Saturday, 6 December 2025

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या

विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले

 - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे

भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दादरच्या चैत्यभूमी येथे 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 

             मुंबईदि. 06 : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकतान्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिलेअसे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

     मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेकौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढासांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटमाजी मंत्री संजय बनसोडेआमदार कालिदास कोळंबकर,आमदार चित्रा वाघआमदार अमित साटममाजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधवमाजी खासदार राहुल शेवाळेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरमुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीकोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीसामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेसमन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi