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.


            सह्याद्री अतिथीगृह येथे आज शेंडा पार्क येथील जमीन विविध प्रयोजनासाठी उपयोगात आणण्याच्या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री दीपक केसरकर, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कोल्हापूर येथील करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील जागेत जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा ग्रंथालय, हवामानशास्त्र प्रयोगशाळा, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, प्रस्तावित जिल्हाधिकारी कार्यालय, वखार महामंडळ गोडावून आणि कार्यालय, समाजकल्याण वसतिगृह, करवीर पोलिस ठाणे, प्रस्तावित नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, प्री एनडीए अकादमी, आय टी पार्क आदी प्रयोजनासाठी जागा आवश्यक आहे. सध्या कृषी आणि आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेली जागा उपयोगात आणण्याबाबत संबंधित विभागांचा अभिप्राय घेऊन कार्यवाही करावी. कृषी आणि आरोग्य विभागाला त्यांच्या विविध प्रयोजनासाठी आवश्यक असलेली जागा वगळता इतर जागा या इतर प्रयोजनासाठी उपयोगात आणण्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कांदाभजी"*आयुष्य हे

 *"कांदाभजी"*


व्यक्ती कधी स्ट्रेसमधे जाऊन आत्महत्या किंवा काय भयानक निर्णय घेईल काहीच सांगता येत नाही. पण काहीवेळा अशावेळी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीचे जीवनच बदलून जाते.  


मुंबई - अलिबाग मुख्य रस्त्यावरील एका छोटेखानी पिकनिक स्पाॅटचे एक गांव. त्या गावातील एका व्यक्तीची ही गोष्ट. 


बावीस वर्षांचा तरूण मुलगा. सुशिक्षित व रोज दोन घास मिळतील अशा शेतकरी कुटुंबातला. काही कारणाने दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शेतात भात झाला नाही. शेतातून येणार्‍या भात व वालावर वर्ष काढणार्‍या कुटुंबाला पीक न आल्याने अर्थातच वर्षभर खायचं काय हा प्रश्न पडला होता. वडील , मोठा भाऊ व हा मुलगा रोजंदारीवर काम मिळेल ते करू लागले. पण रोज काम मिळेल याची काहीच खात्री नाही. त्यामुळे उद्या जेवायचे काय? हा प्रश्न सतत ग्रासत असायचा.


याच विवंचनेतून या कुटुंबातील धाकट्या मुलाला स्ट्रेस ने गाठले. सतत विचित्र विचार करत हा मुलगा अनाकलनिय गोष्टी व निरर्थक बडबड करू लागला. आईवडिलांना याला आता वेडबीड लागते की काय अशी भिती वाटू लागली. अचानक या मुलाने परवा आत्महत्या करायची असे निश्चित केले. पण आत्महत्या करण्या आधी कुटुंबातील सर्वांना कांदाभजी खायला घालायची असा त्याने विचार केला. 


दुसर्‍या दिवशी आईच्या कडून थोडे पैसे घेऊन त्याने कांदाभजी बनविण्यासाठीचे सर्व साहित्य स्वतः जाऊन आणले. दुपारी हा मुलगा ठरल्याप्रमाणे कांदाभजी तयार करण्यास घरा बाहेरील चुलीजवळ बसला. भजी तेलात सोडून खमंग होण्याची वाट बघत बसलेला असतानाच एक व्यक्ती पत्ता विचारण्यासाठी अचानकपणे या मुलाजवळ पोहोचला. कांदाभज्यांच्या खमंग वासाने पत्ता विचारण्याऐवजी या मुलाजवळ दोन प्लेट भजी देशील का अशी विचारणा केली. मुलाला "धंदा" वगैरेची काहीच कल्पना नव्हती. तो मुलगा त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला दादा पैसे नको.. माझ्याकडून अशीच घ्या ही भजी.. 


त्या व्यक्तीने जास्त विचार न करता तिथेच बसून भजी खाण्यास सुरवात केली. कुरकुरीत चविष्ट कांदाभजी त्याला जबरदस्त आवडली. भजी खात असतानाच त्या व्यक्तीचे व मुलाला पत्ता विचारला. मग काय करतोस , शिक्षण किती, घरी कोण कोण आदी साधारण गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता तो व्यक्ती या मुलाला म्हणाला उद्या संध्याकाळी सहा साडे सहा वाजता इथूनच परत जाईन.. मला पाच सहा प्लेट कांदाभजी बनवून ठेव.. पण त्याचे मात्र पैसे घ्यायचे.. 


हे ऐकल्यावर तो मुलगा रडायला लागला.. आणि त्या व्यक्तीला म्हणाला.. दादा.. उद्या भजी नाय मिळणार.. तुम्ही नका येऊ इकडे उद्या.. सदरचा प्रसंग जरा विचित्रच होता. ती व्यक्ती थोडी विचारात पडली की हा असं का बोलतोय.. थोडा वेळाने तो मुलगा जरा शांत झाला. मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली चल जरा गांव दाखव तुमचा.. थोड्या नाराजीनेच तो मुलगा त्या व्यक्ती बरोबर निघाला. चालताना बोलता बोलता त्या व्यक्तीने या मुलाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? याचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेरीस बोलण्याच्या ओघात तो मुलगा त्या व्यक्तीला म्हणाला. दादा मी उद्या या जगात नसेन.. म्हणूनच आज मी आईबाबांना आवडतात ती कांदाभजी करून खायला घातली.. आणि पुन्हा रडू लागला.


अखेरीस त्या व्यक्तीने त्या मुलाला थेट विचारलं.. का करतो आहेस आत्महत्या?? या अनपेक्षित प्रश्नाने तो मुलगा स्तब्ध झाला. त्या व्यक्तीने मुलाला धीर देत देत विचारलं तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा प्रश्न नक्की सुटणार आहे आत्महत्या करून?? यावर त्या मुलाकडे ठोस उत्तर नव्हतं. पण काही वेळाने तो मुलगा म्हणाला दादा.. जगायचं तरी कसं?? ना भात ना वाल.. ना काम मिळतंय रोज.. नाही बघवत आईवडिलांची ही परिस्थिती.. मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली की.. उद्या तुझी बाॅडी बघून आनंद होईल का तुझ्या आईवडीलांना?? त्यापेक्षा काहीतरी उद्योगधंदा कर.. आता तो मुलगा त्या व्यक्तीवर थोडा वैतागून म्हणाला.. पैसे नको धंदा करायला.. बोलायला काय जातंय.. धंदा कर.. 


यावर त्या व्यक्तीने मुलाला सुचवलं की तू कांदाभजी इतकी भन्नाट बनवतोस.. मग तीच का नाही विकत.. जे भांडवल लागेल ते मी देतो.. धंदा कर पैसे जमव.. आणि जमलं तर हळूहळू परत कर पैसे.. हो ना करता करता तो मुलगा तयार झाला. त्या व्यक्तीने त्याला विचारलं किती लागतील तुला पैसे? मुलगा आता धंद्याचा विचार करू लागला होता. थोडा विचार आकडेमोड करून तो बोलला भजी बनवायला घरातलं बाकी सामान आहे.. झारा, कढई आणि तेल - कांदा - बेसन लागेल आणायला.. त्या व्यक्तीने त्याला विचारलं तरी अंदाजे किती लागतील.. तो मुलगा म्हणाला दोन तीन हजार तरी लागतील. त्या व्यक्तीने या मुलाला वडखळ एटीएम मधून पाच हजार काढून दिले. मुलाला आता आशेचा सूर्योदय दिसत होता. त्याने वडखळ येथून लगेच काही सामान घेतलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीत ठेवलं. धंदा कुठे लावणार याची जागा दाखवण्यसाठी तो मुलगा त्या व्यक्तीच्या पाया पडत आनंदाने रडत रडत म्हणाला.. दादा इथे या आडोशाला लावतो उद्या धंदा.. तुम्ही नक्की या.. भजी खायला.. त्या व्यक्तीने मुलाला सांगितले की भजी तर खाईनच पण त्या बरोबर छान गोड चहा ही हवा.. मुलगा जे समजायचं ते समजला.. आणि म्हणाला हो दादा.. चहा पण ठेवतो उद्यापासून.. पण तुम्ही नक्की या..


ती व्यक्ती त्या मुलाचा निरोप घेऊन तेथून निघाली. दुसर्‍या दिवशी धंदा लागलाय का हे दूरूनच गाडीतून पाहून समाधानाने निघून गेली. हळूहळू त्या मुलाचा धंदा व्हायला लागला. मुलगा रोज त्या व्यक्तीची वाट पहात इमाने इतबारे त्या व्यक्तीकडून घेतलेले पैसे हळूहळू जमा करू लागला.


अखेरीस दोन वर्षांनी ती व्यक्ती चहा घेण्यासाठी एका स्टाॅलवर थांबली व एक चहा अशी ऑर्डर तेथील मुलाला दिली. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून पाठच्या बाजूची ताडपत्री बाजूला सारत एका मुलाने त्या व्यक्तीला दादा.. तुम्ही आलात अशी आनंदाने हाक मारली.. त्या मुलाला पाहिल्यावर त्या व्यक्तीला सदर घटना आठवली.. आणि त्याने त्या मुलाला विचारलं अरे इकडे कुठे?? कसा आहेस? धंदा कसा चाललाय?? पटापट खुर्ची ठेऊन ती साफ वगैरे करत त्या मुलाने त्या व्यक्तीला हाताने धरून बसा बसा करत खुर्चीत बसवले.. पाण्याची बाटली समोर ठेवली.. एक मिनिट दादा म्हणत पटकन नवी कांदाभजी बनवून ती प्लेट आणि घट्ट गोड चहा त्या व्यक्ती समोर ठेवला.. स्वतः पायाशी बसून दादा धंदा छान चाललाय, घराला पत्रे घातले, पाॅवर टिलर घेतला, सेकंड हॅन्ड बाईक घेतली आदी सर्व सर्व गोष्टी डोळेभरून सांगू लागला.. 


तोपर्यंत चहा कांदाभजी संपली होती. त्या व्यक्तीने हात धूवून त्या मुलाला शंभरची नोट दिली. पैसे पाहून तो मुलगा म्हणाला काय दादा.. पैसे काय देता.. तुमचंच दुकान आहे.. आणि तुम्ही दिलेले पैसे पण मी जमा केलेत तुम्हाला परत द्यायला.. आणि पटकन एका डब्यात रुमालात बांधून ठेवलेले पैसे हातात घेऊन तो म्हणाला रोज वाट बघायचो तुमची.. तुम्ही आलातच नाही.. मला तुमचं नाव पण नाही माहिती.. कसं शोधणार तुम्हाला.. मग है पैसे जमा झाल्यावर यात बांधून ठेवले.. तुम्हाला परत द्यायला.. 


हे सर्व पाहून ती व्यक्ती पार हरखून गेली. दोन वर्षांपूर्वीचा तो निराश मुलगा आजचा उद्योजक झाला होता. त्या व्यक्तीने ते पैसे त्या मुलाच्याच हातात परत ठेवत म्हटले.. तू हे पैसे दुसर्‍या कुणाला तरी दे.. त्याला धंदा शिकव.. 

आणि त्यालाही असेच करायला सांग.. 

बाकी श्रमाचि कृपा आहेच.. आणि ती व्यक्ती कांदाभज्यांच्या खमंग वासाने सेटल झालेल्या उद्योजकाला निरोप देत आपल्या पुढील प्रवासाला लागली. 


"एखादी साधी घटनाही आयुष्य बदलवू शकते.. गरज असते ती परिस्थितीसमोर हार न मानता परिस्थितीचा हात हात घेऊन पुढे चालण्याची.."


*मैत्रीची पाठशाळा* 

नुसतेच जगू नका जगायलाही शिकवा आज एकाला वाचवले तर तो इतरांना स्वतः सारखे होऊ नये म्हणून प्रयत्न करेल...👍🏻

महागाई भत्ता जुलै २०२२

 


जिंदगी गुलजार हैं





 

दृष्टी बदलली की सृष्टी बदलते*

 शिक्षकाने वर्गात विचारले: 

*जगात कोणत्या ठिकाणाला प्रेमाचे प्रतीक मानलं जातं?*


संपूर्ण वर्ग एकाच आवाजात ओरडला: "ताजमहाल" फक्त एक विद्यार्थी म्हणाला: "रामसेतू"! शिक्षकाने त्याला उभे केले आणि विचारले, "तुला काय म्हणायचे आहे?"


तो विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला, "रामसेतू भगवान श्रीरामांनी आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी बांधला होता, तिला पुरण्यासाठी नाही, आणि दुसऱ्याची जमीन हडप करून तर नाहीच. आणि ज्यांनी पूल बांधला त्यांना भगवान श्रीरामांनी पूर्ण आदर दिला. त्यांचे हात तोडले नाही." शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना ते ऐकून धक्का बसला. खरोखर आपण आपल्या इतिहास आणि पौराणिक कथांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची अत्यंत गरज आहे.


*दृष्टी बदलली की सृष्टी बदलते*


🙏🙏 *जय श्री राम* 🙏🙏

Featured post

Lakshvedhi