Monday, 5 January 2026

दहा–बारा वर्षे अडकलेला प्रश्न मार्गी लावला

 दहाबारा वर्षे अडकलेला प्रश्न मार्गी लावला – मुख्यमंत्री

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीया वसतीगृहासंदर्भात आपण दहा-बारा वर्षे चर्चा करत होतोपरंतु प्रश्न काही पुढे जात नव्हता. मंत्री अतुल सावे यांना हा विभाग मिळाल्यानंतर मी त्यांना विनंती केली की प्रत्येक वसतिगृहासाठी जागा शोधा आणि त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्याचा आनंद असून आज 65 वसतीगृह सुरू झाली आहेत.  भाड्याच्या इमारतीत वसतीगृहे न चालवता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जागा असावीया उद्दिष्टाने जागा शोधण्याचे काम सुरू ठेवण्यात आले असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जागा निश्चित झाल्या आहेत. महसूल विभागाकडून पुणेजालनाबुलढाणाभंडारावर्धागडचिरोलीरत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जमीन प्रत्यार्पित झाली आहे. तसेच इतर विविध विभागांकडून हस्तांतरित झालेल्या जागांमध्ये सोलापूरसांगलीधुळेधाराशिवअमरावतीअकोलायवतमाळवाशिमचंद्रपूरगोंदिया – येथेही वसतिगृहांसाठी जमीन उपलब्ध झाली आहे. नागपूरकोल्हापूरसातारानाशिकजळगावनंदुरबारलातूरनांदेडहिंगोलीबीडपरभणीसिंधुदुर्गपालघरछत्रपती संभाजीनगरअहिल्यानगर या जिल्ह्यात जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुरु असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi