बेकायदेशीरपणे राहणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी
'डायनॅमिक इमिग्रेशन सिस्टीम' कार्यान्वित करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.१७: राज्यातील मोठ्या शहरांमध्ये फोफावणाऱ्या अंमली पदार्थांच्या जाळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि ड्रग्ज तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांना शोधून काढण्यासाठी आता 'डायनॅमिक इमिग्रेशन सिस्टीम' कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
आमदार स्नेहा दुबे यांनी राज्यातील अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते.
No comments:
Post a Comment