कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी
– मंत्री मंगलप्रभात लोढा
नागपूर, दि. १४ : राज्यातील बेरोजगार युवकांसाठी सुरू असलेल्या कौशल्य विकास व प्रशिक्षण योजना अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू राहील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते.
मंत्री लोढा यांनी सांगितले की, 2007 नंतर बेरोजगारांसाठी कोणतीही ठोस योजना नव्हती. सध्याची योजना ही रोजगारासाठी नव्हे, तर प्रशिक्षणासाठी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असलेली योजना निवडणुकीनंतर बंद न करता पाच महिने वाढविण्यात आली. याशिवाय पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अर्थसंकल्पातही 418 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
No comments:
Post a Comment