छत्रपतींचा समृद्ध वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजेच ‘लोककल्याणासाठीच राज्य’ या विचाराशी सुशासनाचा संदेश जोडण्याचा प्रयत्न करण्यात यावा. तसेच दीपावलीचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून समावेश करताना, दिखाव्यापेक्षा त्यामागील मूल्यांचा विचार करून सुशासनाची संकल्पना पुढे नेण्याची गरज आहे.
किल्ले व वारसा आधारित विकासासाठी ५० हजारापेक्षा जास्त रोजगार तयार होईल आणि एक हजार कोटीच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असलेल्या प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment