Friday, 4 December 2020

 

कडू गोळी चावली नाही गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल..._

"देवाने सर्वांना आयुष्य

हिऱ्यासारखं दिलंय,

फक्त एक अट घातलीये

जो झिजेल तोच चमकेल...!"

 देवाला आपण घाबरले नाही तरीही

चालेल पण आपण आपल्या कर्मा

पासून घाबरून रहा,

कारण ,

शिव्या किंवा ओव्या,

शाप किंवा आशिर्वाद,

निंदा किंवा स्तुती,

सुख किंवा दुःख ,

यापैकी ,जे आपण दुस-याला देऊ ते

चुकता परत आपल्याकडे येणार

हा चैतन्यशक्तीचा स्वभावधर्म म्हणजेच

निसर्गाचा नियम आहे या नियमाला

देव पण चुकलेला नाही.. 

Thursday, 6 June 2019

10+2 TECHNICAL ENTRY SCHME COURSE-42










Percentage आणि Percentile मध्ये गल्लत!!

Percentage आणि Percentile मध्ये गल्लत!!

   अलीकडे MHT-CET चे निकाल Percentile मध्ये जाहीर झाले आहेत.

  त्यामुळे बरेचसे पालक/विद्यार्थी Percentile हेच Percentage समजण्याची चूक करत आहेत.

    परंतु Percentile मुळे आपल्याला त्या विद्यार्थ्यांची फक्त क्रमवारी(Rank) कळते, Percentile मुळे खरे गुण कळत नाहीत!!!

   त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांचे 96 Percentile आहेत यांच्या अर्थ 100 विद्यार्थी CET परिक्षेस बसले असतील तर या विद्यार्थ्यांचा क्रमांक 5 वा आहे.
   आता च्या CET मध्ये PCM विषय घेऊन 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थी बसले होते.
   समजा, एखाद्या विद्यार्थ्यांचे 96 Percentile आहेत. त्याची आताच्या CET मधील Rank खालील प्रमाणे 
काढा.

Rank ={[100-96]÷100}×276166+1
          
           = 11047
म्हणजेच महाराष्ट्र मध्ये त्याची Rank ही 11047 वी आहे.
  व त्यानुसार त्यास इंजीनियरिंग कॉलेज मध्ये अॅडमिशन मिळणार आहे.
    तेव्हा Percentile बद्दल गैर समज टाळावा.

अक्षता

आपण लग्नात (फ़क्त तांदूळ - अक्षता वापरतो...दूसरे कोणतेही धान्य नाही ) अक्षता वापरतो याची खालील दोन महत्वाची कारणे-

हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही...त्याला आतून कीड पडत नाही...म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला  धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !

तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही आयुष्याचा संसार ही दुभंगू नये  ही भावना असते 

दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते...तेव्हा ते खरे बहरते.....! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे....पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते....यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ....असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात....

आपल्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत

नातं कोणतंही असो

नातं कोणतंही असो

मतभेद कितीही असो 

संबध तोडण्याची भाषा  

मुळीच कधी करू नको

प्रत्येक माणूस वेगळा 

विचारसरणी वेगळी

मनुष्य जन्मा तुझी 

कहाणीच आगळी-वेगळी


बापा सारखा मुलगा नसतो 

मुला सारखी सून नसते

नवरा आणि बायकोचे तरी

कुठे तेवढे पटत असते ?

जरी नाही पटले तरी

गाडी मात्र हाकायची

अबोला धरून विभक्त होऊन

सारीच गणितं चुकायची

काही धरायचं असतं

काही सोडायचं असतं

एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून 

एकमेकाला सोडायचं नसतं

चुकल्यावर बोलावं

बोलल्यावर ऐकूण घ्यावं

एकांतात बसल्यावर

अंतरंगात डोकवावं

राग मनात ठेवला म्हणून

कोणाचं भलं झालं का ?

बिनसावलीच्या झाडा जवळ

पाखरू कधी आलं का ?

समोरची व्यक्ती चुकली तरी 

प्रेम करता आलं पाहिजे 

झालं गेलं विसरून जाऊन 

गच्च मिठी मारली पाहिजे

स्वागत होईल न होईल

जाणं येणं चालू ठेवा 

समोरचा जरी चुकला तरी 

म्हण " खुशाल ठेव देवा !"

आयुष्य खूप छोटं आहे 

हां हां म्हणता मृत्यू येईल

प्रेम करायचं राहिलं म्हणून

शेवटी खूप पश्चताप होईल

लक्षात ठेवा नात्या पेक्षा

दुसरं काहीही मोठं नाही

आपलं माणूस आपल्या जवळ  

या सारखी श्रीमंती नाही !

Featured post

Lakshvedhi