Saturday, 10 January 2026

महाराष्ट्राची समृद्ध परंपरा सर्वदूर पोहोचवणे हेच आमचे ध्येय






 महाराष्ट्राची समृद्ध परंपरा सर्वदूर पोहोचवणे हेच आमचे ध्येय

-निवासी आयुक्त आर. विमला

            निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी या महोत्सवाच्या सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अटकेपार झेंडा फडकवून महाराष्ट्राची प्रचिती दिलीतोच सांस्कृतिक वारसा आज राजधानीत आणि संपूर्ण देशात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. मकर संक्रांत हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातोया विविधतेतील एकता जपत महाराष्ट्राची विशेष खाद्य संस्कृतीविशेषतः हुरडाआणि मराठमोळ्या परंपरा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या भावना आणि संस्कृती अधिक प्रभावीपणे मांडली जात असूनयातून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख दिल्लीत निर्माण होईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi