सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 10 January 2023
उलथले ka?
नारायणराव पत्त्याच्या जुगारात पाच लाख रुपये हरले.. त्या धक्क्याने हार्ट अ टॅक येऊन त्यांचा जागेवरच मृ त्यू झाला… त्यांच्या मित्रांना धडकी भरली. “वहिनींना सांगायचं कसं ?”.
अखेर लक्ष्मणराव म्हणाले “मी सांगतो, द्या इकडे फोन!”. लक्ष्मणरावांनी वहिनींना फोन लावला, “हां वहिनी, मी लक्ष्मण बोलतोय!”
“काय म्हणताय भाऊ ?” लक्ष्मीबाई म्हणाल्या. ” काही नाही, नारायणराव पत्त्यात दोन लाख रुपये जिंकलेत!” “अय्या, खरंच काय.. येऊ द्या घरी, दृष्टच काढते बाई त्यांची!”.
” नाही वहिनी, नंतर काय झालं, ते पाच लाख रूपये हरलेही !”. “काय, पाच लाख घालविले ?” लक्ष्मीबाई कडाडल्या! “त्यापेक्षा उलथून का गेले नाहीत !”.
“तेच झालंय सांगायला फोन केला होता, लक्ष्मणराव उलथले!!!😂
युवा आयुर्वेद डॉक्टरांनी आधुनिक आजारांवर 'रामबाण' उपाय शोधावे'
युवा आयुर्वेद डॉक्टरांनी आधुनिक आजारांवर 'रामबाण' उपाय शोधावे'
-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. १० : पूर्वीच्या काळात भारतातील आयुर्वेद वैद्यांचे नाडीज्ञान खूप प्रगत होते. आयुर्वेद डॉक्टरांच्या नव्या पिढीने देखील प्राचीन नाडी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वनस्पतीच्या मुळांमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. अश्या औषधी वनस्पतींवर संशोधन करून संशोधकांनी नवीन मापदंडांच्या आधारे आधुनिक आजारांवर आयुर्वेदातून 'रामबाण' उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.
राजभवन येथे 'आयुर्वेद शिरोमणी' सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली येथील पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, अध्यक्ष राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ तसेच प्राध्यापक वैद्य राकेश शर्मा, अध्यक्ष, नितिमत्ता व नोंदणी समिती, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग यांना सोमवारी राज्यपालांच्या हस्ते. उभय नामवंत आयुर्वेदाचार्यांना आयुर्वेदाच्या उल्लेखनीय सेवेसाठी वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात आले.
आज आधुनिक चिकित्सा पद्धतीला पर्याय नाही. परंतु अनेक ॲलोपॅथी औषधांचे साईड इफेक्ट देखील असतात. या दृष्टीने भारतातील आयुर्वेदिक ज्ञानाचा वारसा अधिक समृद्ध कसा करता येईल व आयुर्वेदाच्या माध्यमातून जगाला निरामय जीवन जगण्याचा मार्ग कसा दाखवता येईल या दृष्टीने विचार झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
आज राजस्थान, उत्तराखंड, पंजाब तसेच गुजरात येथे स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात देखील ८० आयुर्वेद महाविद्यालयाने कार्यरत आहेत. राज्यातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांच्या विकास व नियंत्रणासाठी राज्याने एक स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठ तयार करावे, अशी सूचना आयुर्वेदाचार्य वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी यावेळी केली.
राष्ट्रपती भवनाप्रमाणे राजभवन येथे देखील राज्यपालांनी एक आयुर्वेद क्लीनिक सुरु करावे, अशी सूचना त्रिगुणा यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाला वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनचे विश्वस्त वैद्य महेंद्र चतुर्वेदी, महाराष्ट्र आयुष संचालनालयाचे संचालक डॉ राजेश्वर रेड्डी, डॉ गोविंद रेड्डी, अनेक वरिष्ठ आयुर्वेद चिकित्सक, प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.
००००
Maharashtra Governor presents 'Ayurved Shiromani'
Awards to Vaidya Devendra Triguna,Vaidya Rakesh Sharma
Mumbai 10: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 'Ayurved Shiromani' Samman' to Padma Bhushan Vaidya Devendra Triguna, President, Rashtriya Ayurveda Vidyapeeth, New Delhi and Prof Vaidya Rakesh Sharma, President, Ethics & Registration Committee, National Commission for Indian Systems of Medicines, New Delhi at Raj Bhavan Mumbai on Mon (9 Jan).
The awards instituted by the Vaidya Sureshchandra Chaturvedi Health Foundation were presented to the two Ayurvedacharyas in recognition of their exemplary services in the field of Ayurveda.
Speaking on the occasion, Governor Koshyari called upon young Ayurveda Vaidyas to find out sureshot medicines for various ailments through modern research. Vaidya Devendra Triguna urged the Governor to create a separate Ayurveda University in Maharashtra on the lines of similar Universities in Rajasthan, Uttarakhand, Punjab, Gujarat and other states.
Managing Trustee of the Foundation Vaidya Mahendra Chaturvedi, Director, AYUSH, Maharashtra Dr Rajeshwar Reddy, Vaidyas and Professors from Mumbai region and students were present.
0000
राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तात्काळ समिती गठन करावी
राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तात्काळ समिती गठन करावी
- आमदार भातखळकर यांची मागणी.
राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तात्काळ समिती गठन करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायदा करण्याचे अधिकार राज्यांना आहेत असा निर्णय उत्तराखंड सरकारने नेमलेल्या समितीच्या विरोधात दाखल याचिकेवर दिला आहे. त्या संदर्भानुसार महाराष्ट्र राज्यात ही समान नागरी कायदा आणण्यासाठी समिती गठन करण्यात यावी असे आ. भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी तिहेरी तलाक रद्द करुन मुस्लिम भगीनींना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे, त्यानुसार राज्यात समान नागरी कायदा आणल्यास खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता होईल असेही आ. भातखळकर म्हणाले आहेत.
मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याबाबत सकारात्मक विचार करतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
भावकी ‼️ चा खांदा
. *‼️ भावकी ‼️
*_संकलन : मिलिंद पंडित, कल्याण_*
"आमची भावकी चांगली आहे" म्हणणारे फार दुर्मिळ आहेत. "आमच्या सारखी भावकी कोणाचीच नाही" असे म्हणणारेही खूप आहेत.
खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत? हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे. अनेक पिढ्या, घरे, घराणी यात भूईसपाट झाल्याचा इतिहास आहे.
शहाजीराजे, शिवराय, शंभूराय यांनाही याच्या झळा लागलेल्या आहेत. पुण्यातील पेशव्यांनी तर यात कळस गाठला आहे. ती इतिहासाची पाने तर रक्तरंजीत आहेत. थोडक्यात, यातून कोणाचीच सुटका होत नाही, कारण तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला दुबळा समजून त्रासच दिला जातो. कारण, भावकीतील व्यक्तीला नमवीण्यात एक वेगळाच अहंकार, गर्व दडलेला असतो, त्याचा मद व्यक्त करण्यात एक असूरी आनंद असतो.
आज दिवाणी खटले, फौजदारी गुन्हे, शेतजमिनीचे वाद यात भावकीच्या भांडणाचा क्रमांक नेहमीच पहीला आहे.
उत्पन्नाचा किती भाग आज समाज यावर खर्च करतोय. अल्प असलेल्या आयुष्यात किती वेळ सत्कारणी लागतोय आणि पुढच्या पिढीला आपण काय देतोय? हे प्रश्न जरी स्वतःला आपण दररोज विचारले तरी आपल्यात बदल होऊ शकतो आणि हेच आपल्या हातात आहे.
भावकीला बदलवणे शिवरायांना जमले नाही. पेशव्यांनाही जमले नाही. आपल्यालाही ते जमणार नाही. बदल स्वतःत केला पाहीजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका.
भावकीशी बोलताना शक्यतो प्रतीहल्ला टाळा. त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया टाळा. त्यांनी खोडी काढली तर प्रतिशोध टाळा. सर्वात महत्वाचे भावकीची निंदा करणे सोडून द्या आणि दुसरा कोणी आपल्या भावकीची निंदा करत असेल तर ऐकून घेऊ नका आणि सहनही करू नका.
त्यांनी साद घातली तर प्रतिसाद द्यायला विसरू नका. भावकीच्या यशाचे मन आणि तोंडभरून खरे कौतुक करायची सवय लावून घ्या. अडचणीच्या काळात मदतीचा हात स्वतः होऊन पुढे करा कारण भावकी मेली तरी भावकीच्या पुढे मदतीसाठी हात पसरत नाही. तो हात आपण समोर केला तर त्याच्या सारखे दुसरे समाधान नाही हे सर्व खूप अवघड आहे.
पण आजच्या काळात भावकी खूप गरजेचे आहे कारण आपण सर्वजण खूप अडचणीत आणि संकटात आहोत. या क्रियेने एकवेळ भावकीची साथ नाही मिळाली तरी चालेल, पण भावकीचा त्रास वाचला तरी हे थोडे नाही. कारण आयुष्यातील निम्मी शक्ती, संपत्ती आणि बहूमुल्य वेळ आपला यातच वाया चालला आहे.
सुधारायचे असेल तर ही शक्ती, संपत्ती आणि वेळ सत्कारणी लावता आला पाहीजे. भावकीतील वाद संपवणे हे सर्वात मोठे काम आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
म्हणूनच आमच्या पूर्वजांनी, संस्कृतीने अंतिम यात्रेत चार पैकी तिन खांदेकरी भावकीचे असावेत ही अट घातली आहे.
कितीही भांडा, प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होणार आहे.
🙏🙏🙏
************************************
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...




