Monday, 24 November 2025

श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या पाठीमागे केवळ शीख अनुयायी

 श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना आग्रा येथे कैद करून दिल्ली येथे आणण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात आली. पण त्यांनी तत्वांशी तडजोड करण्यास नकार दिला. १६७५ मध्ये चांदणी चौक दिल्ली शीशगंज येथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या पाठीमागे केवळ शीख अनुयायी नव्हते; तर त्यांच्या सोबत अनेक समाज उभे होते. विशेषतः सिकलीगरबंजारालबानामोह्यालसिंधी समाजांनी या संघर्षात आपले मोलाचे योगदान दिले. भाई मतीदासभाई सतीदास आणि भाई दयाला गुरूजींच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरूनिष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभावसाहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात.

लबानाबंजारासिखलीकर समाजांनी श्री गुरू तेग बहादुर साहिबजींचा धर्माचे रक्षण म्हणजे मानवतेचे रक्षण हा शिकवणीचा संदेश दूरवर पोहोचवला.

त्यांच्या व्यापारी व भ्रमणशील जीवनशैलीमुळे भारताच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. आजही संपूर्ण देशामध्ये या प्रदेशांमध्ये या समाजाचे लोक भक्तीसेवा आणि साहसाची परंपरा जिवंत ठेवून आहेत.

श्री गुरु तेग बहादुरजींनी शिकवले की धर्म म्हणजे प्रेमसमता आणि सेवा. ते सांगतात की,  धैर्य तलवारीत नसतेते सत्यात असते. 

त्यांनी ‘‘न को बैरीन ही बेगानासगल संग हम को बन आई’’ या गुरू वाणीच्या रचनेत त्यांनी सर्वधर्म समभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे. याचा अर्थ माझ्यासाठी कोणीही शत्रू नाहीपरका नाही कारण सर्वांमध्ये एकच ईश्वर आहे.’ 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi