*काही मंडळी १५ लाखांची वाट पहाताहेत पण हे बदल पैशात मोजताच येणार नाहीत.. 😊*
*आज भुसावळ ते गोवा जातांना रेल्वे मध्ये आलेला सुखद अनुभव..*
अचानक मित्राच्या 2 वर्षाच्या मुलाला ताप आला.. जवळ कसल्याही औषधी नाहीत.. डेस्टिनेशन मडगाव पोहचायला 7 तास अवधी.. विचार आला पुढच्या स्टेशनला उतरू आणि एकदा डॉक्टरला दाखवू मग पुढचा प्रवास बाय रोड करू.. सहज म्हणून ट्रेन मध्ये सामान विकणाऱ्याला म्हटलं आम्हाला काही औषधी हव्या आहेत.. पुढच्या स्टेशनला व्यवस्था करून दे, तुला खर्च पाण्याला 500 रुपये देतो.. तो विक्रेता म्हणाला काही गरज नाही TC ला भेटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.. TC ला लगेच भेटलो.. *सरकारी नोकरांची तत्परता उभ्या आयुष्यात मी इतकी कधीच अनुभवली नव्हती..* हातातलं काम सोडून त्याने समोर फोन लावला.. आमचा सीट नंबर आणि मेडिकल कंडिशन नोट केल्यात आणि आम्हाला सीट वर जायला सांगितलं...
समाधानाची अपेक्षा नव्हती.. पुढच्या स्टेशन वर उतरून माझ्या मित्राच्या मुलाला दवाखान्यात दाखवून बाय रोड च आम्ही प्लॅन केलाच होता.. आम्हाला वाटलं एखादा मुलगा येईल पेपरमध्ये गुंडाळून गोळ्या देईल..
पण पुढच्या स्टेशनला अक्षरशहा डॉक्टर त्यांच्या असिस्टंट सोबत आमच्या सीट वर हजर.. सोबत TC सुद्धा होते.. तपासल्या नंतर लगेच त्यांनी Assistant ला आम्हाला काही सिरपच्या बॉटल द्यायला लावल्या.. कसं घ्यायचं हे सांगून लगेच TC ला सांगितलं कि ह्यांना पॅन्ट्री मधून मीठ पाठवा.. TC ने लगेच फोन लावला.. मिठाच्या पाण्याच्या पट्टी कपाळावर फिरवायला सांगितलं आणि निघून गेले..
आम्ही आवाज देऊन किती पैसे झाले म्हणून विचारलं तर *हे सगळं विनामूल्य होतं..आश्चर्य च्या धक्क्यातच सीट वर पोहचलो तोपर्यंत पॅन्ट्रीवाला मीठ घेऊन हजर.. मेरा देश सहीमे बदल रहा है..*
काय करायचं राव त्या पेट्रोल ला काय पिऊन घ्यायचं का..
🙏🏻🙏🏻🙏🏻
अशी होत असलेले सुधारणा हे मिडीया / पेपरवाले दाखवत नाही. बदल होत आहेत. आपण सुद्धा आपल्या नातेवाईकांना व मित्राना कळवावे. वेळ लागेल पण आपण झालेला व होत असलेला बदल अनुभवत आहोत.🙏👌😊