राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार
- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
नागपूर, दि. १२ : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार असून वित्त विभागाकडे पाठपुरावा करून लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य सतिश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांमध्ये मनुष्यबळाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते. यावेळी सदस्य अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत यांनी चर्चेत सहभाग घेतला.
सेवाप्रवेश मंडळाचा तात्पुरता कार्यभार उपाध्यक्ष (एमसीआरसी) यांना तत्काळ सोपविण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रमोशन विषयक प्रक्रिया अधिक वेगाने नियंत्रित होईल. पुढील अधिवेशनात हा विषय पुन्हा उपस्थित करण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment