Wednesday, 5 October 2022

प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्या

 प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

- जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 

            मुंबईदि. 4 : शालेय जीवनात ऐकलेलेअनुभवलेले प्रबोधनात्मक विचार विद्यार्थी आयुष्यभर लक्षात ठेवतात. या गोष्टी त्यांच्यासाठी पुढे अनुकरणीय होतातप्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी व्यक्त केला. जागतिक प्राणी दिनानिमित्त मुंबई जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी तर्फे मुंबई जिल्ह्यातील बृहन्मुंबई  महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना प्राण्यांबाबत जागृती करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयपरळ येथे करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजित रानडेप्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मुंबई विभाग डॉ. प्रशांत कांबळेमहाव्यवस्थापक देवनार पशुवधगृहाचे डॉ. कलीमपाशा पठाण तसेच वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग या संस्थेचे अबोध अरासजिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा  सदस्य सचिव डॉ. शैलेश पेठेबृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            महानगर पालिकेच्या शाळेत अशाप्रकारे साजरा करण्यात आलेला हा महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण जनजागृती कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना प्राण्यांचे अधिकार व प्राण्यांविषयक कायद्यांची माहिती देणाऱ्या प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या हस्ते झाले. जागतिक प्राणी दिनानिमित्त मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक व सन्मानपत्र वितरित करण्यात आले.

            जिल्हाधिकारी श्री. निवतकर म्हणालेप्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात येत असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यानिमित्त मुंबई शहरातील विविध शाळांत मुलांमध्ये प्राण्यांविषयी जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचा भविष्यात सकारात्मक परिणाम दिसेल. प्राण्यांवर दया करण्याविषयी केलेली चित्रफित पाहून मुले त्याचे अनुकरण करतील.

            डॉ. रानडे यांनी मनुष्याच्या सानिध्यात राहणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व सांगीतले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ - भोईवाडा मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे प्राण्यांचे महत्त्व विषद केले. डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी आभार मानले.

००००


योजनांचा आढावा

 मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून

 महानगरपालिका कामकाजाचा आढावा.

             मुंबई. दि.4 : राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बैठक घेवून महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच सध्या प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा घेतला.

            बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरांमध्ये असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुयोग्य प्रकारे होत असून याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचा उल्लेख त्यांनी आजच्या बैठकी दरम्यान केला. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांच्या दृष्टीने राज्य शासनाच्या स्तरावर समन्वय साधण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधितांनी प्राधान्याने करावी, असे निर्देश देताना पालकमंत्री म्हणून जे सहकार्य लागेल, ते निश्चितच केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी पालकमंत्री महोदयांना व उपस्थित मान्यवरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामांची व प्रकल्पांची माहिती यावेळी दिली.

             बैठकीस उत्तर मुंबई मतदार संघाचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई स्थानिक प्राधिकारी संस्थेचे विधान परिषदेतील आमदार राजहंस सिंह, गोरेगांव विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीमती विद्या ठाकूर, वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर, विलेपार्ले विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. पराग अळवणी आदी उपस्थित होते.

००

नमो माय

 


शुभेच्छा

 विजया दशमीनिमित्त

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा

 

            मुंबईदि. 4:  विजयादशमीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

            विजयादशमीच्या पावनपर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावेअशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतातविजयादशमी हा आपल्या संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण आहे. लोकभावनेला अभिव्यक्त करण्यात आपल्या सणांचे खूप मोठे योगदान आहे. विजयादशमी हा सण समाजातील चांगुलपणाचामांगल्याचा तसेच दुष्ट प्रवृत्ती आणि अवगुणावर विजय आहे. या पावनपर्वानिमित्त समाजात चैतन्याला उधाण येते. राज्यातील जनतेला सुख-समृद्धी लाभावी तसेच यानिमित्ताने दुःखनकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभावी.

००००


आपटा आणि त्याचे उपयोग

 आपटा आणि त्याचे उपयोग


आपटा ह्या झाडाची पाने दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून वाटतात. तसेच ह्याच्या पानाच्या विड्या करून त्या ओढतात.


◆लघवीला जळजळ, दुखत असेल तर.

लघवीच्या वेळी कळ,कंड, जळजळ होत असेल, तर आपट्याच्या पानांचा रस,आपट्याच्या पानांचा रस निघत नाही म्हणून पाणी घालून तो वाटून काढावा.हा रस 20 ग्रॅम काढून त्या रसाइतकेच दूध व साखर घालावी व हे औषध दिवसातून वयोमानाप्रमाणे चार वेळा घ्यावे. लघवी साफ सुटून सर्व विकार थांबतात. लघवीतून खर पडत असेल तर आपट्याच्या कोवळ्या तुऱ्यांचा किंवा पानांचा रस काढून 1चमचा सांजसकाळ घ्यावा, खर जाण्याची थांबते.आपट्याच्या शेंगा मूत्रल आहेत. पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून दोन तीन वेळ प्यायल्याने लघवीस साफ होते.

गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग

गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाला असता तसेच आपट्याच्या 40 ग्रॅम सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून आणि तो गार झाल्यावर मध घालून वयोमानाप्रमाणे सोसवेल एवढा प्यावा. गंड माळेवर आपट्याची साल बांधावी. गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होतात.


◆व्रणावर

व्रणावर आपट्याची साल बांधावी.चाळीस ग्रॅम आपट्याच्या सालीचा काढा गार झाल्यावर मध टाकून पोटात घ्यावा.त्यामुळे जीर्ण व्रण बरे होतात


◆नैसर्गिक डिलीव्हरी अन् गरोदरपणात लवकर सुटका होण्यासाठी गरोदरबाई अडली असेल तर आपट्याचे झाडास नमस्कार करून मुंज झाली नाही अशा मुलाकडून अगर लग्न झाले नाही अशा अविवाहिताकडून आपट्याची पाने काढून ती गरोदर बाईच्या अंगावरून बराच वेळ फिरवावी. ताबडतोब प्रसूत होते.


◆हृदयाची सूज

आपट्याच्या मुळाच्या सालीचा काथ हृदयाची सूज ओसरण्यास मदत करतो. मुळाची साल 10 ग्रॅम दोन भांडी पाण्यात उकळावी. अर्धा भांडे बाकी राहिल्यावर मिश्रण उतरवावे. मग ते गाळून प्यावे.


◆पोटातील मुरडा बरा होण्यासाठी

मधाबरोबर आपट्याची सुक्‍या काळ्या फुलांचे चूर्ण 10 ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.


◆कृमीनाशक

आपट्याचे बीसुद्धा उपयुक्‍त आहे. बियांचे बारीक चूर्ण करून ते गाईच्या साजूक तूपात घोटून त्याचे मलम करावे जे जीवाणूंचे तसेच कीटक दंशस्थानी लावल्यास बरे वाटते.


◆लहान मुलांच्या पोटात कृमी झाले तर

आपट्याच्या बीचे घृत पोटात घ्यावे. कृमी शौचावाटे बाहेर पडण्यास मदत होते. कृमिवर पण उपयोगी आहे.

अशाप्रकारे हिंदू दसऱ्याच्या सणात विशेष महत्व असलेला आपटा आयुर्वेदियदृष्ट्यासुद्धा महत्वाचा आहे.

🙏🏻 *लक्षवेधी*

*सदर माहितीचे कॉपीराइट्स नितीन जाधव यांचे नावे असून त्यांचे नाव खोडून माहिती फॉरवर्ड केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.*

┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈

*वरील माहीती बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही वैयक्तिक आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करू!!*

┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈

╔══╗       संकलन: नितीन जाधव  

║██║         स्रोत:- निसर्ग उपचार

╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ   +९१९०८२५५६६९४

▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █

              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ

◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

        !!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​

धम्मचक्र प्रवर्तन दिन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

 

            मुंबईदि. 4 : धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहेअशा शब्दांत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन केले आहे.

            तथागतांचा मानव कल्याणाचा विचार आणि पंचशील अनुसरण यामध्ये समाज परिवर्तनाची महान शक्ती आहे. तथागतांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा संदेश घेऊनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधींच्या जीवनात नवी पहाट आणली. हा दिवस आपल्यासाठी सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे. या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,’असेही मुख्यमंत्र्यांनी  शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.


सत्य अहिंसा


 

Featured post

Lakshvedhi