आधुनिक जीवनशैली, असंतुलित आहार आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, अस्थमा, मानसिक आरोग्य या समस्या आणि रक्तविकार झपाट्याने वाढत आहेत. भावी पिढीसाठी ही चिंतेची बाब असून लोकप्रतिनिधी, शाळा, पालक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या आजाराविरुद्ध यशस्वी लढा देण्यात पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्याने बाल मृत्यूदर कमी करण्यात देशाला दिशा दिली आहे. त्याचप्रमाणे बालकामधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी राज्याने दिशादर्शक असे काम करावे, अशी अपेक्षा युनिसेफचे डॉ. संजय सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.
किशोरवयीन मुलांमध्ये अस्थमा, लठ्ठपणा, मधुमेह वाढत आहे असे सांगून डॉ. मृदला फडके म्हणाल्या असंसर्गजन्य आजारांबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. असंसर्गजन्य आजारात किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी युनिसेफचे डॉ. मंगेश गाधारी आणि आरोग्य सेवा संचालक यांनीही मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment