Thursday, 10 March 2022

 तांत्रिक बाबीं तपासून हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करू

                                      - नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

            मुंबई, दि. 9 : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रामपंचायत हिवरखेड यांनी ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ठराव पारित केला. पण ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर करतांना गावाची लोकसंख्या, कृषीवर आधारित नसलेल्या लोकसंख्येचे प्रमाण यासारख्या तांत्रिक बाबी विचारात घेतल्या जातात. या तांत्रिक बाबी तपासून प्राथमिक घोषणा करावी लागते. यानंतर एका महिन्यात लोकांच्या हरकती, सूचना विचारात घेतल्या जातात. त्यानंतर ग्रामविकास विभागामार्फत त्यावर कार्यवाही करण्यात येईल. अन्य बाबी तपासून एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

            हिवरखेड येथे नगरपंचायत स्थापन करण्याबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी सांगितले.

 बृहन्मुंबई घनकचरा व्यवस्थापनातील तांत्रिक बाबींची

खातरजमा करून प्रकरणे निकाली काढली जातील

                              - नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

            मुंबई, दि.9 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसाधन कार्यप्रणालील 1 नोव्हेंबर 2019 ते 1 जानेवारी 2022 या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित 1426 दाव्यांपैकी 960 दाव्यांचे अधिदान करण्यात आले आहे. उर्वरित 466 दाव्यांबाबतीत काही तांत्रिक मुद्यांची खातरजमा झाल्यानंतर या दाव्यांचेही निराकरण करण्यात येईल. याकरिता ऑनलाईन पद्धतीचा वापर करून ही प्रकरणे निकाली काढली जातील, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

            विधानपरिषद सदस्य सर्वश्री डॉ.सुधीर तांबे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, कपील पाटील, नरेंद्र दराडे यांनी राज्यातील अनुकंपा तत्वावरील वारसांना लाभ मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

0000

 परभणी ते झिरो फाटा रस्त्याची कामे कंत्राटदाराकडून काढून घेतली

                       - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

            मुंबई, दि. 9 : परभणी जिल्ह्यातील परभणी ते झिरो फाटा या 12 किमी लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून 6.7 किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्रालय, भारत सरकारकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये सादर केला आहे. हा रस्ता सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटदाराच्या जोखीम रकमेतून रस्ता दुरूस्तीची निविदा मागविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री अब्दुल्लाखान दुर्राणी, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर या सदस्यांनी उपस्थित केला होता.

  

बृहन्मुंबई घनकचरा व्यवस्थापनातील तांत्रिक बाबींची

खातरजमा करून प्रकरणे निकाली काढली जातील

                              - नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

            मुंबई, दि.9 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसाधन कार्यप्रणालील 1 नोव्हेंबर 2019 ते 1 जानेवारी 2022 या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित 1426 दाव्यांपैकी 960 दाव्यांचे अधिदान करण्यात आले आहे. उर्वरित 466 दाव्यांबाबतीत काही तांत्रिक मुद्यांची खातरजमा झाल्यानंतर या दाव्यांचेही निराकरण करण्यात येईल. याकरिता ऑनलाईन पद्धतीचा वापर करून ही प्रकरणे निकाली काढली जातील, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

            विधानपरिषद सदस्य सर्वश्री डॉ.सुधीर तांबे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, कपील पाटील, नरेंद्र दराडे यांनी राज्यातील अनुकंपा तत्वावरील वारसांना लाभ मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

0000

तांत्रिक बाबीं तपासून हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करू


                                      - नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

            मुंबई, दि. 9 : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रामपंचायत हिवरखेड यांनी ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ठराव पारित केला. पण ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर करतांना गावाची लोकसंख्या, कृषीवर आधारित नसलेल्या लोकसंख्येचे प्रमाण यासारख्या तांत्रिक बाबी विचारात घेतल्या जातात. या तांत्रिक बाबी तपासून प्राथमिक घोषणा करावी लागते. यानंतर एका महिन्यात लोकांच्या हरकती, सूचना विचारात घेतल्या जातात. त्यानंतर ग्रामविकास विभागामार्फत त्यावर कार्यवाही करण्यात येईल. अन्य बाबी तपासून एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

            हिवरखेड येथे नगरपंचायत स्थापन करण्याबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी सांगितले.

 महापालिका आणि नगरपालिका रुग्णालयांमध्ये शववाहिका बंधनकारक


- आरोग्यमंत्री राजेश टोपे

            मुंबई, दि. 9 : महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या रुग्णालयांमध्ये शववाहिका ठेवणे बंधनकारक असून ज्या महापालिका-नगरपालिकांमध्ये शववाहिका नसेल त्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून किंवा आमदार निधीमधून शववाहिनी घेण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितले.

            पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यतील पायरवाडी येथे आरोग्य सोयी-सुविधांच्या अभावाबाबत सदस्य अमित साटम यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले की, रुग्णवाहिकेतून मृतदेह वाहून नेण्याचे प्रावधान नाही. मृतदेह वाहतुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे शववाहिका उपलब्ध असतात. ज्या महानगरपालिका आणि नगरपालिकांकडे शववाहिका उपलब्ध नसतील त्यांनी त्या घ्याव्यात यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्हा नियोजन समितीमधून किंवा आमदार निधीमधून ही शववाहिका घेता येणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

            पालघर येथे पायरवाडी येथील सहावर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली मात्र रुग्णवाहिका चालक उपलब्ध नव्हता. जे.एस.एस.के. अंतर्गत कंत्राटी शकॉम मेडिया इंडिया प्रा. लि. भोपाळ या संस्थेमार्फत हे वाहनचालक पुरविण्यात आले असून तीन वाहनचालकांना काढून टाकण्यात आले आहे. आरोग्य उपसंचालकांच्या मार्फत या प्रकरणाची तपासणी केली जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. महिलांच्या प्रसूतीसाठी १०२ या विशेष क्रमाकांवर रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या असून अलिकडच्या काळात राज्यात सुमारे एक हजार रुग्णवाहिका बदलल्या आहेत. मोखाडा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या असून ग्रामीण रुग्णालय मोखाडासह उपजिल्हा रुग्णालय जव्हार आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

०००००


 

 नार-पार खोऱ्यातील पाणीगुजरात राज्याला देण्यात येणार नाही

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

            मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र व गुजरात राज्यादरम्यान प्रस्तावित दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा या नदीजोड प्रकल्पांमधून महाराष्ट्राने बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पात राज्याच्या नार-पार खोऱ्यातील 15.32 (अघफु) पाणी गुजरात राज्याला देण्याचा प्रश्न येत नाही, असे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केले.

            पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पात राज्याच्या नार-पार खोऱ्यातील पाणी गुजरातमध्ये 1200 किलोमिटर अंतरावर उत्तरेकडे वळविण्यात येत असल्याची लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, संजय दौंड यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना जलसंपदा मंत्री बोलत होते.

            जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, दमणगंगा- पिंजाळ व पार-तापी-नर्मदा या गुजरात व महाराष्ट्र राज्यातील आंतरराज्यीय नदीजोड योजनांच्या सामंजस्य करारानुसार नार-पार गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, दमणगंगा, एकदरे गोदावरी या चार' राज्यस्तरीय नदीजोड योजनेंतर्गत राष्ट्रीय प्रकल्पाचा भाग म्हणून प्रस्तावित केले आहे. त्याचे प्रारुप केंद्रशासनास मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. प्रारुप मसुद्यामध्ये महाराष्ट्राच्या भागातून 434 द.ल.घ.मी पाणी पार-तापी- नर्मदा नदीजोड योजनेला देणे प्रस्तावित आहे. त्यामुळे मसुद्यामध्ये पाणी उकाई धरणाच्या जलाशयातून महाराष्ट्रास परत करावे, अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात आली आहे. याबाबतीत गुजरात शासनाची अद्याप सहमती प्राप्त झालेली नाही, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली.

            महाराष्ट्राच्या जनतेमध्ये या पाणी वाटपाच्या गुंतागुंतीमुळे होत असलेला संभ्रम विचारात घेवून मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यअंतर्गत नार -पार -गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा- वैतरणा- गोदावरी, दमणगंगा -एकदरे- गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांच्या निधीतून राबविण्यात यावे असे निर्देशित केले आहे.त्यामुळे राज्यनिधीतून हा प्रकल्प राबविल्यास गुजरात राज्यात पार-तापी नर्मदा लिंकद्वारे पाणी देणे बंधनकारक राहणार नाही. या पाण्याचे नियोजन राज्यअंतर्गत प्रकल्पासाठी करता येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

०००

विधानपरिषद लक्षवेधी 2 :

नागपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन सकारात्मक

- मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 8 : जानेवारी 2022 मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे नागपूर जिल्ह्यातील 6045.69 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिके व फळबागांचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन सकारात्मक असून विहित निकषानुसार मदत करण्यात येईल अशी माहिती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत दिली.

            अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी या तालुक्यात सुमारे 76 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतपिक व फळबागाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी, याबाबत विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री.वडेट्टीवार बोलत होते.

            मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जानेवारी 2022 मध्ये राज्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांना कळविले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकषानुसार तातडीने मदत केली जाईल. तसेच राज्यातील अवकाळी पावसामुळे रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून विशेष अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असेही श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

या लक्षवेधीमध्ये सदस्य श्री.प्रविण दटके यांनी सहभाग घेतला.

००००


 खाजगी शाळांच्या शुल्क नियंत्रणासाठी विभागीय स्तरावर समित्या स्थापन.

- राज्यमंत्री बच्चु कडू यांची विधान परिषदेत माहिती.

            मुंबई, दि. ८ : राज्यातील खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क नियंत्रणासाठी विभागीय स्तरावर शुल्क नियामक समित्या स्थापन केल्या असून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खाजगी शाळांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची आपुर्ती शासनाने केली असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत दिली.

            कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शुल्ककपातीसाठी १२ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार १५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अनेक शाळांनी शुल्क कपात केली आहे, तर काही शाळा न्यायालयात गेल्या. शुल्कवाढ रोखली जावी यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद या पाच विभागात विभागीय शुल्क समितींची स्थापना करण्यात आली असून कोल्हापूर, अमरावती व लातूर तीन विभागीय शुल्क नियामक समित्यांचा अतिरिक्त कार्यभार पुणे, नागपूर व औरंगाबाद यांना सोपविण्यात आला आहे.

            विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना किमान वेतन मिळावे, त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळावा आणि तेथील शिक्षकांची पिळवणूक होऊ नये यासाठी शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनासंदर्भातही शासन विचार करेल, असेही राज्यमंत्री श्री. कडू यांनी सांगितले.

            आमदार सर्वश्री रविंद्र फाटक, प्रवीण दरेकर, डॉ.रणजीत पाटील आदींनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला राज्यमंत्री श्री.कडू यांनी उत्तर दिले.

000

अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा संरक्षणाबाबत १५ दिवसांत कार्यवाही

राज्यमंत्री बच्चु कडू यांची विधान परिषदेत माहिती.

            मुंबई, दि. ८ : राज्यातील अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांवरील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्य शाळेत समायोजित करून त्यांना सेवा संरक्षण देण्याबाबत पंधरा दिवसांत कार्यवाही करण्यात, येईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

      आमदार सर्वश्री किरण सरनाईक, श्री. नागोराव गाणार, डॉ. रणजीत पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारले.

000

सम्यक विचार समितीचा अहवाल लवकरच सादर करू : राज्यमंत्री बच्चु कडू

             मुंबई, दि. 8 : राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित पदावर व तुकड्यांवर १ नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात गठीत केलेल्या सम्यक विचार समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर लवकरच विधिमंडळात सादर करू, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

             १ नोव्हेंबर २००५ पुर्वी सेवेत आलेल्या विनाअनुदान व अंशतः अनुदानित परंतु १ नोव्हेंबर २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सभापतींच्या सूचनेनुसार सम्यक विचार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर पटलावर ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिली.

            विधानपरिषद सदस्य सर्वश्री आमदार नागोराव गाणार, अभिजित वंजारी, विक्रम काळे आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्यमंत्री श्री.कडू यांनी उत्तर दिले.

000

परिविक्षाधीन सहायक शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत सकारात्मक : राज्यमंत्री बच्चु कडू.

            मुंबई, दि. ८ : राज्यातील परिविक्षाधीन सहायक शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषेदेत दिली.

      राज्यातील सहायक शिक्षकांना सुरुवातीची तीन वर्षे मानधन मिळते. त्यांना वेतन देण्यात येत नाही, परंतु त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत वित्त विभागाच्या अभिप्रायानंतर निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री श्री.कडू यांनी सांगितले.

            विधानपरिषद सदस्य सर्वश्री कपील पाटील, नागोराव गाणार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला श्री.कडू यांनी उत्तर दिले.

000


Featured post

Lakshvedhi