Saturday, 11 June 2022

 वैद्यकीय सेवा आणि सुविधांचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य !

            जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जगभरात आलेल्या कोविड - 19 च्या विषाणूचे संकट अजूनही जगासह, देश, महाराष्ट्रावरही आहे. जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ आपण कोविडचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करीत आहोत. गेल्या दोन वर्षाच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील कोविड-19 परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये कोविड-19 बाबत आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले.

            मार्च 2020 मध्ये महाराष्ट्रात कोविडचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर आता जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ आपण या कोविड विषाणूविरोधात एकत्रपणे लढत आहोत.या कोविड विषाणू महामारीमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवांमधील सुधारणांची आवश्यकता अधोरेखित झाली असून महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा आणि सुविधांचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढताना दिसत असल्याने शासनाच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

            येणाऱ्या काळात रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनी त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता असून राज्य शासन त्यास पाठिंबा देत आहे. रुग्णशय्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स या साधनसामुग्रीची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक ते निर्णय राज्य शासनमार्फत घेण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये आपण कोविडचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून त्या उर्वरित राज्यांसाठी आणि अन्य देशांसाठीही आदर्श ठरल्या आहेत.

            कोविड-19 विरुध्दच्या लढाईत मिळालेल्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा हा डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, आशाताई, पोलिस, स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते यांचा आहे. कोविड-19 विरुध्द मुकाबला करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न तर केलेच पण पारदर्शक पध्दतीने उपाययोजना आखण्यात आल्या. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सेवांचे जाळे विकसित करण्यावर भर देण्याचे नियोजन आहे. आणि याचाच पहिला टप्पा म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) धोरण ठरविण्यास राज्य शासनाची मान्यता देण्यात आली. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील तृतीयक आरोग्य सेवेसाठी (टेरीटरी हेल्थकेअर सर्व्हिसेस), पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षण सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाचे रणनितिक सल्लागार म्हणून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेबरोबर (आयएफसी) करार करण्यात आला आहे.

· गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ कोविड-19 विषाणूशी सामना

· आतापर्यंत कोविड-19 संसर्गाच्या तीन लाटांचा सामना

· राज्यात आलेली दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक तीव्र

· वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता यावर भर; दररोज 1,700 मेट्रिक टन इतकी सर्वाधिक ऑक्सिजनची आवश्यकता असताना महाराष्ट्रात 1,250 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण

· राज्यातील प्रत्येकाची कोविड लसीकरण व्हावे यावर भर


 खाजगी क्षेत्राची भागीदारी घेऊनच वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण – अमित देशमुख


        सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्याचे उद्दिष्ट सन 2030 पर्यंत ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करताना वैद्यकीय सेवा क्षेत्राचे खाजगीकरण न करता सार्वजनिक खाजगी भागीदारीने राज्यातील वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी तयार करण्यात आलेले पीपीपी (सार्वजनिक खाजगी भागीदारी) धोरणाचा राज्यातील सर्वसामान्यांना फायदा होणार आहे

गेल्या दोन वर्षात वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाने घेतलेले महत्वाचे निर्णय :

· राज्यात कोविड संसर्ग उद्भवल्यानंतर सुरुवातीच्या काळात फक्त 3 कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा महाराष्ट्रात होत्या. आता सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या असून राज्यातील शासकीय संस्थांमधील सर्व कोविड-19 चाचण्या मोफत घेतल्या जातात. गेल्या दोन वर्षांत 75 लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

· वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत 20 समर्पित कोविड रुग्णालये (DCH) स्थापन करण्यात आली. कोविड-19 साठी सध्या 8 हजार 027 बेड निर्धारित करण्यात आले आहेत त्यापैकी 5 हजार 902 ऑक्सिजनयुक्त बेड आहेत तर 2 हजार 125 (27 %) ICU बेड आहेत. कोविड -19 साठी एकूण 2 हजार 743 व्हेंटिलेटर, बालरुग्णांकरिता 280 व्हेंटिलेटर आणि 67 डायलिसिस मशीन्स सुद्धा ठेवण्यात आली आहेत. विभागाने 1.5 लाखांहून अधिक गंभीर कोविड-19 रुग्णांवर 80% पेक्षा जास्त पुनर्प्राप्ती दराने उपचार केले आहेत. कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी 60 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट्ससह कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी अतिरिक्त 40 PSA प्लांट तयार करण्यात आले आहेत.

· मुख्यमंत्री सहायता निधीतून मुंबईतल्या सेंट जॉर्जेस हॉस्पिटलात 100 खाटांचे आयसीयू वॉर्ड तयार करण्यासाठी 20 कोटी रुपयांची तर कोल्हापूर, अंबाजोगाई आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मशीनरी खरेदीसाठी 20 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

· मुंबईचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याचा मानस आहे. यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून सदर प्रकल्प अंशत: अथवा पूर्णत: सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्तावर विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे.

· कोविड रुग्णांकरिता आवश्यक खरेदी करण्यासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये 505 कोटी रुपये निधी देण्यात आला. तर यंत्रसामुग्री आणि उपकरण खरेदीसाठी 444 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले.

· बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्रथम वर्षाकरिता म्हणजेच सन 2019-20 साठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली.

· नंदूरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्रथम वर्षाकरिता 100 विद्यार्थी प्रवेशास परवानगीची शासन मान्यता 13 नोव्हेंबर 2020 रोजी देण्यात आली आहे.

· अलिबाग, सातारा आणि सिंधुदूर्ग येथे सन 2021-22 पासून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय, व संलग्नित 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

· उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर स्थापन करण्यास 27 जानेवारी 2021 रोजी शासन मान्यता देण्यात आली.   

· परभणी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर स्थापन करण्यास 28 मार्च 2021 रोजी शासन मान्यता देण्यात आली.  

· महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रूग्ण खाटांचे रूग्णालय व वैद्यकीय पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास 5 एप्रिल 2021 रोजी शासन मान्यता देण्यात आली. तसेच नाशिक येथे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास 27 जानेवारी 2021 रोजी मान्यता देण्यात आली असून एकूण 13 विषयातील 121 पदव्युत्तर पदवी विद्यार्थी जागा निर्माण होणार आहेत.

· पश्चिम महाराष्ट्रात सध्या एकही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तथा रुग्णालय नसल्याने पुण्यातील बारामती येथील मेडद येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित 100 खाटांचे शासकीय आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे.


 राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उदघाटन.

            मुंबई, दि. 10 : गोवा मुक्ती लढा तसेच सन 1971 च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे शुक्रवारी श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

            यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व नौदलाचे अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.

            विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतला दिनांक ३ नोव्हेंबर १९६१ रोजी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले. छत्तीस वर्षे सर्वोत्तम सेवा दिल्यानंतर विक्रांत युद्धनौकेला जानेवारी १९९७ मध्ये निवृत्त करण्यात आले व त्यानंतर सन २०१२ पर्यंत ते तरंगते संग्रहालय म्हणून सेवेत होते. 

            नौदलाने दिलेल्या माहितीनुसार आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका म्हणून नव्या रूपाने कोचीन शिपयार्ड येथे पुनश्च तयार होत आहे. लवकरच ही युद्धनौका आयएनएस विक्रांत याच नावाने नौदलात समाविष्ट केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

०००

Governor Koshyari dedicates replica of aircraft carrier Vikrant in Mumbai

            Mumbai : Friday, 10 Jun 22 : A model of the Indian Navy’s first aircraft carrier, INS Vikrant, was dedicated to the city of Mumbai by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari on Friday (10 June) at Colaba in Mumbai. Vice Admiral Ajendra Bahadur Singh PVSM, AVSM, VSM, ADC, Flag Officer Commanding-in-Chief, Western Naval Command, Commissioner of Brihanmumbai Police Sanjay Pandey and other guests were present.


      The 10 mtr long model of the erstwhile _Vikrant_ has been made in-house by Naval Dockyard, Mumbai and has been located at Regal Circle, Colaba in association with the Residents Association ‘ _My Dream Colaba_’ and ‘ _CALM'_, supported by Adv Makarand Narvekar. The dedication of the model is an affirmation of the strong maritime connect of Mumbai and equally rich maritime heritage of the State of Maharashtra. The model stands proud at the famous Regal Circle, Colaba shoulder to shoulder with the iconic Gateway of India and Naval Dockyard, signifying the ship’s strong bond with the city of Mumbai where she was based during her entire commissioned service.

      An aircraft carrier of the Majestic Class, INS Vikrant was launched in September 1945 and formally inducted into the Indian Navy on 03 November 1961 at Mumbai. The ship participated in numerous campaigns and exercises, notable among them being the operations for Liberation of Goa in December 1961 and the Indo-Pak War in 1971. Post serving the nation for 36 years, the ship was decommissioned in January 1997 and remained as a floating museum ship at Mumbai till 2012.

      “Old ships never die, they fade away to be resurrected in another avatar”. In keeping with this age old saying, ‘Vikrant’ is set to be reborn as the prestigious Indigenous Aircraft Carrier, designed by the Indian Navy and being built by M/s Cochin ShipYard Ltd. The ship is presently undergoing sea trials and will soon be commissioned into the Indian Navy as INS Vikrant.


००००



 

*गुरुवाणी*
*आपण अर्पण केलेला नैवेद्य देव ग्रहण करतात का ?*

*एका शिष्याने आपल्या गुरुंना विचारले,*

*"खरंच देव आपण दाखविलेला नैवेद्य ग्रहण करतात का ? जर देव तो ग्रहण करतात,  तर ते पदार्थ नाहीसे का होत नाहीत ? "*

*त्यावेळी गुरुंनी त्या शिष्याला काहीच ऊत्तर दिले नाही. आपला नियमित पाठ शिकवित राहिले.*

*त्या दिवशीच्या पाठामध्ये गुरुंनी आपल्या शिष्यांना एक श्लोक शिकविला.*

*पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।*

*पाठ संपल्यावर गुरूंनी सर्व शिष्यांना पुस्तकात पाहून हा श्लोक कंठस्थ करण्यास सांगितले. काही वेळानंतर गुरूंनी प्रश्न विचारणाऱ्या शिष्याजवळ जाऊन त्याला विचारले,*

*"काय, श्लोक तोंडपाठ झाला की नाही ?"*

*त्यावर त्या शिष्याने गुरूंना तो श्लोक अचूक म्हणून दाखविला.*

*तरी देखील गुरूंनी नकारार्थी मान हलविली. त्यावर शिष्य आर्जवाने म्हणाला,*

*"तुम्हाला हवं असेल तर पुस्तकात बघा आर्य, मी श्लोक बरोबर म्हंटलाय ! "*

*त्यावर गुरू म्हणाले, "अरे, श्लोक तर पुस्तकातच आहे, मग तू कसा काय कंठस्थ केलास ?"*

*त्यावर शिष्य काहीच बोलू शकला नाही.*

*त्यावेळी गुरूंनी त्याला समजाविले की, " सध्या पुस्तकात जो श्लोक आहे, तो स्थूल स्थितीत आहे, आणि तू जो श्लोक कंठस्थ केलास तो सूक्ष्म स्थितीत तुझ्या अंतरंगात प्रविष्ट झाला. तुझे मनही त्याच स्थितीत असते. तू श्लोक कंठस्थ केलास त्यावेळी पुस्तकातील जे त्याचे स्थूल रुप आहे, त्याचा काहीच ह्रास झाला नाही."* 

*"त्याचप्रकारे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा जेंव्हा  आपण अर्पण केलेल्या नैवेद्याचे सूक्ष्म स्थितीत ग्रहण करतो, तेंव्हा त्याच्या स्थूल रुपात काहीच ह्रास होत नाही. नैवेद्याचे ते स्थूल रुपच आपण नंतर प्रसाद म्हणून स्विकारतो."*.           👏🌺                                 *🙏🏻नमस्कार 🙏🏻*                                         *🌺आपला दिवस आनंदमय जावो हीच सदिच्छा 🌺*

*गुरुवाणी*
*आपण अर्पण केलेला नैवेद्य देव ग्रहण करतात का ?*

*एका शिष्याने आपल्या गुरुंना विचारले,*

*"खरंच देव आपण दाखविलेला नैवेद्य ग्रहण करतात का ? जर देव तो ग्रहण करतात,  तर ते पदार्थ नाहीसे का होत नाहीत ? "*

*त्यावेळी गुरुंनी त्या शिष्याला काहीच ऊत्तर दिले नाही. आपला नियमित पाठ शिकवित राहिले.*

*त्या दिवशीच्या पाठामध्ये गुरुंनी आपल्या शिष्यांना एक श्लोक शिकविला.*

*पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।*

*पाठ संपल्यावर गुरूंनी सर्व शिष्यांना पुस्तकात पाहून हा श्लोक कंठस्थ करण्यास सांगितले. काही वेळानंतर गुरूंनी प्रश्न विचारणाऱ्या शिष्याजवळ जाऊन त्याला विचारले,*

*"काय, श्लोक तोंडपाठ झाला की नाही ?"*

*त्यावर त्या शिष्याने गुरूंना तो श्लोक अचूक म्हणून दाखविला.*

*तरी देखील गुरूंनी नकारार्थी मान हलविली. त्यावर शिष्य आर्जवाने म्हणाला,*

*"तुम्हाला हवं असेल तर पुस्तकात बघा आर्य, मी श्लोक बरोबर म्हंटलाय ! "*

*त्यावर गुरू म्हणाले, "अरे, श्लोक तर पुस्तकातच आहे, मग तू कसा काय कंठस्थ केलास ?"*

*त्यावर शिष्य काहीच बोलू शकला नाही.*

*त्यावेळी गुरूंनी त्याला समजाविले की, " सध्या पुस्तकात जो श्लोक आहे, तो स्थूल स्थितीत आहे, आणि तू जो श्लोक कंठस्थ केलास तो सूक्ष्म स्थितीत तुझ्या अंतरंगात प्रविष्ट झाला. तुझे मनही त्याच स्थितीत असते. तू श्लोक कंठस्थ केलास त्यावेळी पुस्तकातील जे त्याचे स्थूल रुप आहे, त्याचा काहीच ह्रास झाला नाही."* 

*"त्याचप्रकारे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा जेंव्हा  आपण अर्पण केलेल्या नैवेद्याचे सूक्ष्म स्थितीत ग्रहण करतो, तेंव्हा त्याच्या स्थूल रुपात काहीच ह्रास होत नाही. नैवेद्याचे ते स्थूल रुपच आपण नंतर प्रसाद म्हणून स्विकारतो."*.           👏🌺                                 *🙏🏻नमस्कार 🙏🏻*                                         *🌺आपला दिवस आनंदमय जावो हीच सदिच्छा 🌺*

गुरू जी

 *गुरुवाणी*

*आपण अर्पण केलेला नैवेद्य देव ग्रहण करतात का ?*


*एका शिष्याने आपल्या गुरुंना विचारले,*


*"खरंच देव आपण दाखविलेला नैवेद्य ग्रहण करतात का ? जर देव तो ग्रहण करतात, तर ते पदार्थ नाहीसे का होत नाहीत ? "*


*त्यावेळी गुरुंनी त्या शिष्याला काहीच ऊत्तर दिले नाही. आपला नियमित पाठ शिकवित राहिले.*


*त्या दिवशीच्या पाठामध्ये गुरुंनी आपल्या शिष्यांना एक श्लोक शिकविला.*


*पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।*


*पाठ संपल्यावर गुरूंनी सर्व शिष्यांना पुस्तकात पाहून हा श्लोक कंठस्थ करण्यास सांगितले. काही वेळानंतर गुरूंनी प्रश्न विचारणाऱ्या शिष्याजवळ जाऊन त्याला विचारले,*


*"काय, श्लोक तोंडपाठ झाला की नाही ?"*


*त्यावर त्या शिष्याने गुरूंना तो श्लोक अचूक म्हणून दाखविला.*


*तरी देखील गुरूंनी नकारार्थी मान हलविली. त्यावर शिष्य आर्जवाने म्हणाला,*


*"तुम्हाला हवं असेल तर पुस्तकात बघा आर्य, मी श्लोक बरोबर म्हंटलाय ! "*


*त्यावर गुरू म्हणाले, "अरे, श्लोक तर पुस्तकातच आहे, मग तू कसा काय कंठस्थ केलास ?"*


*त्यावर शिष्य काहीच बोलू शकला नाही.*


*त्यावेळी गुरूंनी त्याला समजाविले की, " सध्या पुस्तकात जो श्लोक आहे, तो स्थूल स्थितीत आहे, आणि तू जो श्लोक कंठस्थ केलास तो सूक्ष्म स्थितीत तुझ्या अंतरंगात प्रविष्ट झाला. तुझे मनही त्याच स्थितीत असते. तू श्लोक कंठस्थ केलास त्यावेळी पुस्तकातील जे त्याचे स्थूल रुप आहे, त्याचा काहीच ह्रास झाला नाही."* 


*"त्याचप्रकारे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा जेंव्हा आपण अर्पण केलेल्या नैवेद्याचे सूक्ष्म स्थितीत ग्रहण करतो, तेंव्हा त्याच्या स्थूल रुपात काहीच ह्रास होत नाही. नैवेद्याचे ते स्थूल रुपच आपण नंतर प्रसाद म्हणून स्विकारतो."*. 👏🌺 *🙏🏻नमस्कार 🙏🏻* *🌺आपला दिवस आनंदमय जावो हीच सदिच्छा 🌺*

 !!एक दिवसाचा पांडुरंग ....


"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन" 


त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"


पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.


तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले, 


श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे" 


(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले ) 


गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"


( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )


पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "


(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो ) 


तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"


(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)


रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?" 


गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.


तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही " ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........


पांडुरंग पुढे म्हणतो ......... 


अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.


त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.


त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल. 


पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो" 


तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.






 

Featured post

Lakshvedhi